कळवण : शहर व तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी गारांसह पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील मानूर, बेज ,बगडू, अभोणा, कनाशी, पाळे, अस्वोली, हिंगवे, आठबे आदि गावांत सुमारे एक तास गारांसह पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. हिंगळवाडी येथे वादळामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे पत्रे उडाले. कळवण तालुक्यातील भादवण, गोपाळखडी, हिंगवे, बार्डे, कळमथे, पाळे, एकलहरे, जामले, कळवण खुर्द, वाडी, अस्वोली, कन्हेरवाडी, जयपूर, जयदर, खडकी, नाळीद, बेलबारे आदि भागांत जोरदार पाऊस पडला. हिंगळवाडी, पाळे खुर्द,आसोली परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यामुळे शेतीमालाचे नुकसान झाले आहे.दुपारी तीन वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. यात प्रामुख्याने मिरची, टोमॅटो, कोथिंबीर या भाजीपाल्यासह डाळिंब व आंबे या फळ पिकांचेही मोठे नुसान झाले आहे. जोरदार पावसाने या भागात जवळपास तीन तास वीजपुरवठा खंडित होता. बहुसंख्य शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले असून पंचनामे करण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)
हिंगळवाडी शाळेचे पत्रे उडाले
By admin | Updated: May 9, 2016 00:18 IST