शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

थंड नाशिक तापले; कमाल तपमानाचा पारा ३६.५ अंशापर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 21:36 IST

एकेकाळी थंड वातावरणासाठी नाशिक ओळखले जात होते. उन्हाळ्यातही नाशिकचे कमाल तपमान फारसे वाढत नव्हते व उकाडा जाणवत नव्हता म्हणून मुंबईकरांना नाशिकचे आकर्षण राहत होते;मात्र काळानुरूप वाढते शहरीकरण, लोकसंख्या यामुळे वृक्षतोड व प्रदूषणामध्ये वाढ झाल्याने शहराच्या हवामानातही प्रचंड वेगाने बदल घडला आहे.

ठळक मुद्देशहराच्या हवामानातही प्रचंड वेगाने बदल तीन दिवसांत तपमान ३६.५ अंशापर्यंत जाऊन पोहचले.

नाशिक : उन्हाच्या तीव्रतेमुळे शहराच्या वातावरणात उष्मा प्रचंड वाढला असून कमाल तपमानाचा पारा ३६.५ अंशापर्यंत मंगळवारी (दि.१३) पोहचला. एकूणच वाढत्या उष्म्याने नागरिकांच्या अंगाची काहिली होऊ लागली आहे.एकेकाळी थंड वातावरणासाठी नाशिक ओळखले जात होते. उन्हाळ्यातही नाशिकचे कमाल तपमान फारसे वाढत नव्हते व उकाडा जाणवत नव्हता म्हणून मुंबईकरांना नाशिकचे आकर्षण राहत होते;मात्र काळानुरूप वाढते शहरीकरण, लोकसंख्या यामुळे वृक्षतोड व प्रदूषणामध्ये वाढ झाल्याने शहराच्या हवामानातही प्रचंड वेगाने बदल घडला आहे. शहर उन्हाळ्यात मुंबई, पुण्याच्या तुलनेने तापू लागले आहे. मार्च महिन्याचा पंधरवडा संपत असून कमाल तपमानाचा पारा ३७ अंशाच्या जवळपास आला आहे.

पुढील पंधरा दिवस सरायचे असून एप्रिल व मे महिन्यात उन्हाची दाहकतेची कल्पना करणे चिंताजनक आहे. एकूणच नाशिककरांनी आपल्या जीवनशैलीकडे अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. शहराच्या वाढत्या तपमानामागे मानवाची जीवनशैली कारणीभूत ठरत आहे. वातानुकूलित यंत्रांचा भरमसाठ वापर, वाहनांचा वापर, प्लॅस्टिकचा वापर, वृक्ष लागवड संवर्धनाबाबत असलेली उदासिनता यामुळे शहराच्या प्रदूषणात वाढ होऊ लागली आहे. याचा परिणाम हवामानावर होत आहे. मंगळवारी शहराचे किमान तपमान १७.६ अंश इतके नोंदविले गेले. तीन दिवसांपासून शहराच्या कमाल तपमानाचा पारा चढता राहिला. ३५अंशाच्या आसपास स्थिरावरणारा पारा शनिवारपासून (दि.१०)३६ अंशाच्या पुढे सरकण्यास सुरूवात झाली. तीन दिवसांत तपमान ३६.५ अंशापर्यंत जाऊन पोहचले. गेल्या वर्षी १३ मार्च रोजी ३३ अंश इतके कमाल तपमान नोंदविले गेले होते.

टॅग्स :NashikनाशिकTemperatureतापमानHeat Strokeउष्माघात