शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

हरणबारी, केळझरमधून रब्बीसाठी दोन आवर्तने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:20 IST

सटाणा : बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातून यंदा रब्बीसाठी दोन आवर्तने सोडण्याबाबत तसेच पिण्यासाठी अनुक्र मे ३९० व ...

ठळक मुद्देबागलाण : समितीच्या बैठकीत पाणी आरक्षित करण्याचा निर्णय

सटाणा : बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातून यंदा रब्बीसाठी दोन आवर्तने सोडण्याबाबत तसेच पिण्यासाठी अनुक्र मे ३९० व १०१ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयात बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.२४) कालवा समितीची बैठक पार पडली. बैठकीस मालेगाव येथील जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश चौधरी, उपअभियंता ई.बी. शेवाळे, उपअभियंता अभिजित रौंदळ, शाखा अभियंता आर.बी. सूर्यवंशी, संजय पाटील उपस्थित होते. समितीच्या बैठकीत यंदाच्या रब्बी हंगामाचा प्राथमिक सिंचन आराखडा तयार करण्यात आला. तालुक्यातील हरणबारी मध्यम प्रकल्पातून सुमारे दोन हजार १५ हेक्टर या रब्बी क्षेत्राला पाणी दिले जाते, तर केळझर मध्यम प्रकल्पातून १ हजार १८० हेक्टर रब्बी क्षेत्राला पाणी दिले जाते. यंदा रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी तीन आवर्तनांची मागणी केली होती. मात्र पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणात वाढ झाल्याने रब्बीसाठी दोनच आवर्तनाचे नियोजन करण्यात आल्याचे यावेळी कार्यकारी अभियंता चौधरी यांनी स्पष्ट केले.शेतकऱ्यांच्या मागणीनुसार हरणबारी धरणातून रब्बीसाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले असून, २५० दशलक्ष घनफूट पाणी देण्यात येणार आहे. उर्वरित पाण्याचे दुसरे आवर्तन २५ फेब्रुवारीला सोडण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला, तर केळझर धरणातून येत्या १० फेब्रुवारीला े आवर्तन सोडण्यात येणार आहे. यासाठी १५४ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे.दरम्यान, आमदार दिलीप बोरसे यांनी रब्बीचे पाणी शेतकºयांच्या शेतापर्यंत कसे पोहोचेल यासाठी आवश्यक ठिकाणी कालव्यांची दुरु स्ती करावी. तसेच रब्बी पिकांसाठी ठरल्याप्रमाणे दिले जाणारे दोन्ही आवर्तने शेवटच्या शेतकºयापर्यंत कसे पोहोचेल यासाठी नियोजन करावे. जेणेकरून पीक हातात येईल, अशा सूचना यावेळी संबधित अधिकाºयांना देण्यात आल्या. बैठकीस केदाबापू काकुळते, बाळासाहेब भदाणे, पांडुरंग सोनवणे, माधवराव सोनवणे, जनार्दन सोनवणे, भास्कर सोनवणे आदी शेतकरी उपस्थित होते...असा आहे रब्बीचा सिंचन आराखडा...हरणबारी धरण पाणीसाठा ११६६ दशलक्ष घनफूट पैकी बाष्पीभवन तूट ११७ दशलक्ष घनफूट, पिण्याच्या पाण्याचे आरक्षण ३९० दशलक्ष घनफूट, रब्बी हंगामासाठी ६५९ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले आहे. केळझर धरणात ५७२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. पैकी बाष्पीभवन तूट ८६ दशलक्ष घनफूट, पिण्यासाठी १०१ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केले आहे. ३८५ दशलक्ष घनफूट पाणी रब्बीसाठी आरक्षित करण्यात आले आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी