शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

गरज भासल्यास नाशिकच्या विकास आराखड्यात बदल करू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 14:51 IST

महापालिका आयुक्तांची भूमिका : नागरी वाहतूक धोरणातील अनेक मुद्दे अनुत्तरीत

ठळक मुद्देवर्षभरापूर्वीच प्रसिद्ध झालेल्या विकास आराखड्यात छेडछाड होण्याची शक्यता नाकारता येत नाहीशाश्वत वाहतूक नियोजनाचा स्वीकार करायचा असेल तर शहर विकास आराखड्यात वाहतुकीच्या दृष्टीने सुधारणा करण्याची सूचना करण्यात आलेली आहे

नाशिक - राज्य शासनाच्या नागरी वाहतूक धोरणाचा स्वीकार करायचा असेल तर विकास आराखड्यातही सुधारणा करावी लागणार असल्याने आवश्यकता भासल्यास आराखड्यात बदल करण्याची तयारी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी धोरण सादरीकरणाच्या चर्चासत्रात दाखवली आहे. त्यामुळे वर्षभरापूर्वीच प्रसिद्ध झालेल्या विकास आराखड्यात छेडछाड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, आयटीडीपीने सादर केलेल्या या धोरणातील अनेक मुद्यांचे समाधानकारक स्पष्टीकरण नगररचनाच्या अधिकाºयांसह प्रतिनिधींना देता न आल्याने काही प्रश्न अनुत्तरीतच आहेत.राज्य शासनाने नागरी वाहतूक धोरणाचा मसुदा प्रसिद्ध केला असून त्याचे सादरीकरण आयटीडीपी या संस्थेच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी (दि.२) महापालिका आयुक्तांच्या सभागृहात केले. या सादरीकरणात संबंधित धोरणानुसार, शाश्वत वाहतूक नियोजनाचा स्वीकार करायचा असेल तर शहर विकास आराखड्यात वाहतुकीच्या दृष्टीने सुधारणा करण्याची सूचना करण्यात आलेली आहे. संबंधित धोरण हे राज्यभरासाठी लागू होणार असले तरी नाशिक महापालिकेचा शहर विकास आराखडा मागील वर्षी जानेवारीतच प्रसिद्ध झालेला आहे आणि त्यानुसार त्याची अंमलबजावणीही सुरू झालेली आहे. अशा स्थितीत शहर विकास आराखड्यात बदल करणार काय,असा प्रश्न उपस्थित झाला असता, यापूर्वी नगररचनाचा कारभार पाहणा-या आणि सध्या ट्रॅफिक सेलच्या संचालक सुलेखा वैजापूरकर यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. संबंधितांनी लेखी सूचना केल्यास त्यावर नगरविकास विभाग विचार करेल, असे मोघम उत्तर त्यांनी दिले तर मुख्यमंत्री कार्यालयातील उपस्थित प्रतिनिधीने धोरण राबविण्यासाठी विकास आराखड्यात बदल करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करत ज्या गोष्टी महापालिकेला करणे सहज शक्य आहे, त्याला प्राधान्य द्यावे, अशी सारवासारव केली. मात्र, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी शहराच्या वाहतुक व्यवस्थेत सुधारणेसाठी आवश्यकता भासल्यास विकास आराखड्यात बदल करण्याचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे सादर करण्याची तयारी दर्शविली शिवाय, यापूर्वी आराखड्यात अनेकदा बदल झाल्याचे धक्कादायक विधानही केले. विशेष म्हणजे, विकास नियंत्रण नियमावलीतील ६ व ७.५० मीटरच्या रस्त्यांबरोबरच अन्य काही त्रुटींबाबत महापालिकेने सुधारणा करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवूनही त्याची शासनाने दखल घेतलेली नाही. तसेच स्मार्ट सिटी अभियानांतर्गत गावठाण पुनर्विकासासाठी एफएसआय वाढवून देण्याचाही प्रस्ताव शासनाने फेटाळला असताना, आयुक्तांनी दाखविलेला आत्मविश्वास नंतर चर्चेचा विषय ठरला.

मुख्यंमत्र्यांनी सांगितले म्हणून होणारच!आयटीडीपीच्या प्रतिनिधींनी नागरी वाहतूक धोरणाचा मसुदा सादर केल्यानंतर उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी काही मूलभूत मुद्दे उपस्थित केले. तर सभागृहनेता दिनकर पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी बससेवा ताब्यात घेण्यास सांगितले असल्याने महापालिका बससेवा चालविणारच, अशी भूमिका स्पष्ट केली. महासभेत आम्ही बससेवेचा प्रस्ताव मंजूर करू, तुम्ही काही काळजी करु नका, असा दिलासा सभागृहनेत्यांनी शासनाकडून आलेल्या उपस्थित प्रतिनिधींना दिला.गावठाणाबाबत चुकीचे समर्थनशहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भर देत खासगी वाहने कमी करण्याचा सल्ला या धोरणात देण्यात आला. मात्र, त्यात दाट लोकवस्ती असलेल्या गावठाण भागाबाबत कुठलाही विचार झाला नसल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली असता, आयटीडीपीचे प्रतिनिधी हर्षद अभ्यंकर यांनी चुकीचे समर्थन केले. ज्यांना शाश्वत वाहतुकीच्या धोरणाचा स्वीकार करायचा असेल त्यांनी तो करावा, इतरांनी वाहतूक कोंडी सोसावी, असे उत्तर देत अभ्यंकर यांनी सदर धोरण हे परिपूर्ण नसल्याचीच कबुली दिली.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTrafficवाहतूक कोंडी