शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अहो, आश्चर्यम्! केवळ दोनच तास फुटले फटाके?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 01:38 IST

सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी व वायुप्रदूषणास रोखण्यासाठी दिवाळीच्या कालावधीत केवळ दोन तास फटाके वाजविण्यासाठी मुभा दिली होती़ तसेच ग्रीन दिवाळी साजरी करण्याबाबत सुचविले होते़ मात्र, न्यायालयाच्या या आदेशाचे शहरात सर्रास उल्लंघन झालेले असताना प्रदूषण मंडळाने कोणत्याही प्रकारची तक्रार न केल्याने पोलिसांनी कोणावरही कारवाई केलेली नाही़

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी व वायुप्रदूषणास रोखण्यासाठी दिवाळीच्या कालावधीत केवळ दोन तास फटाके वाजविण्यासाठी मुभा दिली होती़ तसेच ग्रीन दिवाळी साजरी करण्याबाबत सुचविले होते़ मात्र, न्यायालयाच्या या आदेशाचे शहरात सर्रास उल्लंघन झालेले असताना प्रदूषण मंडळाने कोणत्याही प्रकारची तक्रार न केल्याने पोलिसांनी कोणावरही कारवाई केलेली नाही़ त्यामुळे शहरात न्यायालयाने दिलेल्या वेळेतच फटाके वाजविण्यात आले की काय, असा प्रश्न पर्यावरणप्रेमींना पडला आहे़ दरम्यान यावर्षी फटाके विक्रीत निम्म्याने घट झाल्याने पर्यावरणप्रेमींना आनंद व्यक्त केला असून, शहरवासीयांचे आभार मानले आहेत़दिवाळीतील फटाक्यांमुळे होणाºया ध्वनी व वायुप्रदूषणामुळे माणसांबरोबरच प्राण्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात़ त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने रात्री ८ ते १० या दोन तासातच फटाके वाजविण्याची परवानगी दिली होती़ तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाºयांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते़ या गुन्ह्यासाठी आर्थिक दंड तसेच कारावासाच्या शिक्षेची तरतूदही असून, या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे़दिवाळीतील तीन प्रमुख दिवसांमध्ये तर रात्री, पहाटे तसेच दुपारीही फटाके वाजविले गेले़ मोठ्या आवाजाचे तसेच प्रदूषण करणाºया फटाक्यांवरील बंदीची अंमलबजावणी करणाºया प्रदूषण नियामक मंडळ, पोलीस व संबंधित यंत्रणा सक्षम नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे़ दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फटाके फोडणाºयावरील कारवाईबाबत पोलिसांकडे विचारणा केली असता कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसारया निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची होती़ मात्र, न्यायालयात तीन तारखेला आदेश येऊनही सहा तारखेपर्यंत असा काही निर्णय झाल्याची माहिती या मंडळाला नव्हती़ तसेच त्यांनी आमच्याकडे कॉपी नसल्याचे सांगितले होते़ याबाबत तक्रार कुणाकडे, कोणी करायची याबाबतही पर्यावरणप्रेमींमध्ये संभ्रम आहे़- जसबिर सिंग, सदस्य,  जिल्हा पर्यावरण समिती, नाशिक़

टॅग्स :NashikनाशिकDiwaliदिवाळी