शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

आर्थिक दुर्बलांना मिळणार हक्काचे घर

By admin | Updated: April 15, 2017 01:41 IST

आर्थिक दुर्बलांना मिळणार हक्काचे घरसुभाष भामरे : आडगाव येथे घरकुल योजनेचे भूमिपूजन; ग्रामस्थांनी फिरविली पाठ

नाशिक : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ७० वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरांची निर्मिती होत आहे. या माध्यमातून देशातील गरिबांना हक्काची घरे मिळणार असल्याने खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा हेतू साध्य होत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी केले. आडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूललगतच्या मोकळ्या भूखंडावर म्हाडातर्फे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी बांधण्यात येणाऱ्या ४४८ सदनिकांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायीसमिती सभापती शिवाजी गांगुर्डे, नगरसेवक उद्धव निमसे, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर आदि उपस्थित होते. या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असल्याने प्रशासनाने कडेकोट पोलीस बंदोबस्तात म्हाडाचे भूमिपूजनाचा घाट घातल्यामुळे प्रकल्पस्थळाला छावणीचे रूप प्राप्त झाले होते. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तासह दंगा नियंत्रण पथक व शिघ्रकृती दलाचे पथकही कार्यक्रमस्थळी तैनात करण्यात आल्याने गावकऱ्यांनी निदर्शने न करता शांततेच्या मार्गाने भामरे यांना निवेदन देत प्रकल्पाला गावकऱ्यांचा विरोध असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. प्रकल्पाला गावकऱ्यांचा विरोध असल्याने प्रशासकीय अधिकारी व सत्ताधारी पक्षाचे नेते वगळता सर्वसामान्य नागरिकांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. म्हाडाचे नाशिक मंडळ मुख्य अधिकारी रमेश मिसाळ यांनी प्रास्ताविक केले. व्ही. टी. पोद्दार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)