शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाचा द्राक्षं, कांद्यासह अन्य पिकांना फटका; शेतकरी संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 10:20 IST

मुसळधार पावसामुळे शेतकरी संकटात

नाशिक: ज्या पावसाची बळीराजा आतुरतेने वाट पाहतो त्याच पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. इडा पिडा टळो अन बळीचे राज्य येवो असे म्हटले जाते. मात्र निफाड तालुक्यात बळीराजामागे लागलेली अवकाळी पावसाची इडा पिडा काही केल्या टळेना  अशी अवस्था झाली आहे. विशेषत: तालुक्यात उगावसह अनेक ठिकाणी महत्वाचे पिक समजले जाणारे द्राक्षबाग मोठ्या संकटात सापडले आहेत.   निफाडसह परिसरातील उगांव, शिवडी, खेडे, वनसगांव, सारोळे, नांदुर्डी, सोनेवाडी नैताळे रामपूर कोळवाडी शिवरे भागात सोमवारी दिवसभर कडक‌ उन्हानंतर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला. सुमारे सव्वा तासाहून अधिक काळ पाऊसाचा जोर होता. या पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादकांना बसला आहे. सद्यस्थितीत द्राक्षबागांच्या छाटणीनंतर द्राक्षबागा पोंगा व फुलोरा अवस्थेत आहे. या अवस्थेत सतत पाऊस होत असल्याने द्राक्षबागेच्या पानांवर व घडांवर करपा डावणी यासारखे रोग बळावत आहेत. तसेच फुलोऱ्यातील द्राक्षमण्यांची गळ अन घडकुज या पावसाने होत आहे. दररोज हजार दोन हजार रुपयांच्या रोगप्रतिकारक औषधांची फवारणी करायची अन पुन्हा पाऊसाने त्यावर पाणी‌ फिरवायचे हे नित्याचे झाले आहे. त्यामुळे द्राक्षबागेत सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यातून फवारणी करण्यासाठी ट्रॅक्टर चालवणे मुश्किल होत आहे. बहुतांश वेळा दोन ट्रॅक्टरद्वारे फवारणी करावी लागत असून उत्पादक आता हतबल झाले आहेत. महिनाभरापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे सूर्यप्रकाश न मिळाल्याने द्राक्षबागांत असलेल्या मुळ्या बंद पडत आहे. त्याचा परिणाम थेट ओलांड्यावर फांदीला मुळ्या फुटत आहे. नवीन द्राक्षमाल जिरण्याचे प्रमाणही वाढत आहे .सोमवारी सायंकाळी सुर असलेल्या पाऊसा‌ने द्राक्षबागंचे मोठे नुकसा‌न झाले आहे .निफाड व लासलगाव परीसरात निमगाव वाकडा, टाकळी विंचुर, वेळापूर, ब्राम्हणगाव विंचुर, विंचुर, भरवस, गोंदेगाव, कोटमगाव, वनसगाव, खडकमाळेगाव, सारोळेखुर्द येथे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे यांनी त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासाठी लक्ष घालावे अशी मागणी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे केली आहे.शिवडीचे द्राक्ष उत्पादक व जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब क्षीरसागर यांनी पंचनामे लवकर व्हावेत अशी मागणी केली आहे. सततच्या पाऊसाने द्राक्षबागांवर येणाऱ्या संकटातून उत्पादकाला हातभार लावण्यासाठी‌ शासनाने केवळ पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडण्यापेक्षा द्राक्ष पीक विमा योजनेत आमूलाग्र बदल घडवून आणत छाटणीनंतरच्या एकशे पन्नास दिवसापावेतो विमा संरक्षण कसे मिळेल अशी व्यवस्था निर्माण करावी असे ऊगावचे द्राक्ष बागायतदार प्रभाकर मापारी यांनी बोलताना सांगितले.