शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

मानवनिर्मित दुर्घटनाग्रस्तांनाही मिळणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 01:41 IST

राष्टÑीय व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत नैसर्गिक आपत्तीतील दुर्घटना घडल्यास संंबंधितांना नुकसानभरपाई देण्याची तरतूद असली तरी, काही दुर्घटना मानवनिर्मित घडत असल्याने त्यात बळी पडणाऱ्यांना आर्थिक मदत देण्याची आजवर नसलेली तरतूद शासनाने पूर्ण केली आहे. यापुढे किटकनाशक फवारणीतून होणारी विषबाधा, सार्वजनिक ठिकाणी घडणारी चेंगराचेंगरी व घरे, इमारत कोसळून होणाºया दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांनाही मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देचार लाखांची भरपाई : राज्य शासनाचा निर्णय

नाशिक : राष्टÑीय व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत नैसर्गिक आपत्तीतील दुर्घटना घडल्यास संंबंधितांना नुकसानभरपाई देण्याची तरतूद असली तरी, काही दुर्घटना मानवनिर्मित घडत असल्याने त्यात बळी पडणाऱ्यांना आर्थिक मदत देण्याची आजवर नसलेली तरतूद शासनाने पूर्ण केली आहे. यापुढे किटकनाशक फवारणीतून होणारी विषबाधा, सार्वजनिक ठिकाणी घडणारी चेंगराचेंगरी व घरे,इमारत कोसळून होणाºया दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांनाही मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.नैसर्गिक आपत्तीत वित्तहानीव जीवितहानी झाल्यास भरपाई देण्याची तरतूद असली तरी, त्यात ठरावीक हानींसाठीच भरपाई दिली जाते. परंतु मानवनिर्मित दुर्घटनाग्रस्तांना शासनाकडून आजवर कोणतीही मदत देण्याची तरतूद नव्हती. त्यामुळे अशा दुर्घटनांमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनच मदतीसाठी प्रयत्न करावे लागत असे व त्यासाठी लोकप्रतिनिधींना गळ घालावी लागे. या सर्व गोष्टींचा विचार करता, ज्याप्रमाणे दंगलग्रस्त, आपदग्रस्तांना मदत देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याची शासनाची सन २००४ मधील योजना आहे, त्याच धर्तीवर मानवनिर्मित आपत्तीच्या घटनांमध्ये आपदग्रस्तांना सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून तातडीने आर्थिक मदत देण्याचा निर्णय शासनाने अलीकडेच घेतला आहे. त्यात प्रामुख्याने शेतात किटकनाशक फवारणी करीत असताना होणाºया विषबाधेतून घडणारी दुर्घटना, धार्मिक ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी होणारी चेंगराचेंगरी, मोडकळीस आलेल्या अथवा जीर्ण झालेल्या निवासी इमारती, घरे कोसळून होणारे अपघात अशा आपत्तीच्या घटनांमध्ये यापुढे नुकसानभरपाई दिली जाणार आहे. त्यात मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयास चार लाख रुपये तर अपंगत्व आल्यास कमीत कमी ५० हजार ते दोन लाख रुपये, जखमी झाल्यास तीन ते चौदा हजार रुपये दिले जाणार आहे.

टॅग्स :GovernmentसरकारMONEYपैसा