शहरं
Join us  
Trending Stories
1
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
3
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
4
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
5
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
6
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
7
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
8
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
9
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
10
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
11
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

कांद्याचा पुन्हा वांधा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 23:08 IST

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन घोषित झाल्यानंतर येथील बाजार समितीत कांदा आणि धान्याचे लिलाव बंद करण्यात आले आहेत. हजारो टन कांदा शेतकऱ्यांच्या खळ्यावर पडून असून, प्रामुख्याने नाशवंत लाल कांद्याची वेळेत विक्री झाली नाही तर बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण होऊन भाव भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देकोरोनामुळे लिलाव बंद : तुटवड्यामुळे भाव भडकण्याची भीती

लासलगाव : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन घोषित झाल्यानंतर येथील बाजार समितीत कांदा आणि धान्याचे लिलाव बंद करण्यात आले आहेत. हजारो टन कांदा शेतकऱ्यांच्या खळ्यावर पडून असून, प्रामुख्याने नाशवंत लाल कांद्याची वेळेत विक्री झाली नाही तर बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण होऊन भाव भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, वाशी मार्केटप्रमाणेच येथील कांदा आणि धान्याचे लिलाव पूर्ववत सुरू करण्यासाठी समिती पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत.कोरोनामुळे एकूणच अर्थकारणावर परिणाम झाला आहे. गुरुवारपासून (दि.२६) मजुराअभावी व्यापारीवर्गाने कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कांदा व धान्याचे लिलाव बंद पडले आहेत. परिणामी कांद्यासारखा नाशवंत माल बाहेर जाणे थांबले आहे.अशा स्थितीत बाजार समितीचे लिलाव पूर्ववत सुरू करण्याचे मोठे आव्हान बाजार समितीपुढे उभे ठाकले आहे. वास्तविक यापूर्वी खरेदी केलेला कांदा आजही व्यापारीवर्गाच्या कांदा खळ्यावर पडून आहे. लासलगाव येथील लिलाव बंद असले तरी विंचूर येथील लिलाव सकाळच्या सत्रात सुरू आहेत. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झालेली आहे. मात्र, शहरी भागात तसेच मुंबई-पुणे या दोन मोठ्या शहरात अन्नधान्याचा पुरवठा तसेच दूध-भाजीपाल्याचे वितरण होणे आवश्यक बनले आहे. लासलगाव येथील व्यापारीवर्गाच्या कांदा मालट्रकला परराज्यात विशेषत: उत्तर प्रदेशात व मध्य प्रदेशात रोखून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे तेथून माल पाठविलेल्या ठिकाणी कांदा मालट्रक पाठविणेकरिता बाजात समितीकडून पत्र तसेच विविध ना हरकत पत्र पाठविण्याचे काम केले जात आहे.कोरोनाची दहशत वाढलेली असतानाच बुधवारी (दि.२५) अवकाळी पावसाने दणका दिला. काही कांदा उत्पादकांच्या शेतात काढलेला कांदा पोळ करून पडून आहे. अशा अवस्थेत उन्हाळा कांदा सोडला तर लाल कांदा विक्र ी होणे अत्यंत गरजेचे आहे. कांदा वेळेवर नागरिकांना गेला नाही तर कृत्रिम टंचाई व भाववाढीचे कारणाने परत कांदा महागला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.लिलाव प्रक्रियेबाबत अनिश्चिततालासलगाव येथील कांदा बाजारपेठेत बाराशे ते चौदाशे वाहने कांदा व शेतमाल विक्र ीकरिता घेऊन येतात. प्रत्येकी दोन या प्रमाणे अडीच हजार लोक बाजारपेठेत दररोज असतात. या शिवाय खरेदीदार व्यापारी, अडते, व्यापारी गुमास्ते (मदतनीस), बाजार समितीचे शेतमालाचे लिलाव व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणारे कर्मचारी असे किमान तीन हजार लोक या प्रक्रि येला लागतात तर कांदा अगर शेतमाल खरेदीनंतर वजनमापास मापारी, हमाल व त्यानंतर त्याची प्रतवारी करण्यासाठी महिला मजूर लागतात. तसेच मालट्रक अगर कंटेनरने माल रवाना करण्यासाठी हमाल लागतात अशा पद्धतीने लासलगावचे बाजार समितीत कांदा अगर शेतमाल खरेदी नंतर सुरळीत रवाना होतो. मात्र सध्या परिस्थिती परस्परांच्या विरुद्ध आहे. संचारबंदी लागू झाल्याने एवढी सारी यंत्रणा एकाच ठिकाणी एकवटणार काय, याबाबतही प्रश्नचिन्ह कायम आहे. त्यामुळे लिलाव प्रक्रियेबाबत अनिश्चितता आहे.लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे आणि धान्याचे लिलाव पूर्ववत कसे करता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कांदा नाशवंत असल्याने त्याची तातडीने विक्री होणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधितांशी संपर्क, चर्चा चालू आहे. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.- सुवर्णा जगताप, सभापती, लासलगाव बाजार समिती

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याonionकांदा