शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

आत्महत्याग्रस्त शेतकरी कन्येची उंच भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 01:45 IST

नाशिक : मराठा मोर्चा आंदोलनाचा आवाज बनलेली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची कन्या आकांक्षा दिनेश पवार हिने दहावीच्या निकालातही तिच्या हुशारीची चुणूक दाखवत ८५ टक्के मिळवले. वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर गत १४ वर्षांपासून ती त्र्यंबकेश्वरच्या आधारतीर्थ आश्रमात राहात आहे. बालवाडीपासून इथेच शिकलेल्या आकांक्षासह आत्महत्याग्रस्त बळीराजाच्या ६ मुलांनी दहावीत यशाचा झेंडा फडकवला आहे.

ठळक मुद्दे‘आकांक्षा’पुढती गगन ठेंगणे : आधारतीर्थ आश्रमातील आकांक्षा पवारने मिळविले यश

धनंजय रिसोडकर।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मराठा मोर्चा आंदोलनाचा आवाज बनलेली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची कन्या आकांक्षा दिनेश पवार हिने दहावीच्या निकालातही तिच्या हुशारीची चुणूक दाखवत ८५ टक्के मिळवले. वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर गत १४ वर्षांपासून ती त्र्यंबकेश्वरच्या आधारतीर्थ आश्रमात राहात आहे. बालवाडीपासून इथेच शिकलेल्या आकांक्षासह आत्महत्याग्रस्त बळीराजाच्या ६ मुलांनी दहावीत यशाचा झेंडा फडकवला आहे.आकांक्षाचे मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील पारोळानजीकचे टोळी हे होते. मात्र, आकांक्षा २ वर्षांची असतानाच तिचे वडील दिनेश पवार यांनी सावकार आणि बॅँकेच्या कर्जाच्या दबावातून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यापाठोपाठ आईने विहिरीत उडी घेऊन जीव दिल्याने आकांक्षा बालपणीच अनाथ झाली होती. अशा परिस्थितीत जवळचे नातेवाईक तिला सांभाळायला फारसे उत्सुक नसल्याने गावच्या सरपंचांनी आकांक्षाला त्र्यंबकेश्वरमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी सुरू केलेल्या आधारतीर्थ आश्रमात आणून सोडले होते. तेव्हापासून आधारतीर्थ आश्रमातच आकांक्षाचे पालनपोषण करण्यात आले. आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या मुलांचे गुणसप्तकत्र्यंबकेश्वरच्या आधारतीर्थ आश्रमातील आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबातील आहेत. त्यातील यंदा दहावीत असलेली ही सातही मुले राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील असून, त्यांनी मिळवलेले गुण आणि जिल्हा पुढीलप्रमाणे- आकांक्षा पवार (८४.५० टक्के, जळगाव), विद्या महाले (७९ टक्के ), चेतन फौजदार (७०.६० टक्के, अहमदनगर), बाळकृष्ण घारे (६८.६० टक्के, ठाणे), यशोदा चौधरी (६३ टक्के, औरंगाबाद), ओमकार लांडगे (६०.६० टक्के, सोलापूर), सुनीता डबके (५३.२० टक्के, यवतमाळ) शाळेपर्यंत पायी प्रवासत्र्यंबकेश्वरनजीक असलेल्या आधारतीर्थमधील सर्व मुले तळवाडे गावातील जिल्हा परिषदेच्या राजीव गांधी विद्यालयात शिक्षण घेत आहेत. आधारतीर्थपासून हे अंतर ५ किलोमीटर लांब असून, दररोज सर्व मुले हे अंतर चालत जातात. या मुलांप्रमाणेच आकांक्षानेही शाळेत पायी जात यश मिळविले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीssc examदहावी