शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

हरणबारी पाणीपुरवठा योजनेला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 18:06 IST

३० कोटींची योजना : नामपूरकरांना मिळणार दिलासा

ठळक मुद्देजून २०१८ मध्ये झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा बैठकीत कृती आराखड्याला मंजुरी प्राप्त झाली होती

सटाणा : सटाणा शहरापाठोपाठ आता नामपूर गावासाठीही सुमारे ३० कोटी रु पये खर्चाच्या हरणबारी पाणीपुरवठा या महत्वाकांक्षी योजनेला शासनाने अंतिम मंजुरी दिली आहे . यामुळे टंकरग्रस्त नामपूरकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.नामपूर शहराची पंचवीस हजार लोकसंख्या आहे . शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे . त्या तुलनेत पाण्याचे स्त्रोत तुटपुंजे ठरत आहेत. शासनाने भारत निर्माण सारखी योजना राबविली मात्र तीही भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडली. पाण्यासारखा पैसा खर्च झाला तरीही नामपूरकर तहानलेलेच राहिले. भर पावसाळ्यातही या गावाला टॅँकरने पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. महिलांना रात्रंदिवस पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे . मोसम नदीकाठावर वसलेले शहर असुनही पाण्याचे स्रोत नाहीत. ही समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा सुरू होता. जून २०१८ मध्ये झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा बैठकीत कृती आराखड्याला मंजुरी प्राप्त झाली होती तर नुकत्याच झालेल्या पाणीपुरवठा बैठकीत नामपूरसाठी सुमारे ३० कोटी रु पये खर्चाच्या हरणबारी पाणीपुरवठा योजनेला अंतिम मंजुरी देण्यात आली आहे .या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर निविदा काढून कामाला सुरु वात करण्यात येणार आहे .या योजनेमुळे नामपूरच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे.काम पूर्णत्वास जाण्याचा मार्ग मोकळा नामपूरच्या हरणबारी पाणीपुरवठा योजनेसाठी वेळोवेळी स्थानिकांकडून मागणी होत होती. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अंतिम मंजुरी दिली आहे. गेल्या वर्षी या योजनेसाठी कृती आराखडा मंजूर केला होता. आता अंतिम मंजुरी मिळाल्याने काम पूर्णत्वास जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.- डॉ.सुभाष भामरे, खासदार

टॅग्स :NashikनाशिकDamधरण