शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
2
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
3
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
4
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
5
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
6
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
7
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
8
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
9
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
10
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
11
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
12
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
13
मुझम्मिलचा जवळचा सहकारी मुस्तकीम सापडला; या कामासाठी ९ नोव्हेंबरला दिल्लीला आला होता, मोठा खुलासा
14
परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याला ३ लाखात विकला BMC चा फुटपाथ; शिंदेसेनेच्या नेत्याचा अजब प्रताप
15
भारतीय हवाई दलाचे विमान तांबरमजवळ कोसळले; कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा आदेश
16
ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार...
17
बापरे! कूल वाटणारं कव्हर ठरू शकतं रिस्की; अचानक होईल स्मार्टफोनचा स्फोट, वेळीच व्हा सावध
18
Bihar Election Results: ओवेसींची एमआयएम काँग्रेसपेक्षा ठरली भारी; बिहारमध्ये कामगिरी कशी?
19
...तर मी संन्यास घेईन; प्रशांत किशोरांनी केलेली घोषणा, आता आपले वचन पाळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व भागातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 00:23 IST

नाशिक तालुक्यातील पूर्व भागातील शेतकºयांना परतीच्या पावसाचे वेध लागले असून, सध्या खरिपाची पिके पूर्णत्वास आल्याने शेतकºयाचे लक्ष रब्बी हंगामाच्या तयारीवर लागले आहे. गेल्या आठवड्यात परतीच्या पावसाने लावलेल्या हजेरीमुळे पिकांना जीवदान मिळण्यास मदत झाली आहे.

एकलहरे : नाशिक तालुक्यातील पूर्व भागातील शेतकºयांना परतीच्या पावसाचे वेध लागले असून, सध्या खरिपाची पिके पूर्णत्वास आल्याने शेतकºयाचे लक्ष रब्बी हंगामाच्या तयारीवर लागले आहे. गेल्या आठवड्यात परतीच्या पावसाने लावलेल्या हजेरीमुळे पिकांना जीवदान मिळण्यास मदत झाली आहे.  नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील एकलहरे, सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, हिंगणवेढे, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शीलापूर, माडसांगवी, गंगावाडी या भागातील शेतकरी बाराही महिने भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. त्यात प्रामुख्याने कोबी, फ्लॉवर, मेथी, शेपू, कोथिंबीर, भेंडी, गवार, वांगे याबरोबरच कारले, गिलके, भोपळा, दोडका, डांगर या पालेभाज्या व फळभाज्यांचे पिके बारमाही घेतली जातात. हा सर्व शेतमाल नाशिकरोड सिन्नरफाटा मार्केट, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती, त्याचबरोबर सायखेडा, पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीत भाजीपाला विक्रीसाठी नेला जातो. किरकोळ भाजीपाला विक्रेते मोटारसायकलवर गाठोडे बांधून किंवा एक दोन क्रेट ठेवून नाशिकरोड उड्डाण पुलाखाली तसेच जेलरोड सायट्रिक कंपनीच्या समोरील भाजीबाजारात विक्रीसाठी पाठवितात. फळभाज्या व पालेभाज्यांच्या बाजारातील आवकेवरच लिलावाचे भाव अवलंबून असल्यामुळे पूर्व भागातील शेतकºयांकडून बाजारात एकाच प्रकारच्या भाजीपाल्याची जादा आवक होणार नाही याची काळजी घेतली जाते. त्यामुळे पंचक्रोशीतील शेतकरी शेतातील माल काढणीचे वेळापत्रकाही ठरवून घेतले आहे.रब्बीवर आशा लागूनपोळ्याच्या आमावस्येनंतर सुरू होणाºया भाद्रपदाच्या पहिल्या पंधरवड्याला सुना भादवा आणि दुसºया पंधरवड्याला जेवता भादवा अर्थात पित्रुपक्ष म्हणतात. भाद्रपदाचे ऊन फारच कडक असते. या उन्हाचा काही पिकांना लाभ तर काहींना नुकसान पोहोचते. अशा वेळीच परतीच्या पावसाला सुरुवात होत असल्याने हा पाऊस शेतीसाठी खूपच लाभदायी असतो. या पावसामुळे विहिरींना पाणी उतरते पुढे हेच विहिरीचे पाणी रब्बी हंगामातील पिकांनाही उपयुक्त ठरते. सप्टेंबरअखेर व आक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात सोयाबीन, भुईमूग, मका, कपाशी, बाजरी, तूर, मूग, मठ ही पिके काढली जातात व त्यानंतर शेतकरी रब्बीच्या तयारीला लागतो. दसरा ते दिवाळी दरम्यान शेतकरी रब्बी हंगामातील गहू, हरबरा, ज्वारी, कांदे ही पिके पेरण्यास सुरुवात करतात.पिकअपवाल्यांची चांदीनाशिक तालुका पूर्व भागातील बहुतांश शेतक-यांकडे शेतीमाल वाहतूक करण्यासाठी स्वत:च्या मालकीचे वाहने आहेत, परंतु ज्यांच्याकडे नाही त्यांच्यासाठी शेअरवर पिकअप व्हॅनची सोय आहे. परिसरातील चार ते पाच शेतकरी एकत्र येऊन आपला भाजीपाला गाठोडे किंवा क्रेटच्या नगाप्रमाणे भाडे आकारून व्हॅनचालकाला सोपवितात. कांद्याच्या हंगामात रोज पिकअपला भाडे मिळते. एका ट्रिपला साधारण कमीत कमी अंतरासाठी ८०० ते १००० रुपये भाडे आकारले जाते. दिवसातून एक किंवा दोन ट्रीप पूर्ण केली जाते. या भागातील काही शेतकºयांनी शेती व्यवसायाला जोड म्हणून पिकअप भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्या