शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
4
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
5
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
8
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
9
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
10
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
11
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
12
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
13
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
14
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
15
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
16
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
17
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
18
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
19
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
20
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले

दिवाळीत कोणी किती फटाके फोडले? पंचवटी परिसर शहरात सर्वांत पुढे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 16:36 IST

नाशिक - मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता आल्याने फटाक्यांची आतषबाजी वाढल्याचे दिसून आले. परिणामी शहरातील ध्वनी आणि ...

नाशिक - मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता आल्याने फटाक्यांची आतषबाजी वाढल्याचे दिसून आले. परिणामी शहरातील ध्वनी आणि वायू प्रदूषणात आठ टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदणींवरून समोर आली आहे. शहरात पंचवटी परिसरात ७९.९ डेसिबल आवाजाची नोंद झाली.

दिवाळीत फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे शहरात दरवर्षी ध्वनी आणि वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात भर पडते. मात्र मागील वर्षी कोरोनाचे निर्बंध असल्याने नागरिकांनी कमी प्रमाणात फटाके फोडले होते. त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण देखील घटले होते. यंदा निर्बंध बऱ्यापैकी शिथिल झाल्याने आणि कोरोनाबाधितांची संख्या घटल्याने नागरिकांनी घराबाहेर पडत फटाक्यांची आतषबाजी केली. त्यामुळे शहरातील हवा प्रदूषित झाली आहे. तसेच ध्वनी प्रदूषणात देखील वाढ नोंदवली गेली आहे. मागील वर्षी पंचवटी परिसरात ७४.४ डेसिबल आवाजाची नोंद झाली होती, यंदा त्यात वाढ होऊन ७९.९ डेसिबलची नोंद झाली आहे. शहरातील इतर भागांमध्येही प्रदूषण पातळी वाढल्याची आकडेवारी समोर आली असून, त्यामुळे दमा व श्वसनाचे आजार असलेले नागरिक त्रस्त आहेत.

कोणत्या परिसरात किती प्रदूषण

ठिकाण--------आवाज (डेसिबल)

पंचवटी ---------७९.९

बिटको पॉईंट---७२.७

सीबीएस -------६३.९

प्रदूषित शहरांमध्ये नाशिकचा समावेश

राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील २७ महापालिका क्षेत्रात १०२ ठिकाणी ध्वनी प्रदूषणाची निरीक्षणे नोंदवली. यामध्ये नाशिकचा समावेश राज्यातील सर्वाधिक ध्वनी प्रदूषण असलेल्या दहा शहरांमध्ये झाला आहे. निरीक्षणांनुसार नाशिकमध्ये दिवसा ७५.२ तर रात्री ६८.२ डेसिबल ध्वनी प्रदूषणाची तीव्रता नोंदविण्यात आली.

यंदा फटाके फोडण्यात वाढ

मागील दिवाळी अनेक निर्बंध असल्याने नाशिककरांना कामाशिवाय घराबाहेर पडता येत नसल्याने फटाके कमी प्रमाणात फोडले गेले.

- यंदा निर्बंधांत शिथिलता आल्याने दिवाळी काळात नाशिककर मोठ्या संख्येने बाहेर पडले. त्यामुळे फटाके फोडण्यात वाढ झाल्याचे वाढत्या प्रदूषणावरून समोर आले आहे.

स्वत:ची अन् इतरांचीही काळजी घ्या....

दिवाळीत प्रदूषणात वाढ होते. त्यामुळे श्वसनविकाराच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता असते. फटाक्यांमध्ये तांबे व कॅडमियमसारखे विषारी घटक असतात, जे हवेत धुलीकण स्वरूपात बराच काळ राहतात. त्यामुळे श्वसनाचे विकार बळावू शकतात. तसेच अस्थमा, शिंका येणे, नाक गळणे, डोकेदुखी होऊ शकते. अशी लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

- डॉ. दिलीप कांडेकर

फटाक्यांतून निघणारा धुर श्वसनावाटे शरीरात घेतल्यामुळे श्वसन आणि फुप्फुसांच्या विकारांत वाढ होते. श्वासनलिका, फुप्फुस आणि दम्याच्या रुग्णांना फटाक्यांतील दूषित वायूंचा धोका अधिक असतो. त्यामुळे औषधे आणि उपचाराने नियंत्रणात आलेल्या आजारांची तिव्रता वाढू शकते.

- डॉ. शेखर महाले

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021Nashikनाशिक