शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

"राहुल गांधींच्या निकालानंतर काँग्रेसवाले न्यायालयाचे गुणगान करू लागले याचे मनापासून समाधान"

By अझहर शेख | Updated: August 5, 2023 17:27 IST

हेच लोक यापूर्वी न्यायालयाविरुद्ध अपशब्द काढत गरळ ओकत होते, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

नाशिक : राहुल गांधी यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर विरोधक आनंदोत्सव साजरा करून न्यायालयाचे गुणगान करीत आहेत, याचे मनापासून समाधान वाटते. कारण हेच लोक यापूर्वी न्यायालयाविरुद्ध अपशब्द काढत गरळ ओकत होते, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

नाशिक येथे पोलीस दीक्षांत सोहळ्यानिमित्त शुक्रवारी संध्याकाळपासूनच देवेंद्र फडणवीस नाशकात दाखल झाले होते. शनिवारी (दि.५) सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बाेलत हेाते. निकाल आमच्या बाजूने लागला तर सर्वोच्च न्यायालय चांगले, निकाल विरोधात गेला तर न्यायालय वाईट अशी काँग्रेसचे नेते व अन्य विरोधक भूमिका घेत असतात. संविधानाने तयार केलेल्या संस्थांचे पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न हे लोक कसे करतात, हे यावरून आता स्पष्ट झाले आहे, असेही फडणवीस म्हणाले

दरम्यान, माजी पर्यटन मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी बारसु प्रकल्पाबाबत बोलताना फडणवीस यांनी केवळ विरोधाला विरोध म्हणून काही तरी टीका करायची, यामध्ये तथ्य नाही. मला असं वाटलं होतं की आदित्य ठाकरे तरी किमान अभ्यास करून बोलतील मात्र त्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधून घेतली आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी केली. डोळ्यांना पट्टी बांधणाऱ्यांना उत्तर देऊन फायदा तरी काय असा प्रश्नही फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला. संभाजी भिडे यांच्य वक्तव्याबाबत मी माझ्यावतीने सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. या भूमिकेनंतर कोणाला जाबजबाब देण्याची गरज राहिलेली मला वाटत नाही, असेही ते म्हणाले.मी ‘सामना’ वाचत नाही

संभाजी भिडेंविरुद्ध सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखाविषयी विचारले असता फडणवीस यांनी ‘मी सामना वाचत नाही...’ असे सांगितले. भिडेंच्या वक्तव्याचे कदापी समर्थन करणार नाही, त्याबाबतची भूमिका स्पष्ट केलेली आहे, असेही ते म्हणाले.अधिवेशनाने जनतेला खूप काही दिलं...

राज्याच्या जनतेला अधिवेशनातून खुप काही जनतेला मिळाले. मोदी आवास योजनेसारख्या विविध योजना या अधिवेशनातून दिल्या. तसेच वेगवेगळे बिलदेखील या अधिवेशनात मंजुर करण्यात आले. यामुळे महाराष्ट्र पुढे जाणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस