शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

केतकी चितळेला मी ओळखत नाही : सुप्रिया सुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 01:57 IST

केतकी चितळेला मी ओळखत नाही. शरद पवार यांनी ५५ वर्ष राजकारण केले पण कुणाविषयी अपशब्द काढले नाहीत. कारण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. कुणाविषयी असे अपशब्द बोलणे आपल्या संस्कृतीत बसत नाही. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानते. दुसऱ्या कुणावर अशी वेळ आली तर मी स्वत: उभी राहीन, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे महागाईच्या प्रश्नावर पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घ्यावी

नाशिक : केतकी चितळेला मी ओळखत नाही. शरद पवार यांनी ५५ वर्ष राजकारण केले पण कुणाविषयी अपशब्द काढले नाहीत. कारण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. कुणाविषयी असे अपशब्द बोलणे आपल्या संस्कृतीत बसत नाही. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानते. दुसऱ्या कुणावर अशी वेळ आली तर मी स्वत: उभी राहीन, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. रविवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांची हॉटेल एमराल्ड पार्क येथे पत्रकार परिषद झाली, यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली. इतर प्रश्नांपेक्षा वाढत्या महागाईचा प्रश्न महत्त्वाचा आहे. पेट्रोल, डिझेल बरोबरच गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. पंतप्रधानांनी सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन महागाईच्या प्रश्नावर चर्चा करण्याची नितांत गरज असल्याचे मत त्यांनी भोंग्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी झालेल्या जाहीर सभेतून मांडलेली भूमिका वास्तववादी असल्याचे सांगत त्या म्हणाल्या अनिल देशमुख यांना अटक करून इतके दिवस झाले आहेत. १०८ वेळा त्यांच्यावर धाडी टाकूनही त्यांच्याकडे काहीही सापडले नाही तर १०९ व्या वेळी धाड टाकण्याचा विक्रमही करण्यात आला, असे त्या म्हणाल्या. शरद पवार यांच्यावरील टीकेबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने घेतलेली भूमिका पूर्णपणे चुकीची असून याबाबत पक्षीय पातळीवर चौकशी करण्यात येत असून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल कारण ही आपली संस्कृती नसल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

चौकट-

वादानंतर नातं अधिक घट्ट होतं

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या आरोपांविषयी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, भांड्याला भांड लागलं की थोडेफार वाद हे होतातच आणि ते एक चांगले लक्षण आहे. कारण वाद झाले की नात अधिक घट्ट होत जात. त्यांनाही खासदार शरद पवार यांच्याकडून अपेक्षा आहेत, असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :NashikनाशिकSupriya Suleसुप्रिया सुळेKetaki Chitaleकेतकी चितळे