शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 01:01 IST

नाशिक : विजांचा कडकडाट आणि जोरदार वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोपडून काढले. दुपारनंतर जिल्ह्यात एकूण १८.८६ मि.मी. इतकी पावसाची नोंद झाली, तर या पावसामुळे काही नद्यांना पुन्हा एकदा पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले तर टमाटा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

ठळक मुद्देपूरपरिस्थिती : शहरात अवघ्या दीड तासात ४० मि.मी. पाऊस

गोदेला आलेल्या पुरात वाहनेदेखील वाहून गेली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विजांचा कडकडाट आणि जोरदार वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोपडून काढले. दुपारनंतर जिल्ह्यात एकूण १८.८६ मि.मी. इतकी पावसाची नोंद झाली, तर या पावसामुळे काही नद्यांना पुन्हा एकदा पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले तर टमाटा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. शेतामध्ये साचलेल्या पाण्यामुळेदेखील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, शहरात अवघ्या दीड तासात ४० मि.मी. पाऊस झाला आहे.येत्या १४ तारखेपर्यंत जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.जिल्ह्यात सर्वदूर बरसलेल्या परतीच्या पावसाने चांगलीच दाणादाण उडवून दिली. दुपारनंतर टप्प्याटप्प्याने बरसलेल्या पाऊसधारांनी जिल्ह्यातील अनेक भागाला झोडपून काढले. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस हा येवला आणि बागलाण तालुक्यामध्ये झाला. सुमारे दीड ते दोन तास झालेल्या पावसामुळे शेतकºयांना पिकांची चिंता लागली आहे. येवला येथे ५९ मि.मी. तर बागलाणला ४४ मि.मी. पावसाची नोंद झाली. येवला तालुक्यालादेखील परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले असून, रविवारी झालेल्या पावसाने काही ठिकाणी घरांचे छप्पर उडाले तर पिकांचेदेखील नुकसान झाले आहे.रविवारी जिल्ह्यात सरासरी १८.८६ मि.मी. इतका पाऊस झाला असून, या हंगामात एकूण १५९३ मि.मी. इतकापाऊस नोंदला गेला आहे. यामध्ये परतीच्या पावसाची गेल्या आठ दिवसांची आकडेवारी मोठी आहे.  इगतपुरी अािण त्र्यंबकेश्वरलादेखील परतीच्या पावसाने पुन्हा एकदा दणका दिला. इगतपुरीत रविवारी ४० तर त्र्यंबकेश्वरला १३ मि.मी. पाऊस नोंदला गेला. अन्य तालुक्यांमध्ये निफाड आणि सिन्नरच्या शेतकºयांना पावसाचा फटका बसला आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत नाशिक तालुक्यात ४८ मि.मी. पावसाची नोंद झाली.धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाला नसला तरी सदर परिस्थिती पुढील आठ दिवस कायम राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्णात धरणक्षेत्र परिसरात पाऊस झाला नसला तरी जिल्ह्णातील मध्यवर्ती भागात जोरदार पाऊस झाल्याने नद्या, नाले, ओहळांच्या पाणीपातळीत वाढ झाली. पावसानंतर सुमारे तासभर रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहत होते. यामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला. येत्या १४ तारखेपर्यंत जिल्ह्णात अनेक ठिकाणी विशेषत: घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता विर्तविण्यात आलेली आहे. दिंडोरीत झालेल्या पावसामुळे परिसरातील शेतकºयांच्या टमाटा पिकाचे नुकसान झाले आहे. वाहून गेल्याने पिंंपळगावच्या शेतकºयाचा मृत्यूपिंपळगाव बसवंत : पूरपाण्याचा अंदाज न आल्याने फरशी पुलावरून वाहून गेल्याने रामचंद्र फकिरा पवार (४५) यांचा मृत्यू झाला. पवार शनिवारी (दि.५) सायंकाळी त्यांच्या शेतातून गावात येत होते. अचानक मुसळधार पाऊस झाल्याने येथील पराशरी नदीला पूर आल्यामुळे फरशी पूलही पाण्याखाली गेला. त्यातच पाण्याचा प्रवाह वाढला. पवार यांनी पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला; मात्र पाण्याच्या प्रवाहात ते वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रात्री उशिरा येथील प्राथमिक रु ग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस निरीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पंडित वाघ तपास करीत आहेत.

टॅग्स :floodपूरNashikनाशिक