शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

"राहुल गांधींच्या निकालानंतर काँग्रेसवाले न्यायालयाचे गुणगान करू लागले याचे मनापासून समाधान"

By अझहर शेख | Updated: August 5, 2023 17:27 IST

हेच लोक यापूर्वी न्यायालयाविरुद्ध अपशब्द काढत गरळ ओकत होते, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

नाशिक : राहुल गांधी यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर विरोधक आनंदोत्सव साजरा करून न्यायालयाचे गुणगान करीत आहेत, याचे मनापासून समाधान वाटते. कारण हेच लोक यापूर्वी न्यायालयाविरुद्ध अपशब्द काढत गरळ ओकत होते, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

नाशिक येथे पोलीस दीक्षांत सोहळ्यानिमित्त शुक्रवारी संध्याकाळपासूनच देवेंद्र फडणवीस नाशकात दाखल झाले होते. शनिवारी (दि.५) सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बाेलत हेाते. निकाल आमच्या बाजूने लागला तर सर्वोच्च न्यायालय चांगले, निकाल विरोधात गेला तर न्यायालय वाईट अशी काँग्रेसचे नेते व अन्य विरोधक भूमिका घेत असतात. संविधानाने तयार केलेल्या संस्थांचे पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न हे लोक कसे करतात, हे यावरून आता स्पष्ट झाले आहे, असेही फडणवीस म्हणाले

दरम्यान, माजी पर्यटन मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी बारसु प्रकल्पाबाबत बोलताना फडणवीस यांनी केवळ विरोधाला विरोध म्हणून काही तरी टीका करायची, यामध्ये तथ्य नाही. मला असं वाटलं होतं की आदित्य ठाकरे तरी किमान अभ्यास करून बोलतील मात्र त्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधून घेतली आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी केली. डोळ्यांना पट्टी बांधणाऱ्यांना उत्तर देऊन फायदा तरी काय असा प्रश्नही फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला. संभाजी भिडे यांच्य वक्तव्याबाबत मी माझ्यावतीने सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. या भूमिकेनंतर कोणाला जाबजबाब देण्याची गरज राहिलेली मला वाटत नाही, असेही ते म्हणाले.मी ‘सामना’ वाचत नाही

संभाजी भिडेंविरुद्ध सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखाविषयी विचारले असता फडणवीस यांनी ‘मी सामना वाचत नाही...’ असे सांगितले. भिडेंच्या वक्तव्याचे कदापी समर्थन करणार नाही, त्याबाबतची भूमिका स्पष्ट केलेली आहे, असेही ते म्हणाले.अधिवेशनाने जनतेला खूप काही दिलं...

राज्याच्या जनतेला अधिवेशनातून खुप काही जनतेला मिळाले. मोदी आवास योजनेसारख्या विविध योजना या अधिवेशनातून दिल्या. तसेच वेगवेगळे बिलदेखील या अधिवेशनात मंजुर करण्यात आले. यामुळे महाराष्ट्र पुढे जाणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस