शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

स्थायी समितीच्या रिक्त जागांचा तिढा कायम दोन जागांसाठी तीन अर्ज राहिल्यास निवडणूक अटळ

By admin | Updated: November 9, 2014 00:09 IST

स्थायी समितीच्या रिक्त जागांचा तिढा कायम दोन जागांसाठी तीन अर्ज राहिल्यास निवडणूक अटळ

  नाशिक : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या दोन रिक्त जागांबाबत तिढा कायम असून, सोमवारी (दि.१०) यासंदर्भात मनीषा बोडके यांची मनधरणी करण्यात येण्याची शक्यता आहे. शुक्रवारी (दि.७) राष्ट्रवादीच्या संगीता राजेंद्र ढगे यांची मनधरणी केल्यानंतर त्यांनी अर्ज माघारी घेतल्याने राष्ट्रवादीच्या गोटात काहीसे आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, स्थायी समितीच्या दोन रिक्त जागांसाठी राष्ट्रवादीकडून शैलेश सूर्यवंशी व कृष्णराव गुंड यांची नावे निश्चित करण्यात आली असून, त्यांनी स्थायी समितीच्या रिक्त जागांसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्याचप्रमाणे भाजपाचे केदा अहेर यांची जागा रिक्त झाल्याने भाजपाने त्यांच्या जागी सौ. मनीषा श्याम बोडके यांचा अर्ज दाखल केला आहे, तर कॉँग्रेसकडून माजी सभापती सुनीता अहेर यांनीही अर्ज दाखल केला आहे. त्यात सुनीता अहेर यांचा स्थायी समितीसाठी उमेदवारी अर्ज भरलाच नसल्याचा दावा प्रशासनाने केला असला तरी स्वत: सुनीता अहेर यांनी मात्र आपण स्थायी समितीच्या रिक्त पदासाठी अर्ज दाखल केला असून, त्या अर्जाची माघार घेतलेली नाही,असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या दोन रिक्त जागांसाठी आता एकूण चार अर्ज असल्याचे कळते. त्यात राष्ट्रवादीच्या दोघा सदस्यांचे अर्ज असून, त्याचबरोबर मनीषा बोडके व सुनीता अहेर यांचे अर्ज असल्याने या चारपैकी दोघांनी माघार घेतली तरच स्थायी समितीच्या दोन सदस्यांची निवडणूक बिनविरोध होऊ शकते. अन्यथा निवडणूक अटळ असल्याचे बोलले जाते. दुसरीकडे मनीषा श्याम बोडके यांच्या माघारीसाठी राष्ट्रवादीकडून त्यांची मनधरणी सुरू असल्याचे कळते. (प्रतिनिधी)