शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘युती’मधील आयारामच ठरणार तिकीटवाटपात डोकेदुखी!

By किरण अग्रवाल | Updated: September 8, 2019 00:41 IST

जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांना आगामी निवडणुकीसाठी उमेदवारीच्या पातळीवर फारशी स्पर्धा नाही; पण भाजपच्या नाशकातील तिघा विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची चर्चा घडत असेल, आणि त्यांच्या जागी उमेदवारीसाठी पक्षांतर्गत स्पर्धाही दिसत असेल, तर त्यात त्या व्यक्तींचा दोष म्हणायचा की त्यांच्या पक्षाचा, असा प्रश्न उपस्थित होणारच !

ठळक मुद्देपक्षाला अनुकूल वातावरण असेल तर निष्ठावंतांना उमेदवारीची संधी द्यायला काय हरकत असावी?नाशिक जिल्ह्यात भाजपच्या तुलनेत शिवसेनेकडे इच्छुकांचा ओढा अधिकइगतपुरीत गावितांविरोधात सर्व स्थानिक एकवटले

सारांशपक्षाचा पाया विस्तारून तो मजबूत करण्याच्या नावाखाली परपक्षीयांची भरती करून बसलेल्या शिवसेना-भाजपच्या धुरिणांची आता तिकीटवाटप करताना खरी कसोटी लागणार आहे. आयारामांसाठी संधीची कवाडे उघडताना स्वकीय निष्ठावंतांच्या नाराजीकडे दुर्लक्ष करणे किती वा कसे महाग पडू शकते हे यानिमित्ताने दिसून येण्याची लक्षणे आहेत. शिवाय, विद्यमानांची तिकिटे कापली जाणार असतील तर त्यातून सत्ताधाऱ्यांच्याच अपयशाचा शिक्का अधोरेखित होणार आहे, त्यामुळे त्यासंबंधीचा निर्णय घेणेही डोकेदुखीचेच ठरावे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप-शिवसेनेत मोठ्या प्रमाणात ‘इनकमिंग’ सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात भाजपच्या तुलनेत शिवसेनेकडे इच्छुकांचा ओढा अधिक आहे, कारण ग्रामीण भागात शिवसेनेकडे जागा जास्त आहेत. गेल्यावेळी ‘युती’ नव्हती, त्यामुळे हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढले होते. त्यात भाजपने नाशकातील तीन जागांसह एकूण चार तर शिवसेनेनेही जिल्ह्यात चार जागा मिळविल्या होत्या. यात शिवसेनेचे विद्यमान आमदार असलेल्या देवळाली, मालेगाव बाह्य, निफाड व सिन्नर या ठिकाणी विद्यमानांच्या उमेदवाºया बदलू शकतील असे फारसे इच्छुक नाहीत, अगर तिथे नवीन कुणी पक्षात आलेलेही नाही. मात्र अन्य जागांवरील पारंपरिक दावेदारांपुढे आव्हान निर्माण करू शकणारे परपक्षीय शिवबंधन बांधून तयार असल्याने पक्षांतर्गत नाराजीची ठिणगी पडून जाणे स्वाभाविक ठरले आहे.

यात छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेने धास्तावलेले येवला व नांदगावमधील उमेदवारी इच्छुक होेतेच; पण कॉँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांच्यामुळे दावेदारी हिरवली जाण्याची भीती असलेल्या इगतपुरीतील लोकांचाही समावेश आहे. शिवाय, दिंडोरीतील धनराज महाले स्वगृही परतले असून, त्यांच्या पाठोपाठ रामदास चारोस्करदेखील शिवसेनेत आले आहेत. त्यामुळे संधीसाठी इकडून-तिकडे ‘टोप्या’ बदलणाऱ्यांना उमेदवारी देण्यापेक्षा पडतीच्या काळातही पक्षाशी एकनिष्ठ राहाणाºयांना संधी देण्याची अपेक्षा बोलून दाखविली जात आहे व ती गैरही म्हणता येऊ नये. कारण, आज ना उद्या, आपला नंबर लागेल या आशेवर ठिकठिकाणी अनेक इच्छुक काम करीत आले आहेत. येवल्यात व नांदगावमध्येही गेल्या अगदी पंचवार्षिक काळापासून तयारीला लागलेले उमेदवार आहेत. पण भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेमुळे त्यांची तिकिटे डावलली जाण्याची भीती होती. अर्थात ती शक्यता आता दुरावत चालली आहे. कारण भुजबळ राष्टÑवादीतच राहाण्याची चिन्हे आहेत. इगतपुरीत मात्र गावितांविरोधात सर्व स्थानिक एकवटले आहेत. त्यामुळे पक्षप्रमुखांसमोरच अडचणीची स्थिती निर्माण झालेली आहे.

भाजपत तर शिवसेनेपेक्षा विचित्र स्थिती आहे. तेथे अन्य जागांवर इच्छुकांची गर्दी आहेच; परंतु विद्यमान आमदारांना खो देऊन तिकीट मिळवू पाहणाºयांची संख्याही मोठी आहे. शिवसेनेच्या विद्यमानांना जे जमले, ते भाजपच्या आमदारांना का जमू शकले नाही, असा प्रश्न त्यातून निर्माण होणारा आहे. नाशकातील तीनही भाजप आमदारांची तिकिटे कापली जाणार असे या पक्षातीलच लोक सांगताना दिसतात, यावरून या तिघांचाही जनतेला काय पक्षालाच काही उपयोग होऊ शकला नसल्याचे म्हणता यावे. मग खरेच तसे असेल तर ते त्यांचे वैयक्तिक अपयश म्हणायचे, की सत्ता असूनही ती राबविता न येऊ शकलेल्या भाजपचे म्हणायचे, असा प्रश्नही उपस्थित व्हावा.

बरे, हा प्रश्न इतक्यावरच सोडवता येऊ नये. त्यातील महत्त्वाची बाब म्हणजे, तिकिटे बदलायचीच असतील तर पक्षातील अन्य निष्ठावंतांना तरी संधी मिळावी; पण तिथेही ऐनवेळी बाहेरून येणाºया अन्य कुणाला किंवा अगोदरच भाजपत येऊन आमदारकीच्या उमेदवारीसाठी गळ टाकून बसलेल्यांना बोहल्यावर चढविले जाणार असेल, तर प्रामाणिक पक्षनिष्ठांनी काय केवळ प्रचाराच्याच पालख्या उचलायच्या का, असाही प्रश्न पडावा. युती अंतर्गत जिल्ह्यात ज्या जागा भाजप लढू इच्छिते त्या सर्वच ठिकाणी भाजपचे नादारीच्या काळापासून काम करणारे अनेकजण आहेत. जर पक्षाच्याच बळावर उमेदवार निवडून आणण्याचा विश्वास असेल तर द्या ना अशा निष्ठावंतांना संधी! पण ते होईल असे दिसत नाही, कारण खरेच भाजप आता कॉँग्रेसयुक्त झाला आहे. त्यामुळे युतीतील आयारामच या पक्षांची डोकेदुखी ठरू पाहत आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाShiv SenaशिवसेनाChagan Bhujbalछगन भुजबळNirmala Gavitनिर्मला गावित