शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

लष्करी अळीच्या हल्ल्याने शेतकरी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 16:33 IST

कळवण तालुका : वडाळेवणीत जागृती मेळावा

ठळक मुद्देमका पिकाची उगवण होताच बळीराजा हजारो रु पये खर्च करून कीटक नाशकांच्या फवारण्या करत आहेत. परंतु काही प्रमाणात अळीच्या नियंत्रणासाठी यश आले असले तरी अनेक जण मात्र हतबल झाले आहेत.

कळवण - कळवण तालुक्यात अमेरिकन लष्करी अळीने मका पिकावर हल्ला चढविल्याने शेतकरी बांधव हतबल झाले आहेत. कृषी विभागाने नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू केले असून कृषी सहाय्यक संगीता राऊत ,मंडळ कृषी अधिकारी सीताराम पाखरे तसेच तालुका कृषी अधिकारी विजय पाटील यांनी मौजे-वडाळे वणी गावात जाऊन शेतकरी मेळावा तसेच प्रत्यक्ष शेतात जाऊन लष्करी अळी बाबत जागृती केली.तालुक्यात अजून पूर्णपणे पेरणी झालेली नाही. आतापर्यंत अंदाजे १६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. तालुक्यात ज्या भागात पाऊस झाला त्या भागात मका पिकाच्या पेरण्या झालेल्या आहेत . मात्र उगवणी नंतर झाड वाढीस लागताच पानावर लष्करी अळी हल्ला करीत असल्याने बळीराजा हतबल झाला आहे .तालुक्यात पहिल्यांदाच या अळीने आक्रमण केले आहे . या अळीची अंडी कोष पतंग या चार अवस्थेत वाढ होते. हि अळी हजार ते दीडहजार अंडी देते. पिकाच्या कोवळ्या फांद्यांवर हल्ला चढवते . त्यामुळे पानावर पांढरे चट्टे पडतात . अळी मोठी आल्यानंतर पिकाचे पाने खाऊन त्यावर विष्ठा करतात. त्यामुळे वाढीपूर्वी मक्याच्या फांद्यांचे प्रचंड नुकसान होते. मका पिकाची उगवण होताच बळीराजा हजारो रु पये खर्च करून कीटक नाशकांच्या फवारण्या करत आहेत. परंतु काही प्रमाणात अळीच्या नियंत्रणासाठी यश आले असले तरी अनेक जण मात्र हतबल झाले आहेत. यामुळे कृषी विभागाने तालुक्यात गावागावात जाऊन पिकाची पाहणी सुरु केली आहे. विविध गावात अळी नियंत्रणात आणण्यासाठी मेळावे घेतले जात आहेत ...अशी करा उपाययोजना!कीड ग्रस्त पिकाच्या शेतातील खोल नांगरणी करावी म्हणजे पक्षांद्वारे किडीच्या वेगवेगळ्या अवस्था नष्ट करण्यास मदत होते. शेतात एकरी ४ पक्षी थांबे उभारावेत जेणे करून पानावरील अळी टिपून खाते. पिकावरील नियमित सर्वेक्षण करावे. या किडींचे पतंगांना आकर्षित करण्यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा. पिकावरील अंडी समूह अळ्या हाताने गोळा करून नष्ट कराव्यात. १५०० पी.पी.एम. किव्हा निंबोळी अर्क ५ टक्के ५० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फराव्यात. मका अमेरिकन लष्करी अळीच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी विजय पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती