शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

दमदार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 14:52 IST

देवगाव : देवगाव व परिसरात तब्बल पंधरा दिवसानंतर पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले असून शेतकऱ्यांना मोठा ...

ठळक मुद्देपंधरा दिवसानंतर हजेरी : दुबार पेरणीचे संकट टळले

देवगाव : देवगाव व परिसरात तब्बल पंधरा दिवसानंतर पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून समाधान व्यक्त केले आहे.यावर्षी जूनच्या सुरूवातीला चांगला पाउस झाल्याने देवगाव व परीसरातील शेतकºयांनी मोठ्या अपेक्षेने खरीप पिकांची पेरणी उरकली. कोरोना व लॉकडाऊनचा सामना करत पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपली. काही शेतकºयांनी हात उसनवारीने तर काहींनी पिकांच्या उत्पन्नातून बियाण्याचे पैसे देण्याचा वायदा करून तसेच काहींनी मुलांच्या शिक्षणासाठी राखून ठेवलेल्या पैश्यातून बियाण्याची खरेदी केली. पेरणीनंतर मात्र पावसाने पंधरा ते वीस दिवस पाठ फिरवल्याने पिके पिवळी पडू लागल्याने दुबार पेरणी करावी लागते की काय? या विवंचनेत शेतकºयांची चिंता वाढली होती. गेल्या काही दिवसांपासून आकाशात रोज ढग दाटून येत होते. मात्र पाऊस पडत नव्हता मात्र दोन दिवसापासून उकाडा होत होता. हवा बंद व दमट वातावरण निर्माण होऊन सकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. सायंकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली.नऊ वाजेच्या दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावल्याने देवगाव व परीसरात पिकांना मोठा आधार मिळाला. या जोरदार पावसामुळे तापमानात घट होऊन हवेत गारवा निर्माण झाल्याने उष्म्याने हैराण झालेल्या नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला. पाऊस जोरदार असल्याने पिकांवरील काही प्रमाणात अळींचा प्रादुर्भाव कमी होईल, असे मत व्यक्त करत शेतकºयांच्या चेहºयावर समाधान दिसले. यापुढे पर्जन्यमान चांगले राहून खरीप उत्पादन वाढण्याची शेतकरी वर्गास अपेक्षा आहे.चौकट...झालेल्या पावसाने प्रामुख्याने पेरणी झालेल्या सोयाबीन तसेच मका, टोमॅटो या पिकाला मोठा फायदा होणार आहे. पर्जन्यवृष्टी झाली असल्याने खरीप पिकांना आधार लाभला आहे. त्यामूळे दुबार पेरणीच्या संकटातून सुटका झाल्याने शेतकºयांना दिलासा लाभला आहे. काही भागात विहिरींना देखील पाणी उतरण्यास प्रारंभ झाला असून शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.चौकट...देवगाव व परिसरात आतापर्यंत ७५ ते ८० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरीत पेरण्यांनाही शेतकºयांनी गती दिली आहे. यावर्षी शेतकºयांनी सोयाबीन लागवडीस अधिक प्राधान्य दिले असून त्यापाठोपाठ टोमॅटो, मका, भुईमूग लागवडीकडे शेतकºयांचा कल दिसून आला आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती