शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

अंतीम परीक्षेत विद्यार्थी संघटना पास कशा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 22:02 IST

परीक्षा घेण्याच्या बाजूने एक गट आणि परीक्षा रद्द करण्याच्या बाजूने दुसरा गट उभा राहिला असून विद्यार्थी संघटनांमध्येच अंतीम परीक्षांवरून रंगलेल्या राजकारणात विद्यार्थ्यांचे हित साधण्यासाची विद्यार्थी संघटनांनाही अंतीम परीक्षा द्यावी लागणार आहे.

ठळक मुद्देविद्यार्थी संघटनांची लागणार कसोटी विद्यार्थी हित साधण्याची द्यावी लागणार परीक्षा

नाशिक : राज्यातील पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करावी, अशी मागणी एका बाजूने होत असताना राज्य सरकारने परीक्षा रद्द करण्याची भूमिका घेतली तर विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्गदर्शक सुचना जारी करून अंतीम परीक्षा घेण्याच्या सुचना विद्यापीठाना केल्या. त्यामुळे परीक्षा घेण्याच्या बाजूने एक गट आणि परीक्षा रद्द करण्याच्या बाजूने दुसरा गट उभा राहिला असून विद्यार्थी संघटनांमध्येच अंतीम परीक्षांवरून रंगलेल्या राजकारणात विद्यार्थ्यांचे हित साधण्यासाची विद्यार्थी संघटनांनाही अंतीम परीक्षा द्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांचा अवडंब करून शैक्षणिक संकुलांमध्ये राजकीय पक्षांची विचार धारा घुसविणाºया वेगवेगळ््या विद्यार्थी संघटनांनी विद्यार्थी हित जपण्यासाठी केलेले काम तसे क्वचितच असले तरी वेगलवेगळ्या वादांमध्ये दोन संघटना आमने सामने येण्याचे प्रकारच अधिक ऐकिवात येतात. ही परिस्थिती गल्लीपासून दिल्लीपर्यंत सारखीच दिसून येते. नाशिकमध्ये एका नामांकित महाविद्यालयासमोर अशाप्रकारे दोन विद्यार्थी संघटना आमने सामने येण्याचा प्रकार मागील शैक्षणिक वर्षात घडला असून एका विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयासमोर दुसºया राजकीय पक्षाच्या विद्यार्थी शाखेने धुडगुस घालण्याचा प्रयत्न केल्याने थेट पोलिसांना आणि दंगल नियंत्रण पथकालाही पाचारण करावे लागले होते. अशा संघटना आता अंतीम परीक्षेच्या मुद्यांवरून कायदेशीर मार्गाने आणि राजकीय मार्गानेही आमने सामने आल्या असून परस्पर विरोधात  विद्यार्थी हिताचा मात्र विचार दुय्यम ठरताना दिसून येत आहे.  खरे तर विद्यार्थी संघटनांना त्या खरोखर विद्यार्थ्यांसाठीच काम करीत असल्याचे दाखवून देण्याची कसोटी अर्थात परीक्षाच आहे. परंतू ही परीक्षा देण्यापूर्वी अंतीम परीक्षेविषयी प्रत्यक्षात  विद्यार्थ्यांचे काय मत आहे, हे जाणून घेण्याची कोणतीही संघटना प्रयत्न करताना दिसून येत नाही. त्याचप्रमाणे परीक्षांचे नियोजन झाले तर ते ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागातील विद्यार्थ्यांसाठी सोयिस्कर कसे ठरू शकेल याविषयी अभ्यास करण्याची तयारीही कोणत्याही विद्यार्थी संघटनेची दिसून येत नाही. अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या मानसिक तेचा अभ्यास न करताच अंतीम परीक्षांच्या मुद्यावरून राजकारणाच्या आखाड्यात उतरलेल्या विद्यार्थी संघटना कोरोनाच्या संकटाच्या काळात प्रत्यक्षात विद्यार्थ्यांकडून घेतल्या जात असलेल्या अंतीम परीक्षेत कशा पास होणार असा प्रश्न निर्माण झाला असून तो सध्या तरी अनुत्तरीतच असल्याचे दिसून येत आहे.  

टॅग्स :Educationशिक्षणNashikनाशिक