शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकरी कन्येची उंच भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 01:45 IST

नाशिक : मराठा मोर्चा आंदोलनाचा आवाज बनलेली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची कन्या आकांक्षा दिनेश पवार हिने दहावीच्या निकालातही तिच्या हुशारीची चुणूक दाखवत ८५ टक्के मिळवले. वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर गत १४ वर्षांपासून ती त्र्यंबकेश्वरच्या आधारतीर्थ आश्रमात राहात आहे. बालवाडीपासून इथेच शिकलेल्या आकांक्षासह आत्महत्याग्रस्त बळीराजाच्या ६ मुलांनी दहावीत यशाचा झेंडा फडकवला आहे.

ठळक मुद्दे‘आकांक्षा’पुढती गगन ठेंगणे : आधारतीर्थ आश्रमातील आकांक्षा पवारने मिळविले यश

धनंजय रिसोडकर।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मराठा मोर्चा आंदोलनाचा आवाज बनलेली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची कन्या आकांक्षा दिनेश पवार हिने दहावीच्या निकालातही तिच्या हुशारीची चुणूक दाखवत ८५ टक्के मिळवले. वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर गत १४ वर्षांपासून ती त्र्यंबकेश्वरच्या आधारतीर्थ आश्रमात राहात आहे. बालवाडीपासून इथेच शिकलेल्या आकांक्षासह आत्महत्याग्रस्त बळीराजाच्या ६ मुलांनी दहावीत यशाचा झेंडा फडकवला आहे.आकांक्षाचे मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील पारोळानजीकचे टोळी हे होते. मात्र, आकांक्षा २ वर्षांची असतानाच तिचे वडील दिनेश पवार यांनी सावकार आणि बॅँकेच्या कर्जाच्या दबावातून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यापाठोपाठ आईने विहिरीत उडी घेऊन जीव दिल्याने आकांक्षा बालपणीच अनाथ झाली होती. अशा परिस्थितीत जवळचे नातेवाईक तिला सांभाळायला फारसे उत्सुक नसल्याने गावच्या सरपंचांनी आकांक्षाला त्र्यंबकेश्वरमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी सुरू केलेल्या आधारतीर्थ आश्रमात आणून सोडले होते. तेव्हापासून आधारतीर्थ आश्रमातच आकांक्षाचे पालनपोषण करण्यात आले. आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या मुलांचे गुणसप्तकत्र्यंबकेश्वरच्या आधारतीर्थ आश्रमातील आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबातील आहेत. त्यातील यंदा दहावीत असलेली ही सातही मुले राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील असून, त्यांनी मिळवलेले गुण आणि जिल्हा पुढीलप्रमाणे- आकांक्षा पवार (८४.५० टक्के, जळगाव), विद्या महाले (७९ टक्के ), चेतन फौजदार (७०.६० टक्के, अहमदनगर), बाळकृष्ण घारे (६८.६० टक्के, ठाणे), यशोदा चौधरी (६३ टक्के, औरंगाबाद), ओमकार लांडगे (६०.६० टक्के, सोलापूर), सुनीता डबके (५३.२० टक्के, यवतमाळ) शाळेपर्यंत पायी प्रवासत्र्यंबकेश्वरनजीक असलेल्या आधारतीर्थमधील सर्व मुले तळवाडे गावातील जिल्हा परिषदेच्या राजीव गांधी विद्यालयात शिक्षण घेत आहेत. आधारतीर्थपासून हे अंतर ५ किलोमीटर लांब असून, दररोज सर्व मुले हे अंतर चालत जातात. या मुलांप्रमाणेच आकांक्षानेही शाळेत पायी जात यश मिळविले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीssc examदहावी