शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
3
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
4
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
5
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
6
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
7
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
8
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
10
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
11
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
12
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
13
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

...असे कसे अच्छे दिन? संतप्त नागरिकांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 12:15 AM

एकीकडे स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर वाढत असताना दुसरीकडे पेट्रोल-डिझेलचीही दरवाढ सातत्याने केली जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्याचा ‘चटका’ बसत आहे. सत्तेत येण्याअगोदर भाजपा सरकारने दाखविलेले ‘अच्छे दिन’चे स्वप्न भंगले असून, रविवारी (दि.९) पेट्रोल प्रति लिटर ८८.३६ पैसे इतके झाले. दरवाढीचा हा अद्यापपर्यंतचा उच्चांक नोंदविला गेला. त्यामुळे भाजपाचे असे कसे अच्छे दिन? असा संतप्त सवाल नाशिकरांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देपेट्रोल-डिझेलचा भडका सरकारने दर नियंत्रणात आणावे

नाशिक : एकीकडे स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर वाढत असताना दुसरीकडे पेट्रोल-डिझेलचीही दरवाढ सातत्याने केली जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्याचा ‘चटका’ बसत आहे. सत्तेत येण्याअगोदर भाजपा सरकारने दाखविलेले ‘अच्छे दिन’चे स्वप्न भंगले असून, रविवारी (दि.९) पेट्रोल प्रति लिटर ८८.३६ पैसे इतके झाले. दरवाढीचा हा अद्यापपर्यंतचा उच्चांक नोंदविला गेला. त्यामुळे भाजपाचे असे कसे अच्छे दिन? असा संतप्त सवाल नाशिकरांनी उपस्थित केला आहे.देशभरात इंधनदरवाढीने नागरिक त्रस्त झाले असून, सर्वच विरोधी पक्ष इंधनदरवाढीविरोधात एकवटले आहे. विरोधी पक्षांनी सोमवारी (दि.१०) ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. या हाकेला सर्वपक्षीय धार मिळाली असून, प्रवासी वाहतूकदारसंघटनाही या बंदमध्ये सहभागी होण्याची चिन्हे आहेत. इंधनदरवाढीमुळे सर्वच क्षेत्रात महागाई चक्रकार पद्धतीने झिरपत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजपा सरकारविरुद्ध रोष तीव्र होऊ लागला आहे. सर्वसामान्य जनता वाढत्या महागाईमुळे त्रस्त झाली असून, सरकारने देशभरात इंधनाच्या दरावर त्वरित नियंत्रण मिळविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. एकूणच नागरिकांच्या वाढत्या रोषाबरोबरच या सरकारला विरोधी पक्षांच्या विरोधालाही सामोरे जावे लागत आहे.रविवारी सकाळपासून शहरातील रस्त्यांवर वाहनांची संख्या अत्यंत कमी प्रमाणात दिसून आली. सुटीचा आनंद घेण्यसाठी नाशिककर घराबाहेर अपवादानेच पडले. पेट्रोल दरवाढीने रविवारी उच्चांक गाठला होता.८८.३६ रुपये दराने शहरातील पेट्रोल पंपावरून पेट्रोलविक्री होत होती. तसेच पॉवर पेट्रोलचे दर ९१.१८ रुपयांवर पोहचले होते, तर डिझेलचे दर ७६.३५ रुपयांवर पोहचले होते. डिझेल दरवाढीचाही हा उच्चांक ठरला. आतापर्यंत डिझेलचे दर चालू आठवड्यात ७४ रुपये प्रतिलिटरच्या जवळपास स्थिरावत होते; मात्र रविवारी थेट ७६ रुपयांच्या पुढे दर गेल्याने मालवाहू वाहनांसह काही कौटुबिंक मोटारचालकांनीही नाराजी व्यक्त केली. परिणामी नागरिकांनी गरजेपुरतेच घराबाहेर पडणे रविवारी पसंत केले.कोट..पेट्रोलदरवाढ सरकारने तातडीने नियंत्रणात आणण्याची गरज आहे. सर्वसामान्य जनता या महागाईमध्ये होरपळून निघत आहे, सरकारने याचा विचार करावा. सरकारला पेट्रोल दरवाढ रोखणे शक्य आहे, मात्र राज्यकर्त्यांकडून इच्छाशक्ती दाखविली जात नाही, हे या देशाचे दुर्दैव.-अविनाश किंबहुने, नागरिक (फोटो - ०९पीएचएसपी७२)—-आजपर्यंत पेट्रोल, गॅस, डिझेलचे दर एवढे आकाशाला कधीही भिडले नव्हते. न भुतो न भविष्य मोदी सरकारने असे अच्छे दिन दाखविले की ते कधीही विसरता येणार नाही. त्यांनी ‘अच्छे’ शब्दाची व्याख्याच बदलून टाकली. जनतेला पर्याय नसल्यामुळे इंधन महाग झाले तरी ते खरेदी करावेच लागणार आहे; मात्र सरकारने सहनशीलतेचा अंत पाहू नये.-यशवंत अहिरे, रहिवासी ( ०९पीएचएसपी७५)—-माझा रिक्षा व्यवसाय असून, दररोज पेट्रोल भरावेच लागते. पेट्रोलचे दर दररोज वाढत आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसत आहे. शासनाने दरवाढीवर नियंत्रण मिळविण्याची गरज आहे. पेट्रोलचे दर जरी वाढले तरी प्रवासी जादा दर देणे पसंत करीत नाही, त्यामुळे नाईलाज होतो.- अशोक विठ्ठलकर, रिक्षाचालक (०९पीएचएसपी६८)

टॅग्स :Petrolपेट्रोलInflationमहागाई