शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

नरेंद्र मोदींना मी सांगितलं, सगळ्या गोष्टी मान्य, पण...; शरद पवारांनी जाहीर सभेत सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 00:38 IST

शरद पवार हे सध्या राज्यातील विविध जिल्ह्यांचे दौरे करत जाहीर सभाही घेत आहेत.

Sharad Pawar Speech ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या राज्यातील विविध जिल्ह्यांचे दौरे करत जाहीर सभाही घेत आहेत. बुधवारी निफाडमध्ये घेतलेल्या सभेतून शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. तसंच मोदींच्या एका वक्तव्याची आठवण करून देत तेव्हा घडलेला किस्साही सांगितला.

नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना शरद पवार म्हणाले की, "मला आठवतंय,  एकदा मोदी साहेबांनी मला सांगितलं की, ‘शरदराव आपके बारामती में मुझे आना  है’ मी म्हटलं, ‘आप आ सकते है।’ तुमची शेती बघायची ते बोलत होते. आले;  सर्व शेती पाहिली, कारखानदारी पाहिली, शैक्षणिक संस्था पाहिल्या आणि बाहेर  जाऊन सांगितले, शरद पवारांचं बोट धरून मी राजकारणात आलो. राजकारणात  गॅरंटी द्यायची आणि पाळायची नाही आणि त्याच राजकारणात ते माझा बोट धरून  आलेत. मी पार्लमेंटमध्ये सांगितलं, मोदी साहेब सगळ्या गोष्टी मान्य. पण,  माझ्या बोटाला हात लावू नका. माझे बोट असे राजकारण करणारे नाही आणि गॅरंटी  पाळणार नसाल, तर तुमची बदनामी होणार असेल की नाही याचा विचार तुम्ही करा. पण,  माझ्यासारख्याची बदनामी करू नका," असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

"सगळे  सांगत आहेत, कसली गॅरंटी ? मोदीची गॅरंटी. काय गॅरंटी दिली ? आज या  गॅरेंटी मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, याची गॅरंटी दिली.  उत्पन्न वाढले नाही. आत्महत्या थांबल्या नाहीत. आत्महत्या वाढल्यात, त्याची  गॅरंटी दिली होती. रोजगार वाढवणार, बेकारी घालवणार याची गॅरंटी दिली होती.  त्यातली एकही गॅरंटी पूर्ण झाली नाही. फक्त आश्वासने देणे याशिवाय दुसरे काहीच करायचे नाही," असा हल्लाबोलही शरद पवार यांनी केला आहे.

 "महाराष्ट्रामध्ये  मंत्रिमंडळातील मंत्री तुरुंगात टाकले"

केंद्र सरकारवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, "आज  अनेक गोष्टी आहेत. सत्तेचा गैरवापर आहे. त्यांच्या मनासारखे राजकारण कोणी करत नाही म्हणून टोकाची भूमिका घेतली जाते. महाराष्ट्रातील  मंत्रिमंडळाचे मंत्री तुरुंगात टाकले. राऊत साहेबांनी आपल्या लेखणीने  सरकारच्या चुकीच्या धोरणावर आवाज उठवला. त्यांना तुरुंगात टाकले. अनिल  देशमुख यांना तुरुंगात टाकले. आज झारखंडचे मुख्यमंत्री त्यांच्या विचारांचे  नाही, म्हणून मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले. दिल्लीचे मुख्यमंत्री  केजरीवाल यांना ८ नोटीसा टाकल्या. त्यांना देखील तुरुंगात टाकल्याशिवाय  राहणार नाही. त्यांच्या मंत्रिमंडळातील ३ मंत्र्यांना तुरुंगात टाकले. जिथे  तुमच्या मनाविरुद्ध वागतात. तुमची भूमिका स्वीकारत नाही. त्या ठिकाणी  सत्तेचा गैरवापर करून तुरुंगात टाकण्याची कामगिरी आजचे हे सरकार करत आहे  आणि त्यामुळे, यात बदल केला पाहिजे. आणि तो बदल करायचा असेल तर ती संधी मतदानाच्या निमित्ताने आपल्यासमोर आलेली आहे," असं म्हणत शरद पवार यांनी सरकारचा समाचार घेतला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNashikनाशिकNarendra Modiनरेंद्र मोदी