शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

छत्रपतींचा आदर्श ठेवावा : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 01:46 IST

सध्या सत्यावर असत्य मात करण्याचा प्रयत्न करीत असून, खोटं बोला पण रेटून बोला, अशी प्रवृत्ती वाढत आहे. मात्र जात-पात न मानता रयतेचे स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवून वाटचाल करावी, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

नाशिकरोड : सध्या सत्यावर असत्य मात करण्याचा प्रयत्न करीत असून, खोटं बोला पण रेटून बोला, अशी प्रवृत्ती वाढत आहे. मात्र जात-पात न मानता रयतेचे स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवून वाटचाल करावी, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.  जेलरोड ज्ञानेश्वरनगर येथे राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने सोमवारी सायंकाळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘शंभूराजे गौरव पुरस्कार’ वितरण सोहळ्याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, दोन्हीही छत्रपती युगपुरुष होते. मात्र छत्रपती संभाजी राजांचा इतिहास काही प्रवृत्तींनी खोटा व चुकीच्या पद्धतीने सांगितला, मांडला हे खरोखरच दुर्दैवी आहे. दोन्ही छत्रपतींनी ४०० वर्षांपूर्वी जात-पात, धर्माचे राजकारण न करता रयतेचे स्वराज्य स्थापन केले. मात्र आता एकसारखा जातीय तणाव निर्माण केला जात आहे. दोन दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये झालेली दंगल, काही दिवसांपूर्वी कोरेगांव भीमा येथे झालेला प्रकार जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रकार आहे. जाणीवपूर्वक असे प्रकार घडविले जात असल्याचा आरोप पवार यांनी केला.  आपल्याकडे इतकी साखर आहे ती आपण इतर राष्टÑांना देऊ शकतो. तरी देखील पाकिस्तानमधुन साखर आयात करून आपल्या शेतकऱ्यांची साखर मातीमोल किमतीत करण्याचे काम केंद्र व राज्य शासन करीत असल्याचा आरोप पवार यांनी केला. शेतकरी, बेरोजगार यांचे प्रश्न सोडविले जात नाही. उलट त्यांच्या समस्या, अडचणी वाढत चालल्या आहेत. दोन्ही छत्रपतींना हे मान्यनव्हते. त्यांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले असे पवार यांनी स्पष्ट केले. सध्या जे आरक्षण आहे त्याला धक्का न लावता इतरांना आरक्षण दिलेच पाहिजे. स्वच्छतेच्या नावाने फोटोसेशन केले जात आहे. तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज यांना मागे करून फोटोबाजी केली जात आहे.  यामध्ये लोकसहभाग अत्यंत कमी आहे. जातीयवाद्याचे राजकारण लक्षात घेऊन प्रत्येकाने आत्मचिंतन करण्याची पाळी आली आहे. अन्याय, अत्याचाराला बळी न पडता दोन्ही छत्रपतींचे विचार व आचरण डोळ्यासमोर ठेवुन वाटचाल केल्यास समाजाचा विकास व प्रगती होईल असे पवार यांनी स्पष्ट केले.  यावेळी आमदार जयंत जाधव, राष्टÑवादीचे शहर उपाध्यक्ष निवृत्ती अरिंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार दिलीप बनकर, नाना महाले, अर्जुन टिळे, श्रीराम शेटे, रवींद्र पगार, विष्णुपंत म्हैसधुणे, अनिता भामरे आदि उपस्थित होते. प्रास्ताविक आयोजक योगेश निसाळ यांनी केले. आभार मनोहर कोरडे यांनी मानले. यावेळी सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास व कार्याची माहिती पोवाड्यातून दिली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार