शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

मटाणे परिसरात पावसाने पिके उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 00:35 IST

मेशी : गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे देवळा तालुक्यातील पश्चिम भागातील मटाणे, वरवंडी आदी गावांमधील सर्व खरीप पिके उद्ध्वस्त झाली आहेत.

ठळक मुद्दे. भाजीपाला, कांदा पूर्णपणे खराब झाला

 

 

लोकमत न्यूज नेटवर्कमेशी : गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे देवळा तालुक्यातील पश्चिम भागातील मटाणे, वरवंडी आदी गावांमधील सर्व खरीप पिके उद्ध्वस्त झाली आहेत.यात उभे असलेले मका, भुईमूग, तूर, कांदा आदी पिके पाण्यात असल्याने काळी पडून सडू लागली आहेत. याशिवाय सोंगणी केलेल्या बाजरीचे कणीस शेतातच ढीग करून पडले असल्याने त्यावरून कापड टाकलेली झाकून ठेवल्यामुळे काळी कणसे होऊन अंकुर फुटलेत त्यामुळे बाजरीची पिके गेलीत. मागील वर्षी अत्यंत कमी पाऊस झाला होता त्यामुळे दुष्काळी दुष्टचक्र सोसत असलेला शेतकरी राजास यावर्षी ओल्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने बळीराजाची धाकधूक वाढली आहे. भाजीपाला, कांदा पूर्णपणे खराब झाला आहे.कांदा उपटताना कांदा जमिनीत राहतो आणि फक्त पातच हातात येते. कांदे पूर्णपणे जमिनीतच सडला आहे. गुरुवारी रात्रभर झालेल्या पावसाने शेतात गुडघ्यापर्यंत पाणी साचलेले आहे. त्यामुळे जमीन खराब झाली आहे. डाळिंबबागा मर रोगामुळे नेस्तनाबूत होत आहे. सर्व शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. मायबाप शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून मदत करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी यावेळी केली आहे.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी