शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

अंगणवाडीतील बालकांना घरपोच पोषण आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 00:30 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बंद करण्यात आलेल्या अंगणवाडीतील बालकांचा पोषण आहाराचा प्रश्नअखेर मिटला असून, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्तांनी पुढील एक महिन्यासाठी अंगणवाडीतील बालकांना तसेच स्तनदा मातांना घरपोच पोषण आहार देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याचबरोबर कुपोषित बालकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता अंगणवाडी सेविकांनी प्रत्येक घरभेटी देऊन बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त केले आहे.

ठळक मुद्देआयुक्तांचा निर्णय : सेविका घरभेटी देणार

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बंद करण्यात आलेल्या अंगणवाडीतील बालकांचा पोषण आहाराचा प्रश्नअखेर मिटला असून, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्तांनी पुढील एक महिन्यासाठी अंगणवाडीतील बालकांना तसेच स्तनदा मातांना घरपोच पोषण आहार देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याचबरोबर कुपोषित बालकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता अंगणवाडी सेविकांनी प्रत्येक घरभेटी देऊन बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त केले आहे.या संदर्भात दोन दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने शासकीय यंत्रणेचे लक्ष वेधले होते. अंगणवाड्या बंद केल्याने कुपोषित बालकांच्या उपासमारीची वेळ आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. नाशिक जिल्ह्यातील सुमारे पाच हजार अंगणवाडीतील सव्वातीन लाख बालकांचे आरोग्य अंगणवाड्या बंद झाल्याने धोक्यात आले असून, यातील काही बालके कुपोषित असल्याने त्यांच्या उदरभरणाचा त्याचबरोबर औषधोपचाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात कोरोनाचा प्रभाव टाळण्यासाठी सरकारने शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्यांना सरकारने सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे अंगणवाड्यातील बालकांचा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्या पार्श्वभूमीवर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त इंद्रा यांनी अंगणवाडीतील बालकांना १५ मार्च ते १५ एप्रिल या काळात ताजा गरम आहार देण्याऐवजी घरपोच आहार देण्यात यावा त्यात पोषण आहाराची पाककृतीचा समावेश करण्यात यावा त्याचबरोबर या एक महिन्याच्या कालावधीत अंगणवाडी सेविकांनी नियमित गृहभेटी देऊन बालकांची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करावे. अंगणवाडीतील बालकांप्रमाणेच स्तनदा व गरोदर मातांनाही घरपोच नियमित पोषण आहार देण्यात यावा अशा सूचना दिल्या आहेत. आयुक्ताच्या या निर्णयामुळे अंगणवाडीतील बालकांचा पोषण आहाराचा प्रश्न सुटला आहे.कुपोषणाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यताशहरी व ग्रामीण भागातील तीन ते सहा वर्षे वयोगटांतील बालकांना अंगणवाडीत पोषण आहार व औषधोपचार केला जातो. या बालकांची नियमित आरोग्य तपासणी त्याचबरोबर वेळेवर पोषण आहार देऊन त्यांचे वजन वाढविण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच पूर्व प्राथमिक शिक्षणही दिले जाते. या बालकांमध्ये प्रामुख्याने कुपोषित बालकांना अधिक समावेश असल्याने अंगणवाड्या बंद केल्याने त्यांच्या कुपोषणाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

टॅग्स :Nashikनाशिकfoodअन्न