शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
2
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
4
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
5
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
6
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
7
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
8
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
9
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
10
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
11
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
12
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
13
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
14
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
15
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
16
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
17
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
18
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
19
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
20
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांच्या याचिकेवर आज सुनावणी शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 01:59 IST

मराठवाड्याला पाणी सोडण्यास विरोध करण्यासाठी उच्च न्यायालयात विविध दोन याचिकांवर तातडीने बुधवारीच (दि. २४) सुनावणी करण्यास न्यायमूर्तींनी दिवाळीनंतर सुनावणी घेण्याचे सकाळी सांगितले तथापि, तातडीची बाब दुपारी पुन्हा निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायमूर्तींनी गुरुवारी (दि. २५) बघू असे सांगितल्याने आता गुरुवारी सकाळीच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

नाशिक : मराठवाड्याला पाणी सोडण्यास विरोध करण्यासाठी उच्च न्यायालयात विविध दोन याचिकांवर तातडीने बुधवारीच (दि. २४) सुनावणी करण्यास न्यायमूर्तींनी दिवाळीनंतर सुनावणी घेण्याचे सकाळी सांगितले तथापि, तातडीची बाब दुपारी पुन्हा निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायमूर्तींनी गुरुवारी (दि. २५) बघू असे सांगितल्याने आता गुरुवारी सकाळीच सुनावणी होण्याची शक्यता आहे.  मराठवाड्यातील जायकवाडी धरणात ६५ टक्के उपयुक्त जलसाठा करण्यासाठी जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने नााशिक आणि अहमदनगर जिल्ह्णातील धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्णातील गंगापूर, दारणा आणि पालखेड या तीन धरण समूहातून सुमारे साडेतीन टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यास नाशिक जिल्ह्णातून विरोध होत आहे. विशेषत: यंदा परतीच्या पावसाने दगा दिल्याने नाशिक जिल्ह्णातील आठ तालुक्यांत गंभीर परिस्थिती आहे. शिवाय धरणात आजमितीला ७७ टक्के इतका सरासरी साठा आहे. अशावेळी मराठवाड्याला पाणी सोडणे म्हणजे नाशिककरांवर अन्याय करण्यासारखे असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील भाजपाचे कार्यकर्ते गोपाळ पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यात गोदावरी नदीच्या ऊर्ध्व भागातील पाणी साठ्याचा विचार करून  अन्याय होऊ देऊ नये तसेच २०१६ मध्ये उच्च न्यायालयानेच धरणांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश सहा महिन्यांत करण्याचे आदेश शासनाला दिले होते; मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसून ती करावी यासह अन्य मागण्यांसाठी ही याचिका होती तर गंगापूर धरणातून बाधित होत असल्याने निफाड येथील शेतकरी अशोक दगू निफाडे यांनीदेखील याचिका दाखल केली आहे.या दोन्ही याचिकांवर तातडीची सुनावणी व्हावी यासाठी न्या. गवई आणि कर्णिक यांना विनंती करण्यात आली होती; मात्र सकाळी त्यांनी यावर आता सुनावणी होणार नाही तर दिवाळीनंतर सुनावणी होईल असे सांगितले. दरम्यान, दुपारी पुन्हा एकदा अ‍ॅड. साखरे आणि अ‍ॅड. प्रवर्तक पाठक यांनी याचिकेवरील सुनावणी तातडीची आहे, असे निदर्शनास आणून दिले असता न्यायमूर्तींनी गुरुवारी (दि. २५) सकाळी ठरवू असे सांगितले. त्यामुळे आता गुरुवारी यासंदर्भात सुनावणी होण्याच्या दृष्टीने आशा पल्लवित झाल्या आहेत.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक