शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

निस्वार्थ पत्रकारिता सेवाकर्माचा सन्मान : श्रीकांत पुर्णपात्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 19:34 IST

मराठी पत्रकारितेतील ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती रविवारी (दि.६) सर्वत्र  पत्रकारिता दिन म्हणून साजरी करण्यात आली.

ठळक मुद्देपत्रकारिता म्हटलं की लोकशाही जीवंत ठेवत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण‘जीवन संजीवनी’चे प्रात्याक्षिकएकूण १८ पत्रकारांना सन्मानित करण्यात आले

नाशिक :पत्रकारिता म्हटलं की लोकशाही जीवंत ठेवत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण आलेच. सत्त्यनिष्ठा या एकमेव निकषावर आधारित  व्रतस्थ सेवाकर्माचे शिवधनुष्य पेलत अनेकदा पाणउतारा सहन करत आपले कर्तव्य चोखपणे बजावणाऱ्या पत्रकारांच्या निस्वार्थ सेवाकार्याचा वैद्यकिय पेशा जोपासणा-या सेवाव्रतींकडून करण्यात आलेला गौरव आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ डॉक्टर कवी श्रीकांत पुर्णपात्रे यांनी केले.मराठी पत्रकारितेतील ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती रविवारी (दि.६) सर्वत्र  पत्रकारिता दिन म्हणून साजरी करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून इंडियन मेडीकल असोसिएशन नाशिक शाखेच्या वतीने (आयएमए) शहरातील प्रत्येक दैनिकामधील दोन पत्रकार असे एकूण १८ पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. या सन्मान सोहळ्याला प्रमुख पाहूणे म्हणून पुर्णपात्रे उपस्थित होते. यावेळी व्यासपिठावर ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निवेदिता पवार, भुलतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्ष डॉ. सरला सोहंदानी, आयएमएचे अध्यक्ष डॉ. आवेश पलोड, सचिव डॉ. नितीन चिताळकर उपस्थित होते.यावेळी पुर्णपात्रे म्हणाले, पत्रकारिता आणि वैद्यकिय सेवाव्रत जपणा-या व्रतस्थींना दैनंदिन सेवाकार्य बजावताना येणा-या अडचणी व आव्हानांचा सामना करावाच लागतो. आपल्या स्वत:ची कुटुंबाची पर्वा न करता ही मंडळी केवळ जनतेची पर्वा करत आपले सेवाकार्य पार पाडत असतात.वैद्यकीय क्षेत्रासाठीची कडक धोरणे, टीकाटिपण्णी, रोष, अवहेलनांसारख्या संकटांना या क्षेत्रात काम करणारे पेशाने डॉक्टर असलेल्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच अवमान, अवहेलना, पाणउतारा एवढ्यावरच न थांबता थेट पत्रकारांसह डॉक्टरांनाही अनेकदा हल्ल्यांना सामोरे जावे लागते, हे समाजाचं दुर्दैवच म्हणावे लागेल, कारण हे दोन्ही घटक केवळ समाजाच्या उन्नतीसाठी सदैव कार्यरत असतात, हे विसरून चालणार नाही, असेही पुर्णपात्रे यांनी यावेळी नमुद केले. त्यांनी भाषणाच्या सुरूवातीला आपल्या कवीमनाच्या गुलदस्त्यातून खुमासदार शैलीत उधळलेल्या प्रासंगिक विनोदांनी सगळ्यांचा उत्साह द्विगुणित केला.दरम्यान, डॉ. निवेदिता पवार यांनी उपस्थित पत्रकारांना शुभेच्छा देत स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देऊन सुदृढ निरामय शरीर ठेवत समाजदेखील सक्षम व निरामय बनविण्याचा प्रयत्न अविरतपणे करत रहावा, असा मौलिक सल्ला दिला.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दैनिक ‘लोकमत’चे प्रतिनिधी विजय मोरे, अझहर शेख यांच्यासह पत्रकार आसिफ सय्यद, विजय गिते, प्रशांत कोतकर, संकेत शुक्ल, सय्यद चांदभाई, अजय भोसले, नवनाथ वाघचौरे, गणेश डेमसे, गौरव अहिरे, गौरव जोशी, अरुण मलाणी, रामदास नागवंशी यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक डॉ. आवेश पलोड यांनी केले तर सुत्रसंचालन स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. माधवी गोरे-मुठाळ यांनी केले व आभार डॉ. किरण शिंदे यांनी मानले. याप्रसंगी डॉ. दीपा जोशी, डॉ. गौरी कुलकर्णी, डॉ. अभिजीत पाटील, डॉ. पंकज भदाणे यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.‘जीवन संजीवनी’चे प्रात्याक्षिकभुलतज्ज्ञ संघटनेच्या वतीने ‘जीवन संजीवनी’ अर्थात सीपीआर प्रक्रियेचे प्रात्याक्षिक यावेळी दाखविण्यात आले. तसेच काही पत्रकारांनीदेखील या प्रात्याक्षिकाचा अनुभव घेतला. गर्दीच्या ठिकाणी अचानकपणे हृदयविकाराचा झटका येऊन किंवा मेंदूविकाराचा झटका येऊन एखादी व्यक्ती कोसळल्यास त्याच्या हृदयावर सतत नऊ ते दहा मिनिटे विशिष्ट पध्दतीने दाब देऊन बंद पडलेली रक्तभिसरण प्रक्रिया पुन्हा कार्यान्वित करण्यासाठीचा प्रयत्न रुग्णवाहिका येईपर्यंत करत राहणे गरजेचे ठरते. कारण हा त्या रुग्णासाठीचा ‘गोल्डन टाईम’ असतो. हृदयाकडून मेंदूला अशास्थितीत रक्तपुरवठा पुर्ववत होऊ शकल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता कमी होते, असे सोहंदानी यांनी यावेळी सांगितले. ही प्रक्रिया अपघातसमयी कोसळून जखमी झालेल्या अपघातग्रस्त व्यक्तीसाठीदेखील उपयुक्त ठरते. त्यामुळे अपघातात कोठेही मार लागल्यास रक्तस्त्राव होत असल्यास त्याची चिंता न बाळगता ‘सीपीआर’द्वारे जीवन संजीवनीचा प्रयत्न सर्वसामान्यांनी करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. 

टॅग्स :Healthआरोग्यJournalistपत्रकारNashikनाशिकdoctorडॉक्टर