शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 7:18 PM

सायखेडा : गोदाकाठ भागात जुलै महिन्याच्या सुरवातीला झालेल्या जेमतेम पावसाने पुन्हा ओढ दिल्याने पेरणी केलेली पिके मातीतून कोंब बाहेर पडत नसल्याने बियाणे कुजले आहे, तर काही कोवळी पिके उन्हात कोमेजून जाऊ लागल्याने शेतकरी हवालदिल झाले असून दुभार पेरणीचे संकट उभे राहिल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देसायखेडा : मातीतून कोंब बाहेर पडत नसल्याने दुभार पेरणीचे संकट

सायखेडा : गोदाकाठ भागात जुलै महिन्याच्या सुरवातीला झालेल्या जेमतेम पावसाने पुन्हा ओढ दिल्याने पेरणी केलेली पिके मातीतून कोंब बाहेर पडत नसल्याने बियाणे कुजले आहे, तर काही कोवळी पिके उन्हात कोमेजून जाऊ लागल्याने शेतकरी हवालदिल झाले असून दुभार पेरणीचे संकट उभे राहिल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.यंदा निफाड तालुक्यातील काही भागात जून महिन्यात पावसाचा थेंब देखील पडला नाही. जून महिन्यात सगळी नक्षत्र कोरडी ठाक गेली. जुलै महिन्यात तुरळक पाऊस पडला जमिनीत पाणी काही प्रमाणात जिरल्याने ओलावा तयार झाला. त्या ओलाव्यावर शेतकऱ्यांनी सोयाबीन, मका, भुईमुग या पिकांची लागवड केली. तर टमाटे, कोबी, फ्लॉवर, काकडी, मिरची, वेलवर्गीय पिके यांची लागवड केली.मोठ्या प्रमाणावर खर्च करून पिके शेतात उभी केली, मात्र पिके उभी राहत नाही तोच पावसाने ओढ दिली. अनेक दिवसांपासून पावसाच्या पाण्याचा थेंब देखील पडला नाही. विहिरी उन्हाळ्यात कोरड्याठाक पडल्या आहे. त्यामुळे शेतात पिकांना पाणी पुरवठा कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.शेतकरी सलग दोन वर्षपासून दुष्काळाचा सामना करत आहेत. जेमतेम हाती आलेली पिके कवडीमोल भावात विकावी लागली होती, कांदा, द्राक्ष सोयाबीन या पिकांचा खर्च देखील वसूल झाला नव्हता. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहे. यंदाची पिके शेतात उभी करण्यासाठी उसनवारी करीत बियाणे, खते खरेदी केली आहे. मोठया प्रमाणावर आलेला खर्च पावसाच्या लहरीपणामुळे वाया जाऊ लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.शेतात लागवड केलेल्या पिकांचा पंचनामा करावा, जमिनीतुन न उगवणाºया बियाणांचा खर्च सरकारने देऊन शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहे.चौकट...दुकानदारांची उसनवारी करून बियाणे खरेदी केली आहे. पावसाचा जोर कायम राहील म्हणून काळ्या मातीत बियाणे फेकून मोठी जुगार शेतकरी खेळला आहे. पावसाने ओढ दिल्याने पिके उगवत नाही. उगवलेले पिके करपून गेल्याने दुभार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला यासाठी पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.- कांतीलाल खालकर, शेतकरी.