शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

कर्ज वसुली शेतकऱ्यांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 18:43 IST

देवगाव : सलग चार वर्षांपासून होणारी गारपीट, अवकाळी पाऊस अन् मागील वर्षी शेतमालाचे कोसळलेले बाजार भाव यामुळे शेतकरी हतबल झालेला असताना आता थकित कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेची धडक मोहीम हाती घेत जप्तीची कारवाई सुरू केल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

ठळक मुद्देजिल्हा बँक सक्त कर्ज वसुली विरोधात प्रांत, तहसीलदारांना निवेदन

देवगाव : सलग चार वर्षांपासून होणारी गारपीट, अवकाळी पाऊस अन् मागील वर्षी शेतमालाचे कोसळलेले बाजार भाव यामुळे शेतकरी हतबल झालेला असताना आता थकित कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेची धडक मोहीम हाती घेत जप्तीची कारवाई सुरू केल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.दुष्काळी भागात थकित कर्ज वसुलीसाठी सक्तीची कारवाई करु नये असे शासन निर्णय असताना या आदेशाला केराची टोपली दाखवत जिल्हा बँकेचे अधिकारी सक्तीची कर्ज वसुली करण्यात मग्न आहेत. विशेष म्हणजे या कर्ज वसुलीसाठी अगदी शेतकऱ्यांंना धमकावून थेट स्थावर मालमत्ता लिलाव करण्याचे नोटीसीत नमूद केल्याने दुष्काळी काळात कर्ज कसे भरायचे असा अवघड पेच शेतकºयांपुढे उभा ठाकला आहे.निफाड तालुक्यात सन २००९, २०१०, २०१३, २०१४ मध्ये झालेल्या गारपीटीमुळे शेतकºयांचे द्राक्षबागेसह ऊस, कांदा,गहु,हरभरा आदी शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी शासनाने या पिकाचे पंचनामे करत तुटपुंजी मदत दिली होती, मात्र त्यानंतर वाढते विजेचे भारनियमन आणि शेतीमालाचे कोसळते बाजारभाव यामुळे शेती पिकांवरचा खर्च वाढला, मात्र उत्पादन घटले. त्याचा थेट परिणाम म्हणून शेतकºयांचे आर्थिक नियोजन कोलमडले शेतीसाठी काढलेले कर्ज थकत होत गेले.चौकट....महसूल मंडळातील सर्व गावे दुष्काळी घोषित करून तेथील शेतकरी विद्यार्थी यांना काही सवलती दिल्या आहेत माञ शासनाचे हे आदेश पायदळी तुडवत जिल्हा बँकेची कर्जाची धडक वसुली सुरू असल्याने यातील काही थकबाकीदार शेतकºयांचे रक्तदाब वाढणे तसेच ते शेतकरी दुर्धर रोगाने आजारी आहे अशा कुटुंबाचे स्वास्थ्य बिघडणे असे प्रकार घडु लागेल आहेत. त्यातच जिल्हा बँकेचे जे बडे थकबाकीदार आहे.त्यांच्याकडील वसुली प्रथम करणे गरजेचे असताना ज्यांच्याकडे लाख, दोन लाख रु पये कर्ज आहे, अशा शेतकºयांचे उंबरठे दररोज झजविले जात आहे. साहजिकच या कारवाईत अधिकाºयांकडून होणारा दुजाभाव दिसुन येते असून बँकेने राबविलेली सक्तीची कर्ज वसुली त्वरित थांबवून शेतकºयांना दिलासा द्यावा. यासाठी शेतकºयांनी प्रांत, तहसीलदार, सहाय्यक निबंधक, पोलिस निरिक्षक यांना निवेदन दिले.याप्रसंगी शिरवाडे उपसरपंच संदिप आवारे, रमेश बडवर, प्रमोद बडवर, विलास शिंदे, प्रशांत कुलकर्णी, कानळद सरपंच गणेश जाधव, रामनाथ बडवर, साहेबराव बडवर, सुरेश शेळके, प्रंशात कुलकर्णी, दत्तात्रय कुलथे, बाळु निलख आदी उपस्थित होते.