शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
3
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
4
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
5
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
6
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
7
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
8
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
9
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
10
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
11
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
12
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
13
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
14
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
15
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
16
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
17
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
18
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
19
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
20
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...

पायी साईभक्तांसाठी महामार्ग ठरतोय ‘जीवघेणा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 17:42 IST

सिन्नर : जागतिक कीर्तीचे देवस्थान म्हणून ख्याती मिळविलेल्या शिर्डीच्या साईदरबारात लीन होण्यासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही साईभक्त येत असतात.

सिन्नर : जागतिक कीर्तीचे देवस्थान म्हणून ख्याती मिळविलेल्या शिर्डीच्या साईदरबारात लीन होण्यासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही साईभक्त येत असतात. गुजरात राज्यासह मुंबई, ठाणे व उपनगरात येणाऱ्या पायी पदयात्रेकरुंची संख्या मोठी आहे. मात्र गेल्या काही वर्षात पदयात्रेकरुंचा वाहनाच्या धडकेत होणारा मृत्यू चिंतेची बाब होऊन बसली आहे. शिर्डीला विविध मार्गाने येणाºया महामार्गावर आजपर्यंत शेकडो पायी साईभक्तांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक वर्षापासून पायी पालखी मार्गाचे भिजत पडलेले घोंगडे आता दूर करण्याची गरज निर्माण झाली आहे.शिर्डीच्या साई दरबारात अनेक उंची वाहनांद्वारे आणि आता रेल्वे विमानातून येणाºया साईभक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचबरोबर गुजरात राज्यासह मुंबई, ठाणे, नाशिक जिल्ह्यासह मुंबईच्या उपनगरातून शिर्डीला वर्षभरात लाखो साईभक्त पायी दिंडीने येऊन साईचरणी नतमस्तक होत असतात. दादरच्या साईसेवक, लालबागची साईलीला अशा अनेक २५ वर्षांहून जुन्या चालत आलेल्या पायी दिंड्यासह नवीन पायी दिंड्या व पालख्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ठाणे, मुंबई व उपनगरातील हजारों साईभक्त गुरुपौर्णिमा, रामनवमी, नववर्ष, गुढीपाडवा त्याचबरोबर अनेक सणांना शिर्डीला पायी येत असतात. १५० ते २०० किलोमीटर पायी चालत आल्यानंतर थकलेल्या साईभक्तांचे घोटी- सिन्नर किंवा सिन्नर-शिर्डी महामार्गावर अनेक अपघात झाले आहेत.

टॅग्स :Accidentअपघात