शहरं
Join us  
Trending Stories
1
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
2
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
3
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
4
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
5
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
6
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
7
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
8
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
9
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
10
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
11
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
12
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
13
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
14
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
15
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
16
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
17
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
18
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
19
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
20
शिंदे शिवसेना की भाजपने घातला पहिला घाव? परस्परांचे माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज वसुली शेतकऱ्यांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 18:43 IST

देवगाव : सलग चार वर्षांपासून होणारी गारपीट, अवकाळी पाऊस अन् मागील वर्षी शेतमालाचे कोसळलेले बाजार भाव यामुळे शेतकरी हतबल झालेला असताना आता थकित कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेची धडक मोहीम हाती घेत जप्तीची कारवाई सुरू केल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

ठळक मुद्देजिल्हा बँक सक्त कर्ज वसुली विरोधात प्रांत, तहसीलदारांना निवेदन

देवगाव : सलग चार वर्षांपासून होणारी गारपीट, अवकाळी पाऊस अन् मागील वर्षी शेतमालाचे कोसळलेले बाजार भाव यामुळे शेतकरी हतबल झालेला असताना आता थकित कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेची धडक मोहीम हाती घेत जप्तीची कारवाई सुरू केल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.दुष्काळी भागात थकित कर्ज वसुलीसाठी सक्तीची कारवाई करु नये असे शासन निर्णय असताना या आदेशाला केराची टोपली दाखवत जिल्हा बँकेचे अधिकारी सक्तीची कर्ज वसुली करण्यात मग्न आहेत. विशेष म्हणजे या कर्ज वसुलीसाठी अगदी शेतकऱ्यांंना धमकावून थेट स्थावर मालमत्ता लिलाव करण्याचे नोटीसीत नमूद केल्याने दुष्काळी काळात कर्ज कसे भरायचे असा अवघड पेच शेतकºयांपुढे उभा ठाकला आहे.निफाड तालुक्यात सन २००९, २०१०, २०१३, २०१४ मध्ये झालेल्या गारपीटीमुळे शेतकºयांचे द्राक्षबागेसह ऊस, कांदा,गहु,हरभरा आदी शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी शासनाने या पिकाचे पंचनामे करत तुटपुंजी मदत दिली होती, मात्र त्यानंतर वाढते विजेचे भारनियमन आणि शेतीमालाचे कोसळते बाजारभाव यामुळे शेती पिकांवरचा खर्च वाढला, मात्र उत्पादन घटले. त्याचा थेट परिणाम म्हणून शेतकºयांचे आर्थिक नियोजन कोलमडले शेतीसाठी काढलेले कर्ज थकत होत गेले.चौकट....महसूल मंडळातील सर्व गावे दुष्काळी घोषित करून तेथील शेतकरी विद्यार्थी यांना काही सवलती दिल्या आहेत माञ शासनाचे हे आदेश पायदळी तुडवत जिल्हा बँकेची कर्जाची धडक वसुली सुरू असल्याने यातील काही थकबाकीदार शेतकºयांचे रक्तदाब वाढणे तसेच ते शेतकरी दुर्धर रोगाने आजारी आहे अशा कुटुंबाचे स्वास्थ्य बिघडणे असे प्रकार घडु लागेल आहेत. त्यातच जिल्हा बँकेचे जे बडे थकबाकीदार आहे.त्यांच्याकडील वसुली प्रथम करणे गरजेचे असताना ज्यांच्याकडे लाख, दोन लाख रु पये कर्ज आहे, अशा शेतकºयांचे उंबरठे दररोज झजविले जात आहे. साहजिकच या कारवाईत अधिकाºयांकडून होणारा दुजाभाव दिसुन येते असून बँकेने राबविलेली सक्तीची कर्ज वसुली त्वरित थांबवून शेतकºयांना दिलासा द्यावा. यासाठी शेतकºयांनी प्रांत, तहसीलदार, सहाय्यक निबंधक, पोलिस निरिक्षक यांना निवेदन दिले.याप्रसंगी शिरवाडे उपसरपंच संदिप आवारे, रमेश बडवर, प्रमोद बडवर, विलास शिंदे, प्रशांत कुलकर्णी, कानळद सरपंच गणेश जाधव, रामनाथ बडवर, साहेबराव बडवर, सुरेश शेळके, प्रंशात कुलकर्णी, दत्तात्रय कुलथे, बाळु निलख आदी उपस्थित होते.