शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे घरांची पडझड, नुकसानभरपाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 17:54 IST

श्रमजीवींचे निवेदन : ग्रामीण भागात मोठे नुकसान

ठळक मुद्देलोकांना नुकसानभरपाई देण्यात आली नसल्याने अजूनही काही लोक पडक्याच घरात राहत आहेत.

शेणीत : इगतपुरी तालुक्यातील असंख्य गावांमध्ये गेल्या चार महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने नुकसान झाले आहे. सदर नुकसानीची त्वरित भरपाई मिळावी यासाठी श्रमजीवी संघटनेचे नाशिक जिल्हा सरचिटणीस भगवान मधे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने इगतपुरीच्या तहसीलदार अर्चना भाकड यांना निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात गेल्या चार महिन्यांत अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे शेतपिकांबरोबरच ग्रामीण भागातील घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली आहे. अनेक कुटुंबांना पावसाच्या पाण्यातच घरात राहावे लागले तर काही लोक बेघर झाले. या घरांच्या पडझडीबाबत नुकसानग्रस्त रहिवाशांनी स्थानिक तलाठीमार्फत पंचनामा करून प्रकरण तहसीलदार यांच्याकडील कार्यालयात जमा केले आहे. त्यात घोटी बुद्रुक २, शिरसाठे गाव ७, मोडाळे गाव १२, पांगुळगाव १, परदेश वाडी ३, खेड १, कुरनगवाडी १, गोंदे दुमाला ३, मुरंबी २०, कुशेगाव २, आधारवड ४, धारगाव ३, धामणगाव १२,नांदगाव सदो ३, बोरली २, पाडळी १०, मालुंजे ९, मोगरे ४, मांजरगाव १०, वालवीर ४२, कांचनगाव १५, काळुस्ते ४८ यासह अडसरे, शिरसाठे, मोडले, खेड, बेलगाव कुºहे, शेणीत, खडकेद, टाकेद अन्य गावांतील २९६ नुकसान बाधित लोकांचे अर्ज तहसील कार्यालयात दाखल आहेत. मात्र, त्यावर अद्याप कुठलीच कार्यवाही करण्यात आली नाही. लोकांना नुकसानभरपाई देण्यात आली नसल्याने अजूनही काही लोक पडक्याच घरात राहत आहेत. नुकसानग्रस्त लोकांना लवकरात लवकर भरपाई मिळावी, अशी मागणी श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे, संजय ठोंबरे, शांताराम भगत यांनी केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस