शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
4
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
5
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
6
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
7
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
8
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
9
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
10
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
11
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
12
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
13
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
14
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
15
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
16
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
17
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
18
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
19
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
20
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

अंगणवाडीतील बालकांना घरपोच पोषण आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 00:30 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बंद करण्यात आलेल्या अंगणवाडीतील बालकांचा पोषण आहाराचा प्रश्नअखेर मिटला असून, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्तांनी पुढील एक महिन्यासाठी अंगणवाडीतील बालकांना तसेच स्तनदा मातांना घरपोच पोषण आहार देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याचबरोबर कुपोषित बालकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता अंगणवाडी सेविकांनी प्रत्येक घरभेटी देऊन बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त केले आहे.

ठळक मुद्देआयुक्तांचा निर्णय : सेविका घरभेटी देणार

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बंद करण्यात आलेल्या अंगणवाडीतील बालकांचा पोषण आहाराचा प्रश्नअखेर मिटला असून, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्तांनी पुढील एक महिन्यासाठी अंगणवाडीतील बालकांना तसेच स्तनदा मातांना घरपोच पोषण आहार देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याचबरोबर कुपोषित बालकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता अंगणवाडी सेविकांनी प्रत्येक घरभेटी देऊन बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त केले आहे.या संदर्भात दोन दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने शासकीय यंत्रणेचे लक्ष वेधले होते. अंगणवाड्या बंद केल्याने कुपोषित बालकांच्या उपासमारीची वेळ आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. नाशिक जिल्ह्यातील सुमारे पाच हजार अंगणवाडीतील सव्वातीन लाख बालकांचे आरोग्य अंगणवाड्या बंद झाल्याने धोक्यात आले असून, यातील काही बालके कुपोषित असल्याने त्यांच्या उदरभरणाचा त्याचबरोबर औषधोपचाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात कोरोनाचा प्रभाव टाळण्यासाठी सरकारने शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्यांना सरकारने सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे अंगणवाड्यातील बालकांचा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्या पार्श्वभूमीवर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त इंद्रा यांनी अंगणवाडीतील बालकांना १५ मार्च ते १५ एप्रिल या काळात ताजा गरम आहार देण्याऐवजी घरपोच आहार देण्यात यावा त्यात पोषण आहाराची पाककृतीचा समावेश करण्यात यावा त्याचबरोबर या एक महिन्याच्या कालावधीत अंगणवाडी सेविकांनी नियमित गृहभेटी देऊन बालकांची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करावे. अंगणवाडीतील बालकांप्रमाणेच स्तनदा व गरोदर मातांनाही घरपोच नियमित पोषण आहार देण्यात यावा अशा सूचना दिल्या आहेत. आयुक्ताच्या या निर्णयामुळे अंगणवाडीतील बालकांचा पोषण आहाराचा प्रश्न सुटला आहे.कुपोषणाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यताशहरी व ग्रामीण भागातील तीन ते सहा वर्षे वयोगटांतील बालकांना अंगणवाडीत पोषण आहार व औषधोपचार केला जातो. या बालकांची नियमित आरोग्य तपासणी त्याचबरोबर वेळेवर पोषण आहार देऊन त्यांचे वजन वाढविण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच पूर्व प्राथमिक शिक्षणही दिले जाते. या बालकांमध्ये प्रामुख्याने कुपोषित बालकांना अधिक समावेश असल्याने अंगणवाड्या बंद केल्याने त्यांच्या कुपोषणाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

टॅग्स :Nashikनाशिकfoodअन्न