शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

शहर व ग्रामीण भागात उन्हाचा तडाखा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:15 IST

शहर व ग्रामीण भागात उन्हाचा तडाखा वाढला दुपारी वर्दळ कमी ; अडगळीतले कुलर निघाले बाहेर सिन्नर :शहर व ...

शहर व ग्रामीण भागात उन्हाचा तडाखा वाढला

दुपारी वर्दळ कमी ; अडगळीतले कुलर निघाले बाहेर

सिन्नर :शहर व तालुक्यात गेल्या चार- पाच दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला असून पारा ३५ अंशापार गेला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे रस्त्यावरील दुपारची वर्दळ कमी झाली असून सहा ते सात महिन्यांपासून अडगळीला पडलेली कुलर आता बाहेर निघत आहे.

तालुक्यात होळी संपल्यानंतर सुर्याचा पारा चढत जातो, असा सर्वमान्याचे संकेत आहे. मात्र सिन्नर शहरासह तालुक्यात मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच सुर्याचा पारा चढू लागला असून उन्हाचा पारा ३५ अंशापार गेला आहे. उन्हाची काहिली सिन्नरकरांना आत्तापासूनच असह्य होऊ लागली आहे. पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्याला लवकरच सुरूवात झाल्याचे दिसून येत आहे. मागील आठ दिवसांपासून सुर्य आग ओकू लागल्याचे भासत आहे. दिवसेंदिवस उन्हाची काहिली वाढत असल्याने नागरिकांनाही ती असह्य होऊ लागली आहे. शनिवारी तालुक्यात ३६अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी देखील ३६.१ अंश सेल्सिअस तापमान होते. यंदा मार्च महिन्यातच सुर्याचा पारा ३६ अंशापार गेल्याने एप्रिल आणि मे महिन्यात काय हाल होतील, याची चिंता सिन्नरकरांना लागली आहे. उन्हाचा पारा सातत्याने वाढत असल्याने नागरिकांनीही दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणे कमी केले आहे. आवश्यक कामासाठीच नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे दुपारच्या सुमारास शहरातील मुख्य रस्त्यावरील वर्दळ कमी होऊ लागली आहे. मुख्य बाजारपेठ वगळता तर इतर मार्ग दुपारच्या सुमारास ओस पडल्याचे दिसून येत आहे. दुपारची वर्दळ कमी झाल्याने सायंकाळी व रात्रीच्या सुमारास मुख्य रस्त्यावरील वर्दळ वाढली आहे. नागरिक आपल्या कुटुंबासह खरेदीसाठी सायंकाळीच घराबाहेर पडताना दिसून येत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक विविध उपाय करताना दिसून येत आहे. तोंडावर रुमाल, डोक्यावर टोपी घालणे सुरू केले आहे. त्यामुळे टोप्यांची दुकाने, गॉगल्सची दुकाने फुटपाथवर लागली आहे. याशिवाय शहरातील गल्लीबोळात फिरत्या रसवंत्या दिसू लागल्या आहेत.

चौकट : पाण्याची पातळी खालावली

उन्हाची काहिली वाढल्याने पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात आहे. नदी-नाले, तलाव आटण्याच्या मार्गावर आहे. ग्रामीण भागातील जलस्रोत असलेल्या विहिरी, बोअरवेल यांचे पाणीही कमी होत आहे. त्यामुळे यंदा पाऊस चांगला होऊनही लवकरच टंचाईचा सामना करावा लागतो की काय असा प्रश्न पडला आहे. काही ठिकाणी जोमात असलेली पिके उन्हामुळे सुकू लागली असून त्याचा उत्पन्नावर परिणाम होणार आहे.