शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हरित भविष्यासाठी नाशिक देवराईमध्ये एकत्र आले शेकडो हात

By अझहर शेख | Updated: June 5, 2023 19:51 IST

काही तासांत १६०० रोपांची लागवड

अझहर शेख, नाशिक: सातपूरजवळील पश्चिम वनविभागाच्या वनजमिनीवर उदयास आलेल्या ‘नाशिक देवराई’मध्ये शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, खासगी संस्था, वैद्यकीय संस्थांच्या लोकांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षलागवड केली. आपलं पर्यावरण संस्थेकडून यावर्षी या वनात ४५ प्रजातीच्या आंब्यांच्या सुमारे दीड हजार रोपांची लागवड करण्याचा उपक्रम सोमवारी (दि. ५) घेण्यात आला. यावेळी आबालवृद्धांचे शेकडो हात हरित भविष्यासाठी एकत्र आल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सोमवारी सकाळपासूनच विविध शाळा, महाविद्यालयांसह खासगी संस्थांच्या लोकांनी देवराई गाठण्यास सुरुवात केली. वृक्षारोपणासाठी आलेल्या नागरिकांपैकी बहुसंख्य लोकांनी सोबत झाडांना टाकण्यासाठी पाणीदेखील आणले होते. देवराईमध्ये आमराई साकारण्याचा आपलं पर्यावरण संस्थेने संकल्प सोडला आहे.

पहिल्या टप्प्यात शेंदऱ्या, कुईरी, कवट्या, गोटी, लोणचा, शेप्या, ब्रह्मपुरी यांसारख्या बारा आंब्याच्या प्रजातींची १६० झाडे लावण्यात आली. याव्यतिरिक्त वरस, पायर, गोंदण, भिरा, कुसुम, करपा, मोई, जंगली अजान, खटखटी, पाडळ, कुंकू, खडकपायर, तुतु, निमई यासारख्या देशी प्रजातीच्या रोपांचीही आलेल्या लोकांनी लागवड केली. दिवसभरात याठिकाणी एकूण १ हजार ६६० रोपांची लागवड पूर्ण करण्यात आल्याची माहिती संस्थेचे शेखर गायकवाड यांनी दिली. संस्थेच्या स्वयंसेवकांकडून या वनात खड्डे खोदून त्यात पाण्याचा ओलावा देत खत टाकून खड्डे वृक्षारोपणासाठी सज्ज ठेवण्यात आले होते. वृक्षप्रेमी आबालवृद्धांना रोपे पुरवून लोकसहभागातून लागवड करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक दिनकर पाटील, तानाजी जायभावे, वनपरिक्षेत्र अधिकारी वृषाली गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :environmentपर्यावरण