शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

उंबरगव्हाण येथील आरोग्य केंद्राची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:46 IST

कळवण तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम भाग असलेल्या गुजरात हद्दीलगत असलेल्या उंबरगव्हाण परिसरातील आदिवासी बांधवांच्या आरोग्य प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उंबरगव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्राची दोन वर्षांपूर्वी इमारत बांधली. प्रशासकीय कामकाज सुरू करण्यासाठी शासनाने मान्यता दिली असून, प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आकृतिबंधानुसार वैद्यकीय अधिकाºयांसह आवश्यक १५ पदे मंजूर करण्यात आली आहे. तरीदेखील उंबरगव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बंद अवस्थेत विनावापर पडून असल्याने शोभेचे बाहुले बनले आहे.

ठळक मुद्दे इमारतीसाठी कोट्यवधी रु पयांचा खर्च; वैद्यकीय अधिकाऱ्यांसह १५ पदे मंजूर तरी केंद्र बंद

मनोज देवरे । कळवण : कळवण तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम भाग असलेल्या गुजरात हद्दीलगत असलेल्या उंबरगव्हाण परिसरातील आदिवासी बांधवांच्या आरोग्य प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उंबरगव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्राची दोन वर्षांपूर्वी इमारत बांधली. प्रशासकीय कामकाज सुरू करण्यासाठी शासनाने मान्यता दिली असून, प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आकृतिबंधानुसार वैद्यकीय अधिकाºयांसह आवश्यक १५ पदे मंजूर करण्यात आली आहे. तरीदेखील उंबरगव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बंद अवस्थेत विनावापर पडून असल्याने शोभेचे बाहुले बनले आहे.जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना निवेदन पाठवून लक्ष वेधले आहे. कळवण तालुक्यात सध्या नवी बेज, कनाशी, मोकभणगी, नांदुरी, तिºहळ, दळवट, जयदर, ओतूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून, त्यांच्या स्वत:च्या इमारती आहेत. उंबरगव्हाण येथे कोट्यवधी रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून, प्रशासकीय कामकाज सुरू झालेले नसल्याने इमारत सध्या बंद अवस्थेत विनावापर पडून असल्याने अतिदुर्गम भागातील आरोग्य प्रश्नांची हेळसांड होत आहे. मार्च २०१८ मध्ये आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी राज्यातील आरोग्य संस्थेच्या वैद्यकीय अधिकाºयांसह कर्मचारी पदे मंजूर केली असूनसुद्धा आरोग्य विभागाने उंबरगव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू न केल्याने आदिवासी जनतेला अनेक समस्यांना समोर जावं लागतं आहे.सन २०१४ मध्ये उंबरगव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे भूमिपूजन करून २०१६ मध्ये इमारतीचे काम ८० टक्के पूर्ण झाल्यानंतर शासन निर्णयानुसार आवश्यक अधिकारी व कर्मचारी यांची पदे मंजूर करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. शासन निर्णयान्वये प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पूर्ण झाल्यानंतर हे केंद्र कार्यान्वित करण्यासाठी वेगवेगळ्या संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांची आवश्यकता असल्याने कळवण पंचायत समिती व नाशिक जिल्हा परिषद स्तरावरून आवश्यक अधिकारी व कर्मचारी यांच्या आकृतिबंधानुसार पद मंजुरी मिळविण्यासंदर्भात २५ जानेवारी २०१६ रोजी शासनाकडे प्रस्ताव पाठवून मागणी करण्यात आली होती. शासनस्तरावरून प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यक असणारी अधिकारी व कर्मचारी या पदांची आकृतिबंध निश्चित करण्यात येऊन ग्रामीण व आदिवासी भागातील जनतेकरिता रुग्ण सेवा पुरविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी आकृतिबंधानुसार पदनिर्मिती शासनस्तरावरून करण्यात आली असून, मार्च २०१८ मध्ये आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मान्यता दिली आहे.आरोग्य केंद्र सुरू न झाल्याने जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी नाराजी व्यक्त करून याप्रश्नी आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे लक्ष वेधले आहे.उंबरगव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नियमित, काल्पनिक कुशल व काल्पनिक अकुशल पद निर्माण करून प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाज सुरू करण्यास मान्यता देण्यात येऊन वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहायक पुरुष व स्त्री, सहायक परिचारिका प्रसाविका, आरोग्य सहायक पुरु ष व स्त्री, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माण अधिकारी, कनिष्ठ लिपिक, वाहनचालक, पुरुष व स्त्री परिचर, सफाईगार आदी १५ पदे मंजूर करण्यात आली आहेत.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य