शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

भुजबळांना काही झाले तर सरकार जबाबदार;शरद पवार यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 5:08 PM

गेल्या काही दिवसांपासून मला छगन भुजबळ यांच्या खालावत जाणा-या तब्बेतीविषयी चिंताजनक माहिती भेटत आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी ते कारागृहात खितपत पडले आहेत. छगन भुजबळ यांच्या प्रकरणात ज्या काही कायदेशीर बाबी आहेत त्या विषयी अजुन माननीय न्यायालयाकडून काही निर्णय झालेला नाही.

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले पत्र‘जामीन हा नियम आहे आणि तुरूंग हा अपवाद आहे’ हे तत्व छगन भुजबळ यानाही लागू

नाशिक : राष्टÑवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर योग्य ते वैद्यकीय उपचार करण्याची मागणी विधीमंडळ अधिवेशनात करण्यात आल्यानंतर आता पक्षाचे नेते शरद पवार यांनीही भुजबळ यांच्या प्रकृती विषयी चिंता व्यक्त करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले असून, भुजबळ यांच्यावर योग्य उपचार व्हावेत अन्यथा काही अप्रिय घडले तर सरकारलाच जबाबदार धरण्यात येईल असा इशाराही या पत्रात देण्यात आला आहे.या संदर्भातील पत्रात पवार यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून मला छगन भुजबळ यांच्या खालावत जाणा-या तब्बेतीविषयी चिंताजनक माहिती भेटत आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी ते कारागृहात खितपत पडले आहेत. छगन भुजबळ यांच्या प्रकरणात ज्या काही कायदेशीर बाबी आहेत त्या विषयी अजुन माननीय न्यायालयाकडून काही निर्णय झालेला नाही. न्यायालयाकडून त्यांच्या बाबतीत अंतीम निर्णय येत नाही तो पर्यंत त्यांना निर्दोष समजण्यात यावे. सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा असे म्हटले आहे की, ‘जामीन हा नियम आहे आणि तुरूंग हा अपवाद आहे’ हे तत्व छगन भुजबळ यानाही लागू होते. त्यांना वारंवार नाकारण्यात येत असलेला जामीन दुर्देवी आहे. मला त्यावर काहीही वक्तव्य करायचे नाही. छगन भुजबळ हे ओबीसी नेते आहेत. त्यांनी पन्नासहून अधिक वर्षे सामाजिक जीवनात घातली आहेत. त्यांनी मुंबईचे महापौर, महाराष्टÑाचे उपमुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री, सार्वजनिक बांधकाम अशी पदे भुषविली आहेत. त्यांनी महाराष्टÑाच्या जनतेच्या कल्याणासाठी दिलेले योगदान अव्हेरता येणार नाही. मला जास्त काही अपेक्षा नाही पण योग्य ते वैद्यकीय उपचार त्यांना दिले गेले पाहिजेत, तो त्यांचा घटनादत्त अधिकार आहे. त्यांच्या प्रकृती विषयी आणि वाढत्या वयाविषयी तुम्ही ज्ञात आहात. मला खात्री आहे की तुम्ही त्यांना योग्य वैद्यकीय उपचार भेटावेत यादृष्टीने पावले उचलाल. मला हे खेदाने म्हणावे लागत आहे की, येत्या काळात जर छगन भुजबळ यांना एखाद्या अप्रिय परिस्थितीतून जावे लागले तर तुमच्या सरकारला यासाठी जबाबदार धरले जाईल.शरद पवार यांनी गुरूवारी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविलेले हे पत्र शनिवारी सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आले. विशेष म्हणजे त्याच दिवशी नाशिक येथे राष्टÑवादी कॉँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेच्या समारोपानिमित्त शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक