शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

सिन्नरला नदी पुनरुज्जीवनाचे आदर्श काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:56 IST

नदी पुनरुज्जीवनाचे आदर्श काम सिन्नरला उभे राहिले असून, युवामित्र, टाटा ट्रस्ट व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून हे काम तीन वर्षात जिल्ह्यातल्या एक हजार गावांत पोहचण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली.

सिन्नर : नदी पुनरुज्जीवनाचे आदर्श काम सिन्नरला उभे राहिले असून, युवामित्र, टाटा ट्रस्ट व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून हे काम तीन वर्षात जिल्ह्यातल्या एक हजार गावांत पोहचण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली.  देवनदी पुनरुज्जीवन व एकात्मिक उपजीविका विकास कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरीय सहविचार सभेत ते बोलत होते. आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे, अधीक्षक अभियंता राजेश मोरे, टाटा ट्रस्टचे मुकुल गुप्ते, अशोक कुमार, नगराध्यक्ष किरण डगळे, युवानेते उदय सांगळे, पंचायत समितीचे सभापती भगवान पथवे, उपसभापती जगन्नाथ भाबड, नालंदा फाउण्डेशनचे संजय जोशी, नेचर कॉन्झर्व्हेनसचे रॅनी थॉमस, युवामित्रचे अध्यक्ष सुनील पोटे आदी उपस्थित होते. सिन्नरमध्ये झालेले काम जिल्ह्यातील इतरही तालुक्यात व्हावे यासाठी युवामित्र-टाटा ट्रस्टने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे राधाकृष्णन यांनी सांगितले. मालेगाव, नाशिक, चांदवड, कळवण, नांदगाव, येवला, दिंडोरी, देवळा, सटाणा या तालुक्यातील ब्रिटिशकालीन २७२ बंधाऱ्यांचे पुनरुज्जीवन व त्यावरील वितरण व्यवस्था तीन वर्षात पूर्ण करण्यात येईल. आमदार वाजे यांनी निधी उपलब्ध केल्याप्रमाणे इतरही तालुक्यातील आमदार, खासदारांचा स्वनिधी, जिल्हा नियोजनमार्फत निधी उपलब्ध करण्यात येईल. टाटा ट्रस्ट, युवामित्रने हे काम एक हजार गावांपर्यंत न्यावे. शास्वत शेतीसाठी मदत करण्यास सदैव तयार असल्याचे ते म्हणाले.  जिल्ह्यातल्या इतर तालुक्यात नदी पुनरुज्जीवनाचे काम व्हावे यासाठी त्या त्या गटातील सदस्याच्या माध्यमातून सेस निधीमार्फत कामे केली जातील. त्याद्वारे ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिले. लहानू भाबड, बापू खैरनार (मालेगाव), सुनील गडाख, अशोक कुमार, डॉ. संजय बेलसरे यांनी मनोगत व्यक्त केले. सहविचार सभेस कोल्हापूर, रायगड, नगर आदी जिल्ह्यासह मालेगाव, बागलाण, दिंडोरी, कळवण, दिंडोरी आदी तालुक्यातील पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. युवामित्रचे अध्यक्ष सुनील पोटे यांनी प्रास्ताविक केले.शेतीला शुद्ध पाणी देण्यावर भरसिन्नरला सरस्वती नदीच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात आले असले तरी शहराचे पाणी देवनदीत मिसळून ती प्रदूषित होणार नाही यावर पुढील काळात काम केले जाणार असल्याचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी सांगितले. सांडपाणी व्यवस्था व नदी प्रदूषण ही राष्ट्रीय समस्या बनली आहे. तथापि, आपली समस्या आपणच सोडवण्यासाठी काम केले पाहिजे. शेतीला शुद्ध पाणी देण्यावर भर असला पाहिजे. त्यातून आजारपणाचे प्रमाण कमी होऊ शकेल, असे मत वाजे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी