शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

नाशिक शहराचा ऐतिहासिक वारसा जपायला हेरिटेज कमिटी हवी; योगेश कासार यांचे मत

By संजय पाठक | Updated: November 26, 2020 23:17 IST

नाशिक : शहराचे वैभव खूप मोठे आहे. इथल्या वास्तू हे संचित आहे. मात्र, त्यांचे जतन करायला हवे, दुर्दैवाने तसे होताना दिसत नाहीत अनेक शहरांत महापालिकेच्या हेरिटेज कमिटीच्या माध्यमातून काही ना काही प्रयत्न सुरू असताना नाशिकमध्ये तसे होत नाहीत, अशी खंत नाशिकमधील अभियंता आणि पुरातत्व क्षेत्रातील अभ्यासक योगेश कासार यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देनाशकात संपन्न वारसा  मनपाचे प्रयत्न हवे 

नाशिक : शहराचे वैभव खूप मोठे आहे. इथल्या वास्तू हे संचित आहे. मात्र, त्यांचे जतन करायला हवे, दुर्दैवाने तसे होताना दिसत नाहीत अनेक शहरांत महापालिकेच्या हेरिटेज कमिटीच्या माध्यमातून काही ना काही प्रयत्न सुरू असताना नाशिकमध्ये तसे होत नाहीत, अशी खंत नाशिकमधील अभियंता आणि पुरातत्व क्षेत्रातील अभ्यासक योगेश कासार यांनी व्यक्त केली.

कासार हे नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरचे सदस्य असून, नाशिकमध्ये पुरातन वास्तू, मंदिरे इतकेच नव्हे तर नदी संवर्धनाचाहीदेखील अभ्यास करीत आहेत. सध्या जागतिक वारसा सप्ताह सुरू असून, त्या पार्श्वभूमीवर लोकमतशी संवाद साधताना नाशिक महापालिकेच्या वतीने हेरिटेज कमिटी स्थापन करावी, अशी मागणी केली.

प्रश्न- नाशिकमध्ये वारसा जतन करण्याची गरज का भासते?कासार- नाशिक हे खूपच संपन्न शहर आहे. या शहरात अगणित वास्तू आहेत. त्याचे कुठे तरी जतन झाले पाहिजे. नाशिक शहरात जुने वाडे आहेत. उन्हाळ्यात शीतल, तर हिवाळ्यात तापमान कायम राखणारे हे वाडे खऱ्या अर्थाने ग्रीन बिल्डिंग आहेत. परंतु त्याचे महत्त्व लक्षात आले पाहिजे, गोदावरी तसेच अनेक मंदिरे हेदेखील शहराचा वारसा आहे. तो आहे, त्याच पद्धतीने जतन करणे हे खरे कौशल्य आहे.

प्रश्न - हेरिटेज कमिटीच्या माध्यमातून काय साध्य होऊ शकते?कासार - सध्या मुंबई, पुणे, सेालापूर, कोल्हापूर, औरंगाबाद अशा अनेक महापालिकांमध्ये हेरिटेज कमिटी आहेत. त्या आपल्या क्षेत्रातील वास्तू जतन करण्यासाठी प्रयत्न करतात. नाशिकमध्ये महापालिकेने एक समिती स्थापन केली होती, त्यांनी काही वाडेदेखील अधिसूचित केले. परंतु या समितीला अधिकार देण्यात आले नसल्याने वारसा जतन करण्याचे काम झाले नाही. त्यामुळे त्यांनी जे वाडे संवर्धन करण्यासाठी ठेवण्याचे ठरवले हेाते. ते सारेच आज जागेवरच नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालये, काळाराम मंदिर अशा अनेक वास्तू अत्यंत पुरातन आणि पाषाणातील आहेत, त्याचे संवर्धन शास्त्रीय पद्धतीने झाल्यास त्या टिकू शकतील. अशास्त्रीय पद्धतीने काम झाल्यास तो केवळ दिखावा ठरेल.

प्रश्न- अशा वास्तू संवर्धनाबाबत नागरिकांतही जागृती हवी?कासार- होय. अनेकदा एखादी वास्तू पुरातन असल्याने ती संग्रहित करायचा निर्णय घेतला तर आपला मालकी हक्क संपुष्टात येईल असे अनेकांना वाटते. त्या भीतीने ते वास्तू संरक्षित करू देण्यास विरोध करतात. वास्तविक अशा इमारतींची अ, ब, क, ड अशी विगतवारी केली जाते. त्यात अ दर्जाच्या मिळकतींमध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करता येत नाही ब, क, ड मध्ये काहीअंतर्गत, तर काही बाह्य बदल करता येतात हे समजून घेतले पाहिजे. तसे झाल्यास नागरिकांचा प्रतिसाद निश्चितच वाढू शकतो.सध्या तर राज्य शासन एक ट्रस्ट निर्माण करून त्या माध्यमातून कंपन्याच्या सीएसआर निधीचा वापर करता येईल काय याचा विचार सुरू आहे. त्याचा फायदा होऊ शकतो.

मुलाखत संजय पाठक

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाState Governmentराज्य सरकार