शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाचा जिल्ह्याला तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 00:33 IST

नाशिक : निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्याला तडाखा बसला असून, अनेक जनावरे मृत्युमुखी पडण्यासोबतच घरांची पडझड व शेतमालाच्या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

नाशिक : निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्याला तडाखा बसला असून, अनेक जनावरे मृत्युमुखी पडण्यासोबतच घरांची पडझड व शेतमालाच्या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाले आहेत.सटाणा : बागलाण तालुक्यात बुधवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या मान्सून पूर्व वादळी पावसामुळे पशुधन, घरे आणि डाळिंबबागांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. सुमारे ६७ गायी, वासरे, शेळ्या-मेंढ्या मृत्युमुखी पडल्या तर ठिकठिकाणी २३ घरांची पडझड तसेच पत्रे उडून लाखो रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान, वादळी पावसामुळे कोटबेल, वीरगाव, फोपीर, नळकस, खिरमाणी, वनोली, आव्हाटी या भागातील डाळिंबबागा भुईसपाट होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आमदार दिलीप बोरसे यांनी नुकसानग्रस्त भागाची गुरु वारी सकाळी पाहणी करून तातडीने पंचनामे व त्याचा अहवाल भरपाईसाठी शासनाकडे पाठवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला केल्या.शहरासह तालुक्यात बुधवारी सायंकाळपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली. वादळामुळे बहुतांश ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. या वादळी पावसामुळे तालुक्यातील राहुड, वघानेपाडा, टिंगरी, श्रीपूरवडे, ढोलबारे येथील बारा शेतकºयांच्या सोळा गायी, बारा वासरे, शेळ्या, बोकड आणि मेंढ्या अशी ६७ जनावरे मृत्युमुखी पडून सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्रथमिक अंदाज आहे. नामपूर, अजमीर सौंदाणे, तळवाडे दिगर, टिंगरी येथे प्रत्येकी चार, ढोलबारे पाच, ब्राह्मणगाव, ताहाराबाद, नरकोळ येथे प्रत्येकी एक अशा २३ घरांची पडझड तसेच घरांवरची पत्रे उडून अंशत: नुकसान झाल्याचा अंदाज आहे तसेच डाळिंबबागांसह कांदा व बाजरीचे उभे पीक भिजून शेतकºयांना आर्थिक फटका बसला आहे तरकोटबेल, फोपीर, खिरमाणी, नळकस, वीरगाव, आव्हाटी, वनोली येथे डाळिंब पिकाचे नुकसान झाले आहे. बहार घेतलेली डाळिंबाची झाडे भुईसपाट झाल्याने शेतकºयांना फटका बसला आहे.सिन्नर : तालुक्यात वादळी पावसामुळे वीज वितरण कंपनी व शेतकºयांना मोठ्या नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ आली. अनेकांच्या घरांचे पत्रे उडाले. शेकडो वृक्ष उन्मळून पडले. सर्वाधिक नुकसान वीज वितरण कंपनीचे झाले. सुमारे ७० विजेचे खांब पडल्याने रात्रभर तालुका अंधारात होता.गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सोसाट्याच्या वाºयासह पावसाचे सिन्नर तालुक्यात आगमन झाले. नांदूरशिंगोटे, दापूर या भागात वादळ व पावसाचा जोर जास्त होता. शहरासह ग्रामीण भागात अनेक मोठे वृक्ष उन्मळून पडल्यामुळे मोठे नुकसान झाले. वादळी वाºयामुळे अनेकांच्या घरांचे, गोठ्याचे पत्र उडून पडले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तहसीलदार राहुल कोताडे यांच्यासह प्रशासकीय अधिकाºयांनी अगोदरच सर्वांना दक्षतेचा इशारा देत दुपारी २ वाजेपर्यंत आपली दुकाने व व्यवसाय बंद करून घरात सुरक्षित राहण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार नागरिकांनी काळजी घेतल्याने जीवितहानी झाली नाही.साडेपाच वाजेच्या सुमारास सर्व तालुकाभर वादळी पावसाला प्रारंभ झाला. काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता, तर उर्वरित भागात विजेचा लपंडाव सुरू होता. सुमारे८ वाजेपर्यंत वादळी पावसाचा जोर होता. ग्रामीण भागात मका, टमाटे, डाळिंबबागांचे नुकसान झाले. पावसापेक्षा वादळाचा जोर असल्याने पत्रे उडून नुकसान होण्याचे प्रमाण जास्त होते. विंचूरदळवी ग्रामपंचायत प्रशासनाने धोकादायक घरातील नागरिकांना प्राथमिक शाळा व मंदिरात अगोदरच स्थलांतरित केले होते. जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात होती.वावी व कहांडळवाडी या भागात अनेक वृक्ष उन्मळून पडले. कहांडळवाडी येथील रावसाहेब राजेभोसले यांच्या डाळिंब बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यातील सर्वच भागात वादळ व पावसाचा जोर होता. रात्री ८ वाजेनंतर पाऊस व वादळ थांबल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मका पीक मोठ्या प्रमाणात होते. डुबेरे, पांढुर्ली, ठाणगाव या भागात वादळी वाºयाने मका पिकाचे नुकसान झाले.

टॅग्स :Nashikनाशिक