शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

सिन्नरला नदी पुनरुज्जीवनाचे आदर्श काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:56 IST

नदी पुनरुज्जीवनाचे आदर्श काम सिन्नरला उभे राहिले असून, युवामित्र, टाटा ट्रस्ट व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून हे काम तीन वर्षात जिल्ह्यातल्या एक हजार गावांत पोहचण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली.

सिन्नर : नदी पुनरुज्जीवनाचे आदर्श काम सिन्नरला उभे राहिले असून, युवामित्र, टाटा ट्रस्ट व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून हे काम तीन वर्षात जिल्ह्यातल्या एक हजार गावांत पोहचण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली.  देवनदी पुनरुज्जीवन व एकात्मिक उपजीविका विकास कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरीय सहविचार सभेत ते बोलत होते. आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे, अधीक्षक अभियंता राजेश मोरे, टाटा ट्रस्टचे मुकुल गुप्ते, अशोक कुमार, नगराध्यक्ष किरण डगळे, युवानेते उदय सांगळे, पंचायत समितीचे सभापती भगवान पथवे, उपसभापती जगन्नाथ भाबड, नालंदा फाउण्डेशनचे संजय जोशी, नेचर कॉन्झर्व्हेनसचे रॅनी थॉमस, युवामित्रचे अध्यक्ष सुनील पोटे आदी उपस्थित होते. सिन्नरमध्ये झालेले काम जिल्ह्यातील इतरही तालुक्यात व्हावे यासाठी युवामित्र-टाटा ट्रस्टने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे राधाकृष्णन यांनी सांगितले. मालेगाव, नाशिक, चांदवड, कळवण, नांदगाव, येवला, दिंडोरी, देवळा, सटाणा या तालुक्यातील ब्रिटिशकालीन २७२ बंधाऱ्यांचे पुनरुज्जीवन व त्यावरील वितरण व्यवस्था तीन वर्षात पूर्ण करण्यात येईल. आमदार वाजे यांनी निधी उपलब्ध केल्याप्रमाणे इतरही तालुक्यातील आमदार, खासदारांचा स्वनिधी, जिल्हा नियोजनमार्फत निधी उपलब्ध करण्यात येईल. टाटा ट्रस्ट, युवामित्रने हे काम एक हजार गावांपर्यंत न्यावे. शास्वत शेतीसाठी मदत करण्यास सदैव तयार असल्याचे ते म्हणाले.  जिल्ह्यातल्या इतर तालुक्यात नदी पुनरुज्जीवनाचे काम व्हावे यासाठी त्या त्या गटातील सदस्याच्या माध्यमातून सेस निधीमार्फत कामे केली जातील. त्याद्वारे ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिले. लहानू भाबड, बापू खैरनार (मालेगाव), सुनील गडाख, अशोक कुमार, डॉ. संजय बेलसरे यांनी मनोगत व्यक्त केले. सहविचार सभेस कोल्हापूर, रायगड, नगर आदी जिल्ह्यासह मालेगाव, बागलाण, दिंडोरी, कळवण, दिंडोरी आदी तालुक्यातील पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. युवामित्रचे अध्यक्ष सुनील पोटे यांनी प्रास्ताविक केले.शेतीला शुद्ध पाणी देण्यावर भरसिन्नरला सरस्वती नदीच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात आले असले तरी शहराचे पाणी देवनदीत मिसळून ती प्रदूषित होणार नाही यावर पुढील काळात काम केले जाणार असल्याचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी सांगितले. सांडपाणी व्यवस्था व नदी प्रदूषण ही राष्ट्रीय समस्या बनली आहे. तथापि, आपली समस्या आपणच सोडवण्यासाठी काम केले पाहिजे. शेतीला शुद्ध पाणी देण्यावर भर असला पाहिजे. त्यातून आजारपणाचे प्रमाण कमी होऊ शकेल, असे मत वाजे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी