शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे नेत्यांना आदेश; जिल्हाप्रमुखांपासून सगळ्यांना पोहचला संदेश
2
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
3
कणकवलीत नाट्यमय घडामोडी, कट्टर विरोधक एकत्र, निलेश राणेंचा थेट ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
4
पाकिस्तानच्या शेअर बाजारात पैशांचा पाऊस, भारत राहिला मागे; एक्सपर्ट म्हणाले, "पुढच्या १० वर्षांत..."
5
अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती आता कशी आहे? 'ही मॅन' यांच्याबाबत मोठी अपडेट समोर
6
"एका मिनिटात खटला संपला, ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात महत्त्वाचे मुद्दे मांडलेच नाही"; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
7
२१ नोव्हेंबर, मार्गशीर्ष मास; देवदिवाळी, नागदिवाळी, महालक्ष्मी व्रत, दत्त जयंती व्रत वैकल्याचा महिना
8
Palmistry: तळहातावर ‘या’ रेषा करतात अचानक श्रीमंत, शनिचे वरदान; भरपूर पैसा, राजयोगाचे जीवन!
9
देव दिवाळी २०२५: ९ राशींना शुभ-लाभ, मनासारखे यश; ठरलेली कामे होतील, पैसा मिळेल, पण मोह टाळा!
10
रशियाचं भारतप्रेम वाढलं! कच्चं तेल-गॅसनंतर आता दिली 'ही' मोठी ऑफर; अमेरिकेला लागणार झटका?
11
Mumbai Weather: मुंबईत हुडहुडी! १२ वर्षांत पहिल्यांदाच 'इतक्या' नीचांकी ताममानाची नोंद
12
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
13
"त्या माणसाच्या अवयवांचा माज ठेचायला हवा...", मालेगावात चिमुकलीवर अत्याचार करून हत्या, मराठी अभिनेत्री संतापली
14
नेपाळमध्ये पुन्हा भडकलं Gen Z आंदोलन, युवक रस्त्यावर उतरले; कर्फ्यू लागू, एअरपोर्ट सेवा बंद
15
Mumbai: जोडीदाराकडून आत्महत्येची वारंवार धमकी ही क्रूरताच: मुंबई उच्च न्यायालय
16
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; Nifty २६,१०० च्या जवळ, मेटल-ऑटो शेअर्समध्ये खरेदी
17
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
18
लाल किल्ल्यापासून काश्मीरपर्यंत घुसून मारू; हल्ल्यात पाकिस्तान सहभागी असल्याची PoKची कबुली
19
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
20
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 14:52 IST

देवगाव : देवगाव व परिसरात तब्बल पंधरा दिवसानंतर पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले असून शेतकऱ्यांना मोठा ...

ठळक मुद्देपंधरा दिवसानंतर हजेरी : दुबार पेरणीचे संकट टळले

देवगाव : देवगाव व परिसरात तब्बल पंधरा दिवसानंतर पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून समाधान व्यक्त केले आहे.यावर्षी जूनच्या सुरूवातीला चांगला पाउस झाल्याने देवगाव व परीसरातील शेतकºयांनी मोठ्या अपेक्षेने खरीप पिकांची पेरणी उरकली. कोरोना व लॉकडाऊनचा सामना करत पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपली. काही शेतकºयांनी हात उसनवारीने तर काहींनी पिकांच्या उत्पन्नातून बियाण्याचे पैसे देण्याचा वायदा करून तसेच काहींनी मुलांच्या शिक्षणासाठी राखून ठेवलेल्या पैश्यातून बियाण्याची खरेदी केली. पेरणीनंतर मात्र पावसाने पंधरा ते वीस दिवस पाठ फिरवल्याने पिके पिवळी पडू लागल्याने दुबार पेरणी करावी लागते की काय? या विवंचनेत शेतकºयांची चिंता वाढली होती. गेल्या काही दिवसांपासून आकाशात रोज ढग दाटून येत होते. मात्र पाऊस पडत नव्हता मात्र दोन दिवसापासून उकाडा होत होता. हवा बंद व दमट वातावरण निर्माण होऊन सकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. सायंकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली.नऊ वाजेच्या दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावल्याने देवगाव व परीसरात पिकांना मोठा आधार मिळाला. या जोरदार पावसामुळे तापमानात घट होऊन हवेत गारवा निर्माण झाल्याने उष्म्याने हैराण झालेल्या नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला. पाऊस जोरदार असल्याने पिकांवरील काही प्रमाणात अळींचा प्रादुर्भाव कमी होईल, असे मत व्यक्त करत शेतकºयांच्या चेहºयावर समाधान दिसले. यापुढे पर्जन्यमान चांगले राहून खरीप उत्पादन वाढण्याची शेतकरी वर्गास अपेक्षा आहे.चौकट...झालेल्या पावसाने प्रामुख्याने पेरणी झालेल्या सोयाबीन तसेच मका, टोमॅटो या पिकाला मोठा फायदा होणार आहे. पर्जन्यवृष्टी झाली असल्याने खरीप पिकांना आधार लाभला आहे. त्यामूळे दुबार पेरणीच्या संकटातून सुटका झाल्याने शेतकºयांना दिलासा लाभला आहे. काही भागात विहिरींना देखील पाणी उतरण्यास प्रारंभ झाला असून शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.चौकट...देवगाव व परिसरात आतापर्यंत ७५ ते ८० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरीत पेरण्यांनाही शेतकºयांनी गती दिली आहे. यावर्षी शेतकºयांनी सोयाबीन लागवडीस अधिक प्राधान्य दिले असून त्यापाठोपाठ टोमॅटो, मका, भुईमूग लागवडीकडे शेतकºयांचा कल दिसून आला आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती