शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वारसा जतन समिती वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 01:01 IST

ऐतिहासिक-पौराणिक वारसा लाभलेल्या नाशिकमध्ये विविध प्राचीन स्मारके आढळून येतात. शहरातील हा दुर्मीळ ठेवा जपला जावा, त्याचे संवर्धन व्हावे, यासाठी शहराची वारसा जतन समिती अस्तित्वात येणे गरजेचे आहे.

नाशिक : ऐतिहासिक-पौराणिक वारसा लाभलेल्या नाशिकमध्ये विविध प्राचीन स्मारके आढळून येतात. शहरातील हा दुर्मीळ ठेवा जपला जावा, त्याचे संवर्धन व्हावे, यासाठी शहराची वारसा जतन समिती अस्तित्वात येणे गरजेचे आहे. मात्र महापालिका व जिल्हा प्रशासनाने या बाबीकडे अद्याप लक्ष पुरविले नसल्याने ‘वारसा’ रामभरोसे असल्याचे समोर आले आहे.वारसा जतन व संवर्धनाची जबाबदारी शासनाने राज्य व केंद्र पुरातत्त्व विभागाकडे सोपविली असली तरी नव्या वारसा स्थळांचा शोध घेणे, त्याचे महत्त्व पटविणे आणि पुरातत्त्व विभागाचे त्याकडे लक्ष वेधून संवर्धनासाठी प्रयत्नशील राहून एक दुवा म्हणून कार्य करण्यासाठी शहर व जिल्ह्याची वारसा समिती असणे गरजेचे आहे. वारसा स्थळाचा विकास आणि संवर्धन काळाची गरज आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली वारसा समिती गठित के ली जावी.‘वारसा’ दृष्टिक्षेपात असानाशिकचा वारसा सुरू होतो तो लेणीपासून. त्रिरश्मी/बौद्ध लेणी (पांडवलेणी). म्हसरूळ येथील चामरलेणी, त्रिंगलवाडीमधील जैन लेणी, अंजनेरी गडावरील लेणीचा समावेश आहे. त्याच पद्धतीने जिल्ह्यातील डोंगरी, भुईकोट प्रकारातील तब्बल ६५ ते ६७ गड-किल्ले, पौराणिक मंदिरे, मशिदी अशा विविध प्राचीन स्मारकांचा ठेवा या शहराला लाभला आहे.वारसा जतन समितीबाबत २००७ सालानंतर सर्व हालचाली थंडावल्या. त्यावेळी केलेले सर्वेक्षण व अहवालात नोंदविलेली निरीक्षणे धूळखात पडली. कालौघात जुन्या गावठाणांमधील बहुतांश वाडे नामशेष झाले. पालिकेकडे सहा महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. समिती लवकरात लवकर स्थापन केली जावी, यासाठी पत्रव्यवहार सुरू आहे.- शैलेश देवी, वास्तुविशारद

टॅग्स :Archaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणNashikनाशिक