शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

आदिवासी वस्त्यांशेजारील कचऱ्यामुळे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 7:01 PM

तळवाडे दिगर : येथील भवाडा रोड लगतच्या आदिवासी वस्तींसह दसाणा रोड शेजारी राहणा-या दलित वस्तीशेजारी साचलेल्या कचरा व उकिरड्यांमुळे तसेच ग्रामपंचायतीद्वारा बांधण्यात आलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

एकीकडे देशभरात स्वच्छतेसंदर्भात आग्रही भूमिका घेतली जात असताना आम्ही स्वातंत्र्यात आहोत की पारतंत्र्यात असा सवाल संतप्त नागरिकांकडून विचारला जात आहे. लोकांना भेडसावणाºया व त्रस्त करणा-या या समस्येचे निराकरण करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने एकप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फासण्याचे काम ग्रामपंचायतीकडून केले जात असल्याचा आरोप दलित आदिवासी बांधवांकडून केला जात आहे. गावामध्ये दर गुरु वारी आठवडे बाजार भरतो. येथील भवाडा रोड लगत मोठ्या प्रमाणात मांसाहारी पदार्थांची विक्र ी होते. रस्त्याला असलेल्या गुरांच्या दवाखान्याजवळ तसेच आदीवासी वस्तीलगत व्यावसायिकांकडून मांसाहारी पदार्थांचे अवशेष फेकले जातात. यामुळे या भागात प्रचंड प्रमाणात दुर्गंधी येते.याबरोबरच दसाणा रोड लगत असलेल्या दलित वस्तीजवळही ग्रामपंचायतीने सार्वजनिक संडास बांधले असून त्याठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्याने तसेच नियमित साफसफाई होत नसल्याने तेथेही मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे नागरिकांना त्या भागात जगणे असह्य झाले आहे. या दोन्ही रस्त्यावरून दिवसभर वाहनांची, पादचाऱ्यांची तसेच शाळकरी मुलांची वर्दळ असते. त्यांनाही या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते. साचलेल्या कच-यामध्ये पाणी साचल्यानंतर दुर्गंधीत भर पडत असून डासांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे मलेरिया, डेंग्यूसारख्या साथीच्या आजारांची लागण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने ग्रामपंचायतीने गावाचे आरोग्य डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण गावभर स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतHealthआरोग्य