शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
5
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
6
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
7
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
8
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
9
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
10
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
11
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
12
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
13
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
14
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
15
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
16
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
17
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
18
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
20
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल

मुसळधार पावसाचा द्राक्षं, कांद्यासह अन्य पिकांना फटका; शेतकरी संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 10:20 IST

मुसळधार पावसामुळे शेतकरी संकटात

नाशिक: ज्या पावसाची बळीराजा आतुरतेने वाट पाहतो त्याच पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. इडा पिडा टळो अन बळीचे राज्य येवो असे म्हटले जाते. मात्र निफाड तालुक्यात बळीराजामागे लागलेली अवकाळी पावसाची इडा पिडा काही केल्या टळेना  अशी अवस्था झाली आहे. विशेषत: तालुक्यात उगावसह अनेक ठिकाणी महत्वाचे पिक समजले जाणारे द्राक्षबाग मोठ्या संकटात सापडले आहेत.   निफाडसह परिसरातील उगांव, शिवडी, खेडे, वनसगांव, सारोळे, नांदुर्डी, सोनेवाडी नैताळे रामपूर कोळवाडी शिवरे भागात सोमवारी दिवसभर कडक‌ उन्हानंतर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला. सुमारे सव्वा तासाहून अधिक काळ पाऊसाचा जोर होता. या पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादकांना बसला आहे. सद्यस्थितीत द्राक्षबागांच्या छाटणीनंतर द्राक्षबागा पोंगा व फुलोरा अवस्थेत आहे. या अवस्थेत सतत पाऊस होत असल्याने द्राक्षबागेच्या पानांवर व घडांवर करपा डावणी यासारखे रोग बळावत आहेत. तसेच फुलोऱ्यातील द्राक्षमण्यांची गळ अन घडकुज या पावसाने होत आहे. दररोज हजार दोन हजार रुपयांच्या रोगप्रतिकारक औषधांची फवारणी करायची अन पुन्हा पाऊसाने त्यावर पाणी‌ फिरवायचे हे नित्याचे झाले आहे. त्यामुळे द्राक्षबागेत सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यातून फवारणी करण्यासाठी ट्रॅक्टर चालवणे मुश्किल होत आहे. बहुतांश वेळा दोन ट्रॅक्टरद्वारे फवारणी करावी लागत असून उत्पादक आता हतबल झाले आहेत. महिनाभरापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे सूर्यप्रकाश न मिळाल्याने द्राक्षबागांत असलेल्या मुळ्या बंद पडत आहे. त्याचा परिणाम थेट ओलांड्यावर फांदीला मुळ्या फुटत आहे. नवीन द्राक्षमाल जिरण्याचे प्रमाणही वाढत आहे .सोमवारी सायंकाळी सुर असलेल्या पाऊसा‌ने द्राक्षबागंचे मोठे नुकसा‌न झाले आहे .निफाड व लासलगाव परीसरात निमगाव वाकडा, टाकळी विंचुर, वेळापूर, ब्राम्हणगाव विंचुर, विंचुर, भरवस, गोंदेगाव, कोटमगाव, वनसगाव, खडकमाळेगाव, सारोळेखुर्द येथे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे यांनी त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासाठी लक्ष घालावे अशी मागणी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे केली आहे.शिवडीचे द्राक्ष उत्पादक व जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब क्षीरसागर यांनी पंचनामे लवकर व्हावेत अशी मागणी केली आहे. सततच्या पाऊसाने द्राक्षबागांवर येणाऱ्या संकटातून उत्पादकाला हातभार लावण्यासाठी‌ शासनाने केवळ पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडण्यापेक्षा द्राक्ष पीक विमा योजनेत आमूलाग्र बदल घडवून आणत छाटणीनंतरच्या एकशे पन्नास दिवसापावेतो विमा संरक्षण कसे मिळेल अशी व्यवस्था निर्माण करावी असे ऊगावचे द्राक्ष बागायतदार प्रभाकर मापारी यांनी बोलताना सांगितले.