शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
3
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
4
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
5
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
6
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
7
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
8
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
9
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
10
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
11
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
12
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
13
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
14
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
15
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
16
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
17
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
18
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
20
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

अहो, आश्चर्यम्! केवळ दोनच तास फुटले फटाके?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 01:38 IST

सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी व वायुप्रदूषणास रोखण्यासाठी दिवाळीच्या कालावधीत केवळ दोन तास फटाके वाजविण्यासाठी मुभा दिली होती़ तसेच ग्रीन दिवाळी साजरी करण्याबाबत सुचविले होते़ मात्र, न्यायालयाच्या या आदेशाचे शहरात सर्रास उल्लंघन झालेले असताना प्रदूषण मंडळाने कोणत्याही प्रकारची तक्रार न केल्याने पोलिसांनी कोणावरही कारवाई केलेली नाही़

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी व वायुप्रदूषणास रोखण्यासाठी दिवाळीच्या कालावधीत केवळ दोन तास फटाके वाजविण्यासाठी मुभा दिली होती़ तसेच ग्रीन दिवाळी साजरी करण्याबाबत सुचविले होते़ मात्र, न्यायालयाच्या या आदेशाचे शहरात सर्रास उल्लंघन झालेले असताना प्रदूषण मंडळाने कोणत्याही प्रकारची तक्रार न केल्याने पोलिसांनी कोणावरही कारवाई केलेली नाही़ त्यामुळे शहरात न्यायालयाने दिलेल्या वेळेतच फटाके वाजविण्यात आले की काय, असा प्रश्न पर्यावरणप्रेमींना पडला आहे़ दरम्यान यावर्षी फटाके विक्रीत निम्म्याने घट झाल्याने पर्यावरणप्रेमींना आनंद व्यक्त केला असून, शहरवासीयांचे आभार मानले आहेत़दिवाळीतील फटाक्यांमुळे होणाºया ध्वनी व वायुप्रदूषणामुळे माणसांबरोबरच प्राण्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात़ त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने रात्री ८ ते १० या दोन तासातच फटाके वाजविण्याची परवानगी दिली होती़ तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाºयांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते़ या गुन्ह्यासाठी आर्थिक दंड तसेच कारावासाच्या शिक्षेची तरतूदही असून, या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे़दिवाळीतील तीन प्रमुख दिवसांमध्ये तर रात्री, पहाटे तसेच दुपारीही फटाके वाजविले गेले़ मोठ्या आवाजाचे तसेच प्रदूषण करणाºया फटाक्यांवरील बंदीची अंमलबजावणी करणाºया प्रदूषण नियामक मंडळ, पोलीस व संबंधित यंत्रणा सक्षम नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे़ दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फटाके फोडणाºयावरील कारवाईबाबत पोलिसांकडे विचारणा केली असता कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसारया निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची होती़ मात्र, न्यायालयात तीन तारखेला आदेश येऊनही सहा तारखेपर्यंत असा काही निर्णय झाल्याची माहिती या मंडळाला नव्हती़ तसेच त्यांनी आमच्याकडे कॉपी नसल्याचे सांगितले होते़ याबाबत तक्रार कुणाकडे, कोणी करायची याबाबतही पर्यावरणप्रेमींमध्ये संभ्रम आहे़- जसबिर सिंग, सदस्य,  जिल्हा पर्यावरण समिती, नाशिक़

टॅग्स :NashikनाशिकDiwaliदिवाळी