शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

मनुष्याने सदैव सत्कर्म करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 1:13 AM

संन्यासातून शाश्वत फलप्राप्ती होत असते. सदैव चांगले कर्म केले पाहिजे. मन, चित्त शुद्धीसाठी कर्माचे अनुष्ठान करावे व नंतर ज्ञानाच्या मार्गाचा अवलंब करावा, असे प्रतिपादन दक्षिणाम्नाय शृंगेरी शारदा पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य विधुशेखर भारती महास्वामी यांनी केले.

ठळक मुद्देशंकराचार्य विधुशेखर भारती : कैलास मठात पाद्यपूजन सोहळा

पंचवटी : संन्यासातून शाश्वत फलप्राप्ती होत असते. सदैव चांगले कर्म केले पाहिजे. मन, चित्त शुद्धीसाठी कर्माचे अनुष्ठान करावे व नंतर ज्ञानाच्या मार्गाचा अवलंब करावा, असे प्रतिपादन दक्षिणाम्नाय शृंगेरी शारदा पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य विधुशेखर भारती महास्वामी यांनी केले. पेठरोडवरील कैलासनाथ भक्तिधाम येथे शनिवारी (दि.१२) सायंकाळी शृंगेरी जगद्गुरू शंकराचार्य पाद्यपूजा व दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.शनिवारी सायंकाळी शंकराचार्यांनी कैलास मठास भेट दिली त्यावेळी शंकराचार्यांचा पाद्यपूजन सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी उपस्थित भाविकांना आशीर्वचनपर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, जगद्गुरू शंकराचार्यांनी आपल्या देशात हजारो वर्षांपूर्वी अवतार घेऊन सनातन धर्माचा उद्धार केला आहे. प्रत्येक व्यक्तीला धर्म मार्गात जाण्याची प्रेरणा दिली आहे. आश्रमात सर्वश्रेष्ठ संन्यास आश्रम आहे. शंकराचार्य नसते तर आपण वैदिक विद्या बघू शकलो नसतो. शंकराचार्यांविषयी श्रद्धेने राहायला पाहिजे. या पाद्यपूजन सोहळ्याला स्वामी रामतीर्थजी महाराज, निश्चयानंद महाराज, श्याम चैतन्य, ब्रह्मदत्त शर्मा, स्वामी अलोकानंदा, डॉ. दिनेश बच्छाव, आर. आर. पाटील, भालचंद्र शेवचे आदींसह भाविक उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम