शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

थंड नाशिक तापले; कमाल तपमानाचा पारा ३६.५ अंशापर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 21:36 IST

एकेकाळी थंड वातावरणासाठी नाशिक ओळखले जात होते. उन्हाळ्यातही नाशिकचे कमाल तपमान फारसे वाढत नव्हते व उकाडा जाणवत नव्हता म्हणून मुंबईकरांना नाशिकचे आकर्षण राहत होते;मात्र काळानुरूप वाढते शहरीकरण, लोकसंख्या यामुळे वृक्षतोड व प्रदूषणामध्ये वाढ झाल्याने शहराच्या हवामानातही प्रचंड वेगाने बदल घडला आहे.

ठळक मुद्देशहराच्या हवामानातही प्रचंड वेगाने बदल तीन दिवसांत तपमान ३६.५ अंशापर्यंत जाऊन पोहचले.

नाशिक : उन्हाच्या तीव्रतेमुळे शहराच्या वातावरणात उष्मा प्रचंड वाढला असून कमाल तपमानाचा पारा ३६.५ अंशापर्यंत मंगळवारी (दि.१३) पोहचला. एकूणच वाढत्या उष्म्याने नागरिकांच्या अंगाची काहिली होऊ लागली आहे.एकेकाळी थंड वातावरणासाठी नाशिक ओळखले जात होते. उन्हाळ्यातही नाशिकचे कमाल तपमान फारसे वाढत नव्हते व उकाडा जाणवत नव्हता म्हणून मुंबईकरांना नाशिकचे आकर्षण राहत होते;मात्र काळानुरूप वाढते शहरीकरण, लोकसंख्या यामुळे वृक्षतोड व प्रदूषणामध्ये वाढ झाल्याने शहराच्या हवामानातही प्रचंड वेगाने बदल घडला आहे. शहर उन्हाळ्यात मुंबई, पुण्याच्या तुलनेने तापू लागले आहे. मार्च महिन्याचा पंधरवडा संपत असून कमाल तपमानाचा पारा ३७ अंशाच्या जवळपास आला आहे.

पुढील पंधरा दिवस सरायचे असून एप्रिल व मे महिन्यात उन्हाची दाहकतेची कल्पना करणे चिंताजनक आहे. एकूणच नाशिककरांनी आपल्या जीवनशैलीकडे अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. शहराच्या वाढत्या तपमानामागे मानवाची जीवनशैली कारणीभूत ठरत आहे. वातानुकूलित यंत्रांचा भरमसाठ वापर, वाहनांचा वापर, प्लॅस्टिकचा वापर, वृक्ष लागवड संवर्धनाबाबत असलेली उदासिनता यामुळे शहराच्या प्रदूषणात वाढ होऊ लागली आहे. याचा परिणाम हवामानावर होत आहे. मंगळवारी शहराचे किमान तपमान १७.६ अंश इतके नोंदविले गेले. तीन दिवसांपासून शहराच्या कमाल तपमानाचा पारा चढता राहिला. ३५अंशाच्या आसपास स्थिरावरणारा पारा शनिवारपासून (दि.१०)३६ अंशाच्या पुढे सरकण्यास सुरूवात झाली. तीन दिवसांत तपमान ३६.५ अंशापर्यंत जाऊन पोहचले. गेल्या वर्षी १३ मार्च रोजी ३३ अंश इतके कमाल तपमान नोंदविले गेले होते.

टॅग्स :NashikनाशिकTemperatureतापमानHeat Strokeउष्माघात