शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मालेगावी आगीत शंभर झोपड्या खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:59 IST

शहरातील गोल्डननगर भागातील नागछाप झोपडपट्टीला अचानक आग लागून सुमारे १०० झोपड्या जळून खाक झाल्या. या आगीत नऊ घरगुती सिलिंडरचा स्फोट झाला, तर संसारोपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल तीन तास शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. बघ्यांची गर्दी व अरूंद रस्त्यांमुळे मदत कार्यास अडथळा निर्माण झाला होता.

मालेगाव : शहरातील गोल्डननगर भागातील नागछाप झोपडपट्टीला अचानक आग लागून सुमारे १०० झोपड्या जळून खाक झाल्या. या आगीत नऊ घरगुती सिलिंडरचा स्फोट झाला, तर संसारोपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल तीन तास शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. बघ्यांची गर्दी व अरूंद रस्त्यांमुळे मदत कार्यास अडथळा निर्माण झाला होता.  शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शहरातील गोल्डननगर भागातील नागछाप झोपडपट्टीला अचानक भीषण आग लागली. प्रारंभी लागलेल्या आगीने काहीवेळातच रौद्ररूप धारण केले होते. नागछाप झोपडपट्टीतील घरे अगदी जवळ असल्याने आग वाढत गेली. या आगीत सुमारे १०० झोपड्या जळून खाक झाल्या. तसेच संसारोपयोगी वस्तू, धान्य, साहित्य जळून खाक झाले. आगीने धारण केलेल्या रौद्रारूपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.या भागातील नागरिकांनी जीव मुठीत धरून घरातील सिलिंडर उचलून वस्तीबाहेर पळ काढला. या आगीमुळे सुमारे ९ घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच मालेगाव अग्निशमन दलाचे सात बंब, मनमाड, सटाणा, धुळे येथील बंबांनी सुमारे ५० फेऱ्या मारून तब्बल साडेतीन तास शर्थीॅच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. घटनास्थळी महापौर रशीद शेख, अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल, पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, अग्निशमन दल विभागप्रमुख संजय पवार आदिंनी धाव घेऊन आढावा घेतला. आयेशानगरचे पोलीस निरीक्षक मसूद खान, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक व्ही. एन. ठाकूरवाड आदींसह पोलीस कर्मचाºयांनी चोख बंदोबस्त ठेवत अग्निशमन दलाच्या बंबांना रस्ता मोकळा करून दिला होता. महसूल विभागाकडून या आगीच्या नुकसानीची पंचनामे केले जाणार आहेत. आगीचे कारण समजू शकले नाही.टारगट तरुणांमुळे अग्निशमन बंबाला अडथळेरात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. या आगीत हजारो रूपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आग विझविण्याच्या कामात अधिकारी व कर्मचाºयांना अडचणी निर्माण होत होत्या. काही टारगट तरुणांमुळे अग्निशमन बंब घटनास्थळी नेण्यासाठी अडथळे निर्माण झाले होते.

टॅग्स :Fairजत्रा