शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व भागातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 00:23 IST

नाशिक तालुक्यातील पूर्व भागातील शेतकºयांना परतीच्या पावसाचे वेध लागले असून, सध्या खरिपाची पिके पूर्णत्वास आल्याने शेतकºयाचे लक्ष रब्बी हंगामाच्या तयारीवर लागले आहे. गेल्या आठवड्यात परतीच्या पावसाने लावलेल्या हजेरीमुळे पिकांना जीवदान मिळण्यास मदत झाली आहे.

एकलहरे : नाशिक तालुक्यातील पूर्व भागातील शेतकºयांना परतीच्या पावसाचे वेध लागले असून, सध्या खरिपाची पिके पूर्णत्वास आल्याने शेतकºयाचे लक्ष रब्बी हंगामाच्या तयारीवर लागले आहे. गेल्या आठवड्यात परतीच्या पावसाने लावलेल्या हजेरीमुळे पिकांना जीवदान मिळण्यास मदत झाली आहे.  नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील एकलहरे, सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, हिंगणवेढे, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शीलापूर, माडसांगवी, गंगावाडी या भागातील शेतकरी बाराही महिने भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. त्यात प्रामुख्याने कोबी, फ्लॉवर, मेथी, शेपू, कोथिंबीर, भेंडी, गवार, वांगे याबरोबरच कारले, गिलके, भोपळा, दोडका, डांगर या पालेभाज्या व फळभाज्यांचे पिके बारमाही घेतली जातात. हा सर्व शेतमाल नाशिकरोड सिन्नरफाटा मार्केट, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती, त्याचबरोबर सायखेडा, पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीत भाजीपाला विक्रीसाठी नेला जातो. किरकोळ भाजीपाला विक्रेते मोटारसायकलवर गाठोडे बांधून किंवा एक दोन क्रेट ठेवून नाशिकरोड उड्डाण पुलाखाली तसेच जेलरोड सायट्रिक कंपनीच्या समोरील भाजीबाजारात विक्रीसाठी पाठवितात. फळभाज्या व पालेभाज्यांच्या बाजारातील आवकेवरच लिलावाचे भाव अवलंबून असल्यामुळे पूर्व भागातील शेतकºयांकडून बाजारात एकाच प्रकारच्या भाजीपाल्याची जादा आवक होणार नाही याची काळजी घेतली जाते. त्यामुळे पंचक्रोशीतील शेतकरी शेतातील माल काढणीचे वेळापत्रकाही ठरवून घेतले आहे.रब्बीवर आशा लागूनपोळ्याच्या आमावस्येनंतर सुरू होणाºया भाद्रपदाच्या पहिल्या पंधरवड्याला सुना भादवा आणि दुसºया पंधरवड्याला जेवता भादवा अर्थात पित्रुपक्ष म्हणतात. भाद्रपदाचे ऊन फारच कडक असते. या उन्हाचा काही पिकांना लाभ तर काहींना नुकसान पोहोचते. अशा वेळीच परतीच्या पावसाला सुरुवात होत असल्याने हा पाऊस शेतीसाठी खूपच लाभदायी असतो. या पावसामुळे विहिरींना पाणी उतरते पुढे हेच विहिरीचे पाणी रब्बी हंगामातील पिकांनाही उपयुक्त ठरते. सप्टेंबरअखेर व आक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात सोयाबीन, भुईमूग, मका, कपाशी, बाजरी, तूर, मूग, मठ ही पिके काढली जातात व त्यानंतर शेतकरी रब्बीच्या तयारीला लागतो. दसरा ते दिवाळी दरम्यान शेतकरी रब्बी हंगामातील गहू, हरबरा, ज्वारी, कांदे ही पिके पेरण्यास सुरुवात करतात.पिकअपवाल्यांची चांदीनाशिक तालुका पूर्व भागातील बहुतांश शेतक-यांकडे शेतीमाल वाहतूक करण्यासाठी स्वत:च्या मालकीचे वाहने आहेत, परंतु ज्यांच्याकडे नाही त्यांच्यासाठी शेअरवर पिकअप व्हॅनची सोय आहे. परिसरातील चार ते पाच शेतकरी एकत्र येऊन आपला भाजीपाला गाठोडे किंवा क्रेटच्या नगाप्रमाणे भाडे आकारून व्हॅनचालकाला सोपवितात. कांद्याच्या हंगामात रोज पिकअपला भाडे मिळते. एका ट्रिपला साधारण कमीत कमी अंतरासाठी ८०० ते १००० रुपये भाडे आकारले जाते. दिवसातून एक किंवा दोन ट्रीप पूर्ण केली जाते. या भागातील काही शेतकºयांनी शेती व्यवसायाला जोड म्हणून पिकअप भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्या