शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

जळगाव नेऊर परिसरात मुसळधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 15:00 IST

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील जळगाव नेऊर परिसरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी चिंतीत आहे.

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील जळगाव नेऊर परिसरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी चिंतीत आहे. शेवगे, सातारे, एरंडगाव, पिंपळगाव लेप, जऊळके परिसरात बुधवारी (दि.३०) विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. सतत पंधरा दिवसांपासून पाऊस सुरूच असल्याने पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. त्यात प्रामुख्याने मका, सोयाबीन, पोळ कांदा ही नगदी पिके उद्ध्वस्त झाली आहेत, तर कापणी केलेल्या मका, सोयाबीनला कोंब येऊन चारा पूर्ण सडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तालुक्यातील जवळपास सर्वच परिसरात परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेल्या खरीप हंगामातील शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे यंदाची बळीराजाची दिवाळी अंधारातच गेली. पश्चिम भागातील जळगाव नेऊर, शेवगे, सातारे, पिंपळगाव लेप, जऊळके, पुरणगाव, नेऊरगाव, एरंडगाव भागात मोठ्या प्रमाणावर मका, कांदा, सोयाबीन, कपाशी पिके परतीच्या पावसाने खराब झाली आहेत. यावर्षी चांगले पिकांचे उत्पादन होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती; पण या सर्वांवर परतीच्या पावसाने पाणी फेरले आहे. या पिकांसाठी औषधे व खतांचा मोठा खर्च झाला असून, शेतकरी कर्जाच्या खाईत बुडाला आहे. त्यामुळे शासनाने या परिसरातील पिकांचा पंचनामा करून तत्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक