शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 00:17 IST

जळगाव नेऊर : कोरोना व्हायरसचा तमाशा कलावंतांना फटका बसला असून, चैत्र महिन्यात मोठ्या प्रमाणात यात्रा असतात; पण याच महिन्यात कोरोना व्हायरसची साथ पसरू लागल्याने कला सादर करण्यास शासनाने मनाई केल्याने तमाशाचे फड एकाच जागेवर उभे असून, यात्रा रद्द झाल्या आहेत. येवला तालुक्यातील पुरणगाव येथे गेल्या महिन्यात नारायणगावकर तमाशा मंडळाचा तमाशा झाला होता. कोरोनाचे संकट आले नसते तर कदाचित गुढीपाडव्यादरम्यान होणाऱ्या यात्रोत्सवानिमित्त तमाशांचे सादरीकरण झाले असते. परंतु कोरोनामुळे या कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे फ डांचे मालकदेखील अडचणीत आले आहेत.

ठळक मुद्देकोरोना : गावांच्या यात्रा रद्द; कोट्यवधींचा फटका

जळगाव नेऊर : कोरोना व्हायरसचा तमाशा कलावंतांना फटका बसला असून, चैत्र महिन्यात मोठ्या प्रमाणात यात्रा असतात; पण याच महिन्यात कोरोना व्हायरसची साथ पसरू लागल्याने कला सादर करण्यास शासनाने मनाई केल्याने तमाशाचे फड एकाच जागेवर उभे असून, यात्रा रद्द झाल्या आहेत. येवला तालुक्यातील पुरणगाव येथे गेल्या महिन्यात नारायणगावकर तमाशा मंडळाचा तमाशा झाला होता. कोरोनाचे संकट आले नसते तर कदाचित गुढीपाडव्यादरम्यान होणाऱ्या यात्रोत्सवानिमित्त तमाशांचे सादरीकरण झाले असते. परंतु कोरोनामुळे या कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे फ डांचे मालकदेखील अडचणीत आले आहेत.मार्च आणि एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात यात्रांची गजबज असते तसेच ग्रामीण भागांमध्ये शेतकरीवर्गही कामे उरकून सामाजिक व धार्मिक कामांमध्ये सहभाग घेत असतो; पण सध्या देशासह राज्यातही कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, त्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने ठिकठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून बाजारपेठा, मॉल, शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत.या कोरोना व्हायरसचा फटका तमाशा कलावंत व फडमालकाला बसत असून, उपासमारीची वेळ आली आहे.लोकनाट्य तमाशा ही जिवंत कला आजही तग धरून आहे. ग्रामस्थांचे मनोरंजन करणे आणि त्यातून मिळालेल्या मोबदल्यातून उदरनिर्वाह करणे हे चक्र अनेक वर्षापासून चालू आहे, मात्र व्याजाच्या पैशाने कलाकाराला दिलेली उचल, त्यांचा रोजचा खर्च, गुंतवलेले भांडवल, मालक आणि कलाकार दोन्ही अडचणीत सापडले आहे तेव्हा शासनाने अशा स्थितीत आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी कलाकाराकडून केली जात आहे.कोरोना व्हायरसमुळे तमाशा कलावंतांचे फार मोठे नुकसान झाले असून, काही कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दसºयापासून ते गुढीपाडव्यापर्यंत तिकिटावर खेळ चालतो; पण आता सध्याच्या दीड महिन्याच्या काळात मोठ्या प्रमाणात सीझन असतो. त्यामुळे उचललेले कर्ज कसे फेडायचे, तेव्हा शासनाने तात्काळ मदत घ्यावी नाहीतर पुढील वर्षी तमाशा फड उभे राहणार नाही.-मोहित नारायणगावकर, संचालक, विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर तमाशा मंडळ

टॅग्स :Nashikनाशिकnarayangaonनारायणगाव