शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

शिक्षण समितीवर महाआघाडीचा दावा

By admin | Updated: July 3, 2015 23:19 IST

आज निवडणूक : चव्हाण द्वयींची वर्णी शक्य

नाशिक : महापालिका शिक्षण समितीच्या सभापती आणि उपसभापतिपदासाठी शनिवारी (दि.४) सकाळी ११ वाजता स्थायी समितीच्या सभागृहात निवडणूक होणार असून, समितीवर मनसे, राष्ट्रवादी आणि अपक्ष गटाच्या महाआघाडीने बहुमताचा दावा सांगितला आहे. त्यामुळे सभापतिपदी अपक्ष संजय चव्हाण आणि उपसभापतिपदी मनसेचे गणेश चव्हाण यांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अल्पमतात असलेल्या सेना-भाजपा युतीचा भरवसा नेहमीप्रमाणेच चमत्कारावर असून, या साऱ्या घडामोडीत कॉँग्रेस एकाकी पडण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. महापालिका शिक्षण समितीच्या सभापती-उपसभापतिपदासाठी शनिवारी अपर आयुक्त आर. जी. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सभापतिपदासाठी संजय चव्हाण (अपक्ष), योगीता अहेर (कॉँग्रेस), वत्सला खैरे (कॉँग्रेस), हर्षा बडगुजर (शिवसेना), ज्योती गांगुर्डे (भाजपा), सुनीता निमसे (राष्ट्रावादी) आणि मीना माळोदे (मनसे) या सात उमेदवारांनी, तर उपसभापतिपदासाठी वत्सला खैरे व योगीता अहेर (कॉँग्रेस), हर्षा बडगुजर (शिवसेना), ज्योती गांगुर्डे (भाजपा) आणि गणेश चव्हाण (मनसे) या पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शिक्षण समितीवर मनसे-५, राष्ट्रवादी-३, कॉँग्रेस-२, शिवसेना-३, भाजपा-२, अपक्ष-१ असे पक्षीय बलाबल आहे. महापालिकेत मनसे, राष्ट्रवादी, कॉँग्रेस आणि अपक्ष यांची महाआघाडी सत्तेवर आहे. सभापतिपदासाठी महाआघाडीतील सर्वच पक्षांनी उमेदवार दिले असले तरी महाआघाडीच्या पदवाटपाच्या सूत्रानुसार अपक्ष गटनेते संजय चव्हाण यांची सभापतिपदी, तर मनसेचे गणेश चव्हाण यांची उपसभापतिपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. कॉँग्रेसच्या वत्सला खैरे व योगीता अहेर या दोहोंनी अर्ज दाखल केले असल्याने आणि कॉँग्रेस गटनेते उत्तमराव कांबळे यांनी महापौरांना पत्र देत दोन्हींपैकी कुणा एकाचा सभापती-उपसभापती पदाकरिता विचार करण्याची विनंती केली असल्याने कॉँग्रेस रिंगणात राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे; मात्र उरल्यासुरल्या दीड वर्षात एकाकी पडण्याचीही भीती कॉँग्रेसला असल्याने ऐनवेळी महाआघाडीलाही पाठिंबा देण्याची शक्यता नाकारली जात नाही. प्रामुख्याने दोन्हीपैकी एक उमेदवार ऐनवेळी माघार घेण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीला स्थायी समिती सभापती पद आणि विरोधी पक्षनेते पद बहाल केले असल्याने राष्ट्रवादीकडूनही ऐनवेळी उमेदवारी मागे घेतली जाऊ शकते. सेना-भाजपाकडे अवघे ५ संख्याबळ असल्याने त्यांची भिस्त महाआघाडीतील फुटीवरच राहणार आहे; परंतु महाआघाडीने कॉँग्रेस वगळता आपल्याकडे भक्कम बहुमताचा दावा केला आहे. कॉँग्रेसने पाठिंबा दिला नाही तरी महाआघाडीकडे नऊ इतके संख्याबळ होते. त्यामुळे सहज विजयाचा दावा केला जात आहे. (प्रतिनिधी)