शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

"राहुल गांधींच्या निकालानंतर काँग्रेसवाले न्यायालयाचे गुणगान करू लागले याचे मनापासून समाधान"

By अझहर शेख | Updated: August 5, 2023 17:27 IST

हेच लोक यापूर्वी न्यायालयाविरुद्ध अपशब्द काढत गरळ ओकत होते, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

नाशिक : राहुल गांधी यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर विरोधक आनंदोत्सव साजरा करून न्यायालयाचे गुणगान करीत आहेत, याचे मनापासून समाधान वाटते. कारण हेच लोक यापूर्वी न्यायालयाविरुद्ध अपशब्द काढत गरळ ओकत होते, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

नाशिक येथे पोलीस दीक्षांत सोहळ्यानिमित्त शुक्रवारी संध्याकाळपासूनच देवेंद्र फडणवीस नाशकात दाखल झाले होते. शनिवारी (दि.५) सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बाेलत हेाते. निकाल आमच्या बाजूने लागला तर सर्वोच्च न्यायालय चांगले, निकाल विरोधात गेला तर न्यायालय वाईट अशी काँग्रेसचे नेते व अन्य विरोधक भूमिका घेत असतात. संविधानाने तयार केलेल्या संस्थांचे पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न हे लोक कसे करतात, हे यावरून आता स्पष्ट झाले आहे, असेही फडणवीस म्हणाले

दरम्यान, माजी पर्यटन मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी बारसु प्रकल्पाबाबत बोलताना फडणवीस यांनी केवळ विरोधाला विरोध म्हणून काही तरी टीका करायची, यामध्ये तथ्य नाही. मला असं वाटलं होतं की आदित्य ठाकरे तरी किमान अभ्यास करून बोलतील मात्र त्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधून घेतली आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी केली. डोळ्यांना पट्टी बांधणाऱ्यांना उत्तर देऊन फायदा तरी काय असा प्रश्नही फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला. संभाजी भिडे यांच्य वक्तव्याबाबत मी माझ्यावतीने सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. या भूमिकेनंतर कोणाला जाबजबाब देण्याची गरज राहिलेली मला वाटत नाही, असेही ते म्हणाले.मी ‘सामना’ वाचत नाही

संभाजी भिडेंविरुद्ध सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखाविषयी विचारले असता फडणवीस यांनी ‘मी सामना वाचत नाही...’ असे सांगितले. भिडेंच्या वक्तव्याचे कदापी समर्थन करणार नाही, त्याबाबतची भूमिका स्पष्ट केलेली आहे, असेही ते म्हणाले.अधिवेशनाने जनतेला खूप काही दिलं...

राज्याच्या जनतेला अधिवेशनातून खुप काही जनतेला मिळाले. मोदी आवास योजनेसारख्या विविध योजना या अधिवेशनातून दिल्या. तसेच वेगवेगळे बिलदेखील या अधिवेशनात मंजुर करण्यात आले. यामुळे महाराष्ट्र पुढे जाणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस