शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

प्रभाग सभेत उमटले धोकादायक कार्यालयाचे पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:42 IST

महापालिकेचे पूर्व विभागाचे कार्यालय धोकादायक बनले असून, दोनच दिवसांपूर्वी या कार्यालयाचा काही भाग कोसळल्याने त्याचे पडसाद पूर्व विभागाच्या बैठकीत उमटून सर्वच सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. मुशीर सय्यद व श्याम बडोदे यांनी मनपा प्रशासनाचा निषेध नोंदवून सभात्याग केला.

इंदिरानगर : महापालिकेचे पूर्व विभागाचे कार्यालय धोकादायक बनले असून, दोनच दिवसांपूर्वी या कार्यालयाचा काही भाग कोसळल्याने त्याचे पडसाद पूर्व विभागाच्या बैठकीत उमटून सर्वच सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. मुशीर सय्यद व श्याम बडोदे यांनी मनपा प्रशासनाचा निषेध नोंदवून सभात्याग केला.पूर्व विभागाची बैठक सभापती सुमन भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी मनपाचे पूर्व विभागाचे कार्यालय धोकादायक बनले असून, गेल्या दोन दिवसांपूर्वी सदर इमारतीचा काही भाग ढासळला आहे त्यामुळे इथे बसणे सुद्धा धोकादायक बनले आहे. वारंवार सांगूनही सदर इमारतीची दुरुस्ती केली जात का नाही, असे म्हणत मुशीर सय्यद व श्याम बडोदे यांनी सभात्याग करून भरपावसात कार्यालयाच्या बाहेर ठाण मांडले. या दोघांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. काही वेळाने मुशीर सय्यद सभात्याग करून निघून गेले. मुंबई नाका ते सारडा सर्कल रस्त्याच्या दुतर्फा भंगार वाहने उभी करण्यात आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच भद्रकाली मार्केट बाहेर रस्त्यावर सर्रास मासेविक्रेते बसतात. त्यामुळे वाहतुकीचा ताण निर्माण होत असताना अतिक्रमण विभाग बघायची भूमिका घेत आहे. सदर विभागाचे अधिकारी हप्ते घेत असल्याचा आरोप समिना मेमन यांनी केला. अतिक्रमण न काढल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला. इंदिरानगर परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी केली. रथचक्र चौकात पुन्हा भाजीबाजार बसण्यास सुरुवात झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन दोन दिवसांपूर्वी एका ज्येष्ठ नागरिकाला एका वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तरीही अतिक्रमण विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याचे आरोप कुलकर्णी यांनी केला. जॉगिंग ट्रॅकलगत काही महिन्यांपूर्वी अतिक्रमण विभागांनी मंदिर काढले, परंतु त्या ठिकाणी गॅरेजधारकांनी गॅरेज दुरुस्तीचे आणि वाहने लावण्यासाठी वापर सुरू केला असल्याची तक्रार श्यामला दीक्षित यांनी केली.भूमिगत गटारीचे दुरुस्तीचे काम करणारा ठेकेदार व अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्याने कामे होत नसल्याची तक्रार श्याम बडोदे यांनी केली. तसेच वडाळागावात भूमिगत गटारीचे कामे होऊन सुद्धा रस्त्याची दुरुस्ती ठेकेदार का करत नाही, असा प्रश्न बडोदे यांनी केला. जाकीर हुसैन रुग्णालयात रुग्णांवर औषध उपचार बरोबर होत नाही, अशी तक्रार अर्चना थोरात यांनी केली. त्रिकोणी उद्यान व काठेगल्ली सिग्नल ते नागजी हॉस्पिटल या रस्त्यावरील अतिक्रमण काढत नसल्याचा आरोपही थोरात यांनी केला. पूर्व विभागाचे कार्यालय धोकादायक झाल्याने जिवास धोका निर्माण झाल्याने तरीही प्रशासन जागे होत नसल्याने मनपा प्रशासनाला अजिंक्य साने, सुप्रिया खोडे, सुषमा पगार या सर्व सदस्यांनी धारेवर धरले. यावेळी खेळणी व बेंचेस टाकण्याच्या सुमारे एक कोटींच्या कामाला मंजुरी देण्यात आली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक