शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

केतकी चितळेला मी ओळखत नाही : सुप्रिया सुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 01:57 IST

केतकी चितळेला मी ओळखत नाही. शरद पवार यांनी ५५ वर्ष राजकारण केले पण कुणाविषयी अपशब्द काढले नाहीत. कारण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. कुणाविषयी असे अपशब्द बोलणे आपल्या संस्कृतीत बसत नाही. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानते. दुसऱ्या कुणावर अशी वेळ आली तर मी स्वत: उभी राहीन, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे महागाईच्या प्रश्नावर पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घ्यावी

नाशिक : केतकी चितळेला मी ओळखत नाही. शरद पवार यांनी ५५ वर्ष राजकारण केले पण कुणाविषयी अपशब्द काढले नाहीत. कारण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. कुणाविषयी असे अपशब्द बोलणे आपल्या संस्कृतीत बसत नाही. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानते. दुसऱ्या कुणावर अशी वेळ आली तर मी स्वत: उभी राहीन, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. रविवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांची हॉटेल एमराल्ड पार्क येथे पत्रकार परिषद झाली, यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली. इतर प्रश्नांपेक्षा वाढत्या महागाईचा प्रश्न महत्त्वाचा आहे. पेट्रोल, डिझेल बरोबरच गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. पंतप्रधानांनी सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन महागाईच्या प्रश्नावर चर्चा करण्याची नितांत गरज असल्याचे मत त्यांनी भोंग्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी झालेल्या जाहीर सभेतून मांडलेली भूमिका वास्तववादी असल्याचे सांगत त्या म्हणाल्या अनिल देशमुख यांना अटक करून इतके दिवस झाले आहेत. १०८ वेळा त्यांच्यावर धाडी टाकूनही त्यांच्याकडे काहीही सापडले नाही तर १०९ व्या वेळी धाड टाकण्याचा विक्रमही करण्यात आला, असे त्या म्हणाल्या. शरद पवार यांच्यावरील टीकेबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने घेतलेली भूमिका पूर्णपणे चुकीची असून याबाबत पक्षीय पातळीवर चौकशी करण्यात येत असून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल कारण ही आपली संस्कृती नसल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

चौकट-

वादानंतर नातं अधिक घट्ट होतं

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या आरोपांविषयी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, भांड्याला भांड लागलं की थोडेफार वाद हे होतातच आणि ते एक चांगले लक्षण आहे. कारण वाद झाले की नात अधिक घट्ट होत जात. त्यांनाही खासदार शरद पवार यांच्याकडून अपेक्षा आहेत, असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :NashikनाशिकSupriya Suleसुप्रिया सुळेKetaki Chitaleकेतकी चितळे