शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

वादळी पावसामुळे १५०० हेक्टरवरील मका पिकाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 16:26 IST

कळवण : तालुक्यात वादळी पावसामुळे जवळपास १५०० हेक्टर क्षेत्रावरील मका पीक भुईसपाट झाले. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तत्काळ मकाबाधित क्षेत्रातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देपुनंद व चणकापूरचे जलपूजन

कळवण : तालुक्यात वादळी पावसामुळे जवळपास १५०० हेक्टर क्षेत्रावरील मका पीक भुईसपाट झाले. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तत्काळ मकाबाधित क्षेत्रातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.आमदार नितीन पवार यांनी तालुक्यातील बाधित गावांतील मका पिकाची शेतात व बांधावर जाऊन पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला व नुकसानीची माहिती घेतली. तालुक्यातील मका पिकाच्या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाने वस्तुनिष्ठ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी आमदार पवार यांनी जिल्हाधिकाºयांकडे दोन दिवसांपूर्वी केली होती. तालुक्यातील बाधित गावांतील मका पिकाचे सविस्तर आणि वस्तुनिष्ठ पंचनामे झाल्यानंतर जास्तीतजास्त नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचेआश्वासन पवार यांनी पहाणी दौºयात शेतकºयांना दिले होते. तहसीलदार बी. ए. कापसे, उपविभागीय कृषी अधिकारी कैलास खैरनार, गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम, तालुका कृषी अधिकारी विजय पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे रूपेश खेडकर, जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी, पंचायत समिती सभापती मीनाक्षी भोये, उपसभापती विजय शिरसाठ, राष्टÑवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांनी तालुक्यातील आठबे, सादडविहीर, कन्हेरवाडी, नरूळ, ओतूर, कुंडाणे, शिरसमणी, कळवण खुर्द, पिळकोस, चाचेर, भादवन, बिजोरे, ककाणे, मोकभणगी, गणोरे, शेरी, भैताणे, काठरे, सुपले, खडकी जयदर, जयदर, कोसवन, वेरुळे, करंभेळ, वडाळा, देवळीकराड, मोहपाडा, चणकापूर येथे जाऊन शेतकºयांशी संवाद साधला. वडेल येथील कृषी विज्ञान केंद्राचे रूपेश खेडकर यांनी मका व सोयाबीन नुकसानीसंदर्भात मार्गदर्शन केले. पाहणी दौºयात राजेंद्र्र भामरे, संतोष देशमुख, सुनील देवरे, विलास रौंदळ, शिवाजी चौरे, बाळासाहेब शेवाळे, हिरामण वाघ, संदीप वाघ, प्रल्हाद गुंजाळ, पंकज जाधव, शांताराम जाधव यांच्यासह शासकीय अधिकारी, कमर्चारी सहभागी झाले होते.पुनंद व चणकापूरचे जलपूजनतालुक्यात गेल्या आठवड्यापासून पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे चणकापूर आणि पुनंद धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत असून, पुनंद व गिरणा नदीला व चणकापूर उजव्या कालव्याला पूरपाणी सोडण्यात आले आहे. चणकापूर व पुनंद धरणाच्या पातळीत वाढ झाल्याने आमदार नितीन पवार व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी सपत्निक जलपूजन केले. यावेळी नारायण हिरे, लालाजी जाधव, रघू महाजन उपस्थित होते. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी