शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आत्महत्याग्रस्त शेतकरी कन्येची उंच भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 01:45 IST

नाशिक : मराठा मोर्चा आंदोलनाचा आवाज बनलेली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची कन्या आकांक्षा दिनेश पवार हिने दहावीच्या निकालातही तिच्या हुशारीची चुणूक दाखवत ८५ टक्के मिळवले. वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर गत १४ वर्षांपासून ती त्र्यंबकेश्वरच्या आधारतीर्थ आश्रमात राहात आहे. बालवाडीपासून इथेच शिकलेल्या आकांक्षासह आत्महत्याग्रस्त बळीराजाच्या ६ मुलांनी दहावीत यशाचा झेंडा फडकवला आहे.

ठळक मुद्दे‘आकांक्षा’पुढती गगन ठेंगणे : आधारतीर्थ आश्रमातील आकांक्षा पवारने मिळविले यश

धनंजय रिसोडकर।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मराठा मोर्चा आंदोलनाचा आवाज बनलेली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची कन्या आकांक्षा दिनेश पवार हिने दहावीच्या निकालातही तिच्या हुशारीची चुणूक दाखवत ८५ टक्के मिळवले. वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर गत १४ वर्षांपासून ती त्र्यंबकेश्वरच्या आधारतीर्थ आश्रमात राहात आहे. बालवाडीपासून इथेच शिकलेल्या आकांक्षासह आत्महत्याग्रस्त बळीराजाच्या ६ मुलांनी दहावीत यशाचा झेंडा फडकवला आहे.आकांक्षाचे मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील पारोळानजीकचे टोळी हे होते. मात्र, आकांक्षा २ वर्षांची असतानाच तिचे वडील दिनेश पवार यांनी सावकार आणि बॅँकेच्या कर्जाच्या दबावातून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यापाठोपाठ आईने विहिरीत उडी घेऊन जीव दिल्याने आकांक्षा बालपणीच अनाथ झाली होती. अशा परिस्थितीत जवळचे नातेवाईक तिला सांभाळायला फारसे उत्सुक नसल्याने गावच्या सरपंचांनी आकांक्षाला त्र्यंबकेश्वरमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी सुरू केलेल्या आधारतीर्थ आश्रमात आणून सोडले होते. तेव्हापासून आधारतीर्थ आश्रमातच आकांक्षाचे पालनपोषण करण्यात आले. आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या मुलांचे गुणसप्तकत्र्यंबकेश्वरच्या आधारतीर्थ आश्रमातील आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबातील आहेत. त्यातील यंदा दहावीत असलेली ही सातही मुले राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील असून, त्यांनी मिळवलेले गुण आणि जिल्हा पुढीलप्रमाणे- आकांक्षा पवार (८४.५० टक्के, जळगाव), विद्या महाले (७९ टक्के ), चेतन फौजदार (७०.६० टक्के, अहमदनगर), बाळकृष्ण घारे (६८.६० टक्के, ठाणे), यशोदा चौधरी (६३ टक्के, औरंगाबाद), ओमकार लांडगे (६०.६० टक्के, सोलापूर), सुनीता डबके (५३.२० टक्के, यवतमाळ) शाळेपर्यंत पायी प्रवासत्र्यंबकेश्वरनजीक असलेल्या आधारतीर्थमधील सर्व मुले तळवाडे गावातील जिल्हा परिषदेच्या राजीव गांधी विद्यालयात शिक्षण घेत आहेत. आधारतीर्थपासून हे अंतर ५ किलोमीटर लांब असून, दररोज सर्व मुले हे अंतर चालत जातात. या मुलांप्रमाणेच आकांक्षानेही शाळेत पायी जात यश मिळविले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीssc examदहावी