शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

मुक्या जनावरांचा चाऱ्यासाठी हंबरडा

By admin | Updated: May 6, 2016 00:33 IST

दुष्काळात तेरावा : नांदगावच्या अधिकाऱ्यांची उदासीनता; शेतकरी हतबल

नांदगाव : सगळ्याच प्रश्नाकडे तटस्थपणे बघणाऱ्या प्रशासनाने पिण्याच्या पाण्यापाठोपाठ आता जनावरांना मुबलक चारा उपलब्ध असल्याच्या दावा आपल्या अहवालात दिल्याने आता जणू दुष्काळाची स्थिती नाही अशा थाटात नामनिराळे होण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याने चारा-पाण्याची मागणी घेऊन आलेल्या गरजू शेतकऱ्यांना हताश होण्याची वेळ आली आहे. प्रशासन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालण्याऐवजी सब कुछ आलबेल असल्याची बतावणी करीत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे सर्वत्र एकच संतापाची लाट उसळली आहे. एरवी कागदी घोडे नाचविणारे प्रशासन पाणी चाऱ्याच्या मुद्द्यावरदेखील संवेदनशील नसल्याचे निदर्शनास आले आहे. दुष्काळाची भीषण दाहकता समोर असताना केवळ सोपस्काराच्या भूमिकेत वावरताना धन्यता मानताना दिसत आहे. विशेष म्हणजे तालुक्यात चाऱ्याची जणू गरजच नसल्याचे दाखविताना ४१ हजार मेट्रिक टन चारा तालुक्यात उपलब्ध असून, तो ३६८ दिवस पुरेल असा तालुका कृषी कार्यालयाच्या व पशुधन विकास विभागाचे हवाल्याने असा अहवाल नांदगावच्या तहसीलदारांना दिला आहे, तर दुसरीकडे जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी नांदगाव तालुक्यात ८६ हजार लहान मोठ्या जनावरांसाठी प्रतिमाह १४ हजार ९६३ मेट्रिक टन चारा सध्या १ लाख ४४ हजार मेट्रिक टन चारा असल्याचे म्हटले आहे. एकाच विषयावर असे परस्परविरोधी अहवाल असले तरी त्यात एक समानता आहे. ती म्हणजे तालुक्यात चारा उपलब्ध असल्याची. प्रत्यक्षात तालुक्यात चाऱ्याची काय अवस्था आहे हे नांदगावच्या तहसीलदाराकडे याबाबतीत नोंदविलेल्या मागणीवरून लक्षात यावे. तालुक्याच्या पानेवाडी, नागापूर, धोटाणे, कऱ्ही, जोंधळवाडी, अस्तगाव, शास्त्रीनगर यांसह विविध गावातील शंभरहून शेतकऱ्यांनी गेल्या महिन्यापासूनच आपल्या जनावरांसाठी पिण्याचे पाणी तसेच चाऱ्याची मागणी नोंदविले मात्र शासकीय नियमाचा बागुलबुवा उभा करीत शेतकऱ्यांना अडचणींचा पाढा वाचत प्रशासनाने त्यांना झुलते ठेवले आहे. सध्या मिळेल त्या ठिकाणाहून चारा आणावा लागत आहे. चारा आणि पाणीटंचाईने तोंड वर काढल्याने तालुक्यातील शेळ्या-मेंढ्यासह लहान-मोठ्या जनावरांचे हाल सुरू आहेत. पशुधन जगविण्यासाठी शेतकरी कष्ट घेत असला तरी मेंढपाळांसह पशुपालकांना चारा आणि पाण्याची सोय करताना नाकी नऊ आले आहे. तालुक्यातील चाऱ्याचे सर्व स्त्रोत संपले असून, अपवाद वगळता सर्वत्र विकतचा चारा घेऊनच जनावरे वाचविण्याची वेळ आली आहे. शेळ्या-मेंढ्यावगळता लहान जनावरांना प्रतिदिन साडेसात किलो चारा लागतो तर मोठ्या जनावरांना प्रतिदिन पंधरा ते वीस किलो चारा गरजेचा आहे. केवळ ८६ हजार लहानमोठ्या जनावरांचा विचार करता तालुक्यात दररोज १२ लाख ते तेरा लाख किलो इतका चारा अपेक्षित आहे. तर लहान जनावरांना प्रतिदिन ४० लिटर तर मोठ्या जनावरांना ८० लिटर इतके पाणी लागते पाण्याच्या या गणितीनुसार चाळीस ते पन्नास लाख लिटर पाणी हवे आहे प्रत्यक्षात सध्या माणसाना पाणी देतानाच खळखळ करणाऱ्या प्रशासन जनावरांना पाणी देताना नियमनाचा अडथळा आणताना दिसत आहे. त्यासाठी परिपत्रकांचा आधार घ्यावा लागत आहे. नांदगाव तालुक्यातील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न किती उग्र बनला आहे याचा दाहक अनुभव तालुक्यातील भालूर येथे दिसून आला. एकीकडे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असताना आता जनावरांच्या चाऱ्यासोबत पाण्याची मागणी आता वाढू लागली आहे. भालूर गावात जनावरासाठी चक्क केळीचे कंद मागवून जनावरांची वैरणीची सोय करावी लागत असल्याचे बघावयास मिळत आहे. उसाचा भाव परवडत नसल्याने केळी कंद वापरण्याची वेळ भालूरचे शेतकरी गोविंद तळेकर यांच्यावर आली. तळेकर यांच्याकडे सध्या जेमतेम कडबा शिल्लक असल्याने चाळीसगावजवळील नागद (ता. कन्नड) येथून केळीचे कंद आणावे लागत आहे तर आज तहसीलदार गवांदे यांना संतप्त महिलांचा अनुभव घ्यावा लागला. जतपुरा रस्त्याकडील गवळी वस्तीवरच्या महिला तहसीलदार गवांदे यांना आमची जनावरे जगवायची कशी असा सवाल करीत जनावरे तहसील आवारात आणून सोडू असे सांगत होत्या. एकूणच तालुक्यातील मुक्या जनावरांचा हंबरडा कुणाला ऐकू जाणार असा प्रश्न मात्र उभा राहिला आहे. (वार्ताहर)