शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 00:17 IST

जळगाव नेऊर : कोरोना व्हायरसचा तमाशा कलावंतांना फटका बसला असून, चैत्र महिन्यात मोठ्या प्रमाणात यात्रा असतात; पण याच महिन्यात कोरोना व्हायरसची साथ पसरू लागल्याने कला सादर करण्यास शासनाने मनाई केल्याने तमाशाचे फड एकाच जागेवर उभे असून, यात्रा रद्द झाल्या आहेत. येवला तालुक्यातील पुरणगाव येथे गेल्या महिन्यात नारायणगावकर तमाशा मंडळाचा तमाशा झाला होता. कोरोनाचे संकट आले नसते तर कदाचित गुढीपाडव्यादरम्यान होणाऱ्या यात्रोत्सवानिमित्त तमाशांचे सादरीकरण झाले असते. परंतु कोरोनामुळे या कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे फ डांचे मालकदेखील अडचणीत आले आहेत.

ठळक मुद्देकोरोना : गावांच्या यात्रा रद्द; कोट्यवधींचा फटका

जळगाव नेऊर : कोरोना व्हायरसचा तमाशा कलावंतांना फटका बसला असून, चैत्र महिन्यात मोठ्या प्रमाणात यात्रा असतात; पण याच महिन्यात कोरोना व्हायरसची साथ पसरू लागल्याने कला सादर करण्यास शासनाने मनाई केल्याने तमाशाचे फड एकाच जागेवर उभे असून, यात्रा रद्द झाल्या आहेत. येवला तालुक्यातील पुरणगाव येथे गेल्या महिन्यात नारायणगावकर तमाशा मंडळाचा तमाशा झाला होता. कोरोनाचे संकट आले नसते तर कदाचित गुढीपाडव्यादरम्यान होणाऱ्या यात्रोत्सवानिमित्त तमाशांचे सादरीकरण झाले असते. परंतु कोरोनामुळे या कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे फ डांचे मालकदेखील अडचणीत आले आहेत.मार्च आणि एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात यात्रांची गजबज असते तसेच ग्रामीण भागांमध्ये शेतकरीवर्गही कामे उरकून सामाजिक व धार्मिक कामांमध्ये सहभाग घेत असतो; पण सध्या देशासह राज्यातही कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, त्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने ठिकठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून बाजारपेठा, मॉल, शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत.या कोरोना व्हायरसचा फटका तमाशा कलावंत व फडमालकाला बसत असून, उपासमारीची वेळ आली आहे.लोकनाट्य तमाशा ही जिवंत कला आजही तग धरून आहे. ग्रामस्थांचे मनोरंजन करणे आणि त्यातून मिळालेल्या मोबदल्यातून उदरनिर्वाह करणे हे चक्र अनेक वर्षापासून चालू आहे, मात्र व्याजाच्या पैशाने कलाकाराला दिलेली उचल, त्यांचा रोजचा खर्च, गुंतवलेले भांडवल, मालक आणि कलाकार दोन्ही अडचणीत सापडले आहे तेव्हा शासनाने अशा स्थितीत आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी कलाकाराकडून केली जात आहे.कोरोना व्हायरसमुळे तमाशा कलावंतांचे फार मोठे नुकसान झाले असून, काही कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दसºयापासून ते गुढीपाडव्यापर्यंत तिकिटावर खेळ चालतो; पण आता सध्याच्या दीड महिन्याच्या काळात मोठ्या प्रमाणात सीझन असतो. त्यामुळे उचललेले कर्ज कसे फेडायचे, तेव्हा शासनाने तात्काळ मदत घ्यावी नाहीतर पुढील वर्षी तमाशा फड उभे राहणार नाही.-मोहित नारायणगावकर, संचालक, विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर तमाशा मंडळ

टॅग्स :Nashikनाशिकnarayangaonनारायणगाव