शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

कांद्याचा पुन्हा वांधा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 23:08 IST

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन घोषित झाल्यानंतर येथील बाजार समितीत कांदा आणि धान्याचे लिलाव बंद करण्यात आले आहेत. हजारो टन कांदा शेतकऱ्यांच्या खळ्यावर पडून असून, प्रामुख्याने नाशवंत लाल कांद्याची वेळेत विक्री झाली नाही तर बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण होऊन भाव भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देकोरोनामुळे लिलाव बंद : तुटवड्यामुळे भाव भडकण्याची भीती

लासलगाव : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन घोषित झाल्यानंतर येथील बाजार समितीत कांदा आणि धान्याचे लिलाव बंद करण्यात आले आहेत. हजारो टन कांदा शेतकऱ्यांच्या खळ्यावर पडून असून, प्रामुख्याने नाशवंत लाल कांद्याची वेळेत विक्री झाली नाही तर बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण होऊन भाव भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, वाशी मार्केटप्रमाणेच येथील कांदा आणि धान्याचे लिलाव पूर्ववत सुरू करण्यासाठी समिती पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत.कोरोनामुळे एकूणच अर्थकारणावर परिणाम झाला आहे. गुरुवारपासून (दि.२६) मजुराअभावी व्यापारीवर्गाने कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कांदा व धान्याचे लिलाव बंद पडले आहेत. परिणामी कांद्यासारखा नाशवंत माल बाहेर जाणे थांबले आहे.अशा स्थितीत बाजार समितीचे लिलाव पूर्ववत सुरू करण्याचे मोठे आव्हान बाजार समितीपुढे उभे ठाकले आहे. वास्तविक यापूर्वी खरेदी केलेला कांदा आजही व्यापारीवर्गाच्या कांदा खळ्यावर पडून आहे. लासलगाव येथील लिलाव बंद असले तरी विंचूर येथील लिलाव सकाळच्या सत्रात सुरू आहेत. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झालेली आहे. मात्र, शहरी भागात तसेच मुंबई-पुणे या दोन मोठ्या शहरात अन्नधान्याचा पुरवठा तसेच दूध-भाजीपाल्याचे वितरण होणे आवश्यक बनले आहे. लासलगाव येथील व्यापारीवर्गाच्या कांदा मालट्रकला परराज्यात विशेषत: उत्तर प्रदेशात व मध्य प्रदेशात रोखून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे तेथून माल पाठविलेल्या ठिकाणी कांदा मालट्रक पाठविणेकरिता बाजात समितीकडून पत्र तसेच विविध ना हरकत पत्र पाठविण्याचे काम केले जात आहे.कोरोनाची दहशत वाढलेली असतानाच बुधवारी (दि.२५) अवकाळी पावसाने दणका दिला. काही कांदा उत्पादकांच्या शेतात काढलेला कांदा पोळ करून पडून आहे. अशा अवस्थेत उन्हाळा कांदा सोडला तर लाल कांदा विक्र ी होणे अत्यंत गरजेचे आहे. कांदा वेळेवर नागरिकांना गेला नाही तर कृत्रिम टंचाई व भाववाढीचे कारणाने परत कांदा महागला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.लिलाव प्रक्रियेबाबत अनिश्चिततालासलगाव येथील कांदा बाजारपेठेत बाराशे ते चौदाशे वाहने कांदा व शेतमाल विक्र ीकरिता घेऊन येतात. प्रत्येकी दोन या प्रमाणे अडीच हजार लोक बाजारपेठेत दररोज असतात. या शिवाय खरेदीदार व्यापारी, अडते, व्यापारी गुमास्ते (मदतनीस), बाजार समितीचे शेतमालाचे लिलाव व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणारे कर्मचारी असे किमान तीन हजार लोक या प्रक्रि येला लागतात तर कांदा अगर शेतमाल खरेदीनंतर वजनमापास मापारी, हमाल व त्यानंतर त्याची प्रतवारी करण्यासाठी महिला मजूर लागतात. तसेच मालट्रक अगर कंटेनरने माल रवाना करण्यासाठी हमाल लागतात अशा पद्धतीने लासलगावचे बाजार समितीत कांदा अगर शेतमाल खरेदी नंतर सुरळीत रवाना होतो. मात्र सध्या परिस्थिती परस्परांच्या विरुद्ध आहे. संचारबंदी लागू झाल्याने एवढी सारी यंत्रणा एकाच ठिकाणी एकवटणार काय, याबाबतही प्रश्नचिन्ह कायम आहे. त्यामुळे लिलाव प्रक्रियेबाबत अनिश्चितता आहे.लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे आणि धान्याचे लिलाव पूर्ववत कसे करता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कांदा नाशवंत असल्याने त्याची तातडीने विक्री होणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधितांशी संपर्क, चर्चा चालू आहे. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.- सुवर्णा जगताप, सभापती, लासलगाव बाजार समिती

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याonionकांदा