शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याचा पुन्हा वांधा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 23:08 IST

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन घोषित झाल्यानंतर येथील बाजार समितीत कांदा आणि धान्याचे लिलाव बंद करण्यात आले आहेत. हजारो टन कांदा शेतकऱ्यांच्या खळ्यावर पडून असून, प्रामुख्याने नाशवंत लाल कांद्याची वेळेत विक्री झाली नाही तर बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण होऊन भाव भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देकोरोनामुळे लिलाव बंद : तुटवड्यामुळे भाव भडकण्याची भीती

लासलगाव : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन घोषित झाल्यानंतर येथील बाजार समितीत कांदा आणि धान्याचे लिलाव बंद करण्यात आले आहेत. हजारो टन कांदा शेतकऱ्यांच्या खळ्यावर पडून असून, प्रामुख्याने नाशवंत लाल कांद्याची वेळेत विक्री झाली नाही तर बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण होऊन भाव भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, वाशी मार्केटप्रमाणेच येथील कांदा आणि धान्याचे लिलाव पूर्ववत सुरू करण्यासाठी समिती पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत.कोरोनामुळे एकूणच अर्थकारणावर परिणाम झाला आहे. गुरुवारपासून (दि.२६) मजुराअभावी व्यापारीवर्गाने कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कांदा व धान्याचे लिलाव बंद पडले आहेत. परिणामी कांद्यासारखा नाशवंत माल बाहेर जाणे थांबले आहे.अशा स्थितीत बाजार समितीचे लिलाव पूर्ववत सुरू करण्याचे मोठे आव्हान बाजार समितीपुढे उभे ठाकले आहे. वास्तविक यापूर्वी खरेदी केलेला कांदा आजही व्यापारीवर्गाच्या कांदा खळ्यावर पडून आहे. लासलगाव येथील लिलाव बंद असले तरी विंचूर येथील लिलाव सकाळच्या सत्रात सुरू आहेत. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झालेली आहे. मात्र, शहरी भागात तसेच मुंबई-पुणे या दोन मोठ्या शहरात अन्नधान्याचा पुरवठा तसेच दूध-भाजीपाल्याचे वितरण होणे आवश्यक बनले आहे. लासलगाव येथील व्यापारीवर्गाच्या कांदा मालट्रकला परराज्यात विशेषत: उत्तर प्रदेशात व मध्य प्रदेशात रोखून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे तेथून माल पाठविलेल्या ठिकाणी कांदा मालट्रक पाठविणेकरिता बाजात समितीकडून पत्र तसेच विविध ना हरकत पत्र पाठविण्याचे काम केले जात आहे.कोरोनाची दहशत वाढलेली असतानाच बुधवारी (दि.२५) अवकाळी पावसाने दणका दिला. काही कांदा उत्पादकांच्या शेतात काढलेला कांदा पोळ करून पडून आहे. अशा अवस्थेत उन्हाळा कांदा सोडला तर लाल कांदा विक्र ी होणे अत्यंत गरजेचे आहे. कांदा वेळेवर नागरिकांना गेला नाही तर कृत्रिम टंचाई व भाववाढीचे कारणाने परत कांदा महागला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.लिलाव प्रक्रियेबाबत अनिश्चिततालासलगाव येथील कांदा बाजारपेठेत बाराशे ते चौदाशे वाहने कांदा व शेतमाल विक्र ीकरिता घेऊन येतात. प्रत्येकी दोन या प्रमाणे अडीच हजार लोक बाजारपेठेत दररोज असतात. या शिवाय खरेदीदार व्यापारी, अडते, व्यापारी गुमास्ते (मदतनीस), बाजार समितीचे शेतमालाचे लिलाव व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणारे कर्मचारी असे किमान तीन हजार लोक या प्रक्रि येला लागतात तर कांदा अगर शेतमाल खरेदीनंतर वजनमापास मापारी, हमाल व त्यानंतर त्याची प्रतवारी करण्यासाठी महिला मजूर लागतात. तसेच मालट्रक अगर कंटेनरने माल रवाना करण्यासाठी हमाल लागतात अशा पद्धतीने लासलगावचे बाजार समितीत कांदा अगर शेतमाल खरेदी नंतर सुरळीत रवाना होतो. मात्र सध्या परिस्थिती परस्परांच्या विरुद्ध आहे. संचारबंदी लागू झाल्याने एवढी सारी यंत्रणा एकाच ठिकाणी एकवटणार काय, याबाबतही प्रश्नचिन्ह कायम आहे. त्यामुळे लिलाव प्रक्रियेबाबत अनिश्चितता आहे.लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे आणि धान्याचे लिलाव पूर्ववत कसे करता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कांदा नाशवंत असल्याने त्याची तातडीने विक्री होणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधितांशी संपर्क, चर्चा चालू आहे. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.- सुवर्णा जगताप, सभापती, लासलगाव बाजार समिती

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याonionकांदा