शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

लष्करी अळीच्या हल्ल्याने शेतकरी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 16:33 IST

कळवण तालुका : वडाळेवणीत जागृती मेळावा

ठळक मुद्देमका पिकाची उगवण होताच बळीराजा हजारो रु पये खर्च करून कीटक नाशकांच्या फवारण्या करत आहेत. परंतु काही प्रमाणात अळीच्या नियंत्रणासाठी यश आले असले तरी अनेक जण मात्र हतबल झाले आहेत.

कळवण - कळवण तालुक्यात अमेरिकन लष्करी अळीने मका पिकावर हल्ला चढविल्याने शेतकरी बांधव हतबल झाले आहेत. कृषी विभागाने नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू केले असून कृषी सहाय्यक संगीता राऊत ,मंडळ कृषी अधिकारी सीताराम पाखरे तसेच तालुका कृषी अधिकारी विजय पाटील यांनी मौजे-वडाळे वणी गावात जाऊन शेतकरी मेळावा तसेच प्रत्यक्ष शेतात जाऊन लष्करी अळी बाबत जागृती केली.तालुक्यात अजून पूर्णपणे पेरणी झालेली नाही. आतापर्यंत अंदाजे १६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. तालुक्यात ज्या भागात पाऊस झाला त्या भागात मका पिकाच्या पेरण्या झालेल्या आहेत . मात्र उगवणी नंतर झाड वाढीस लागताच पानावर लष्करी अळी हल्ला करीत असल्याने बळीराजा हतबल झाला आहे .तालुक्यात पहिल्यांदाच या अळीने आक्रमण केले आहे . या अळीची अंडी कोष पतंग या चार अवस्थेत वाढ होते. हि अळी हजार ते दीडहजार अंडी देते. पिकाच्या कोवळ्या फांद्यांवर हल्ला चढवते . त्यामुळे पानावर पांढरे चट्टे पडतात . अळी मोठी आल्यानंतर पिकाचे पाने खाऊन त्यावर विष्ठा करतात. त्यामुळे वाढीपूर्वी मक्याच्या फांद्यांचे प्रचंड नुकसान होते. मका पिकाची उगवण होताच बळीराजा हजारो रु पये खर्च करून कीटक नाशकांच्या फवारण्या करत आहेत. परंतु काही प्रमाणात अळीच्या नियंत्रणासाठी यश आले असले तरी अनेक जण मात्र हतबल झाले आहेत. यामुळे कृषी विभागाने तालुक्यात गावागावात जाऊन पिकाची पाहणी सुरु केली आहे. विविध गावात अळी नियंत्रणात आणण्यासाठी मेळावे घेतले जात आहेत ...अशी करा उपाययोजना!कीड ग्रस्त पिकाच्या शेतातील खोल नांगरणी करावी म्हणजे पक्षांद्वारे किडीच्या वेगवेगळ्या अवस्था नष्ट करण्यास मदत होते. शेतात एकरी ४ पक्षी थांबे उभारावेत जेणे करून पानावरील अळी टिपून खाते. पिकावरील नियमित सर्वेक्षण करावे. या किडींचे पतंगांना आकर्षित करण्यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा. पिकावरील अंडी समूह अळ्या हाताने गोळा करून नष्ट कराव्यात. १५०० पी.पी.एम. किव्हा निंबोळी अर्क ५ टक्के ५० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फराव्यात. मका अमेरिकन लष्करी अळीच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी विजय पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती