शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

हरणबारी, केळझरमधून रब्बीसाठी दोन आवर्तने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:20 IST

सटाणा : बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातून यंदा रब्बीसाठी दोन आवर्तने सोडण्याबाबत तसेच पिण्यासाठी अनुक्र मे ३९० व ...

ठळक मुद्देबागलाण : समितीच्या बैठकीत पाणी आरक्षित करण्याचा निर्णय

सटाणा : बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातून यंदा रब्बीसाठी दोन आवर्तने सोडण्याबाबत तसेच पिण्यासाठी अनुक्र मे ३९० व १०१ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयात बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.२४) कालवा समितीची बैठक पार पडली. बैठकीस मालेगाव येथील जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश चौधरी, उपअभियंता ई.बी. शेवाळे, उपअभियंता अभिजित रौंदळ, शाखा अभियंता आर.बी. सूर्यवंशी, संजय पाटील उपस्थित होते. समितीच्या बैठकीत यंदाच्या रब्बी हंगामाचा प्राथमिक सिंचन आराखडा तयार करण्यात आला. तालुक्यातील हरणबारी मध्यम प्रकल्पातून सुमारे दोन हजार १५ हेक्टर या रब्बी क्षेत्राला पाणी दिले जाते, तर केळझर मध्यम प्रकल्पातून १ हजार १८० हेक्टर रब्बी क्षेत्राला पाणी दिले जाते. यंदा रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी तीन आवर्तनांची मागणी केली होती. मात्र पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणात वाढ झाल्याने रब्बीसाठी दोनच आवर्तनाचे नियोजन करण्यात आल्याचे यावेळी कार्यकारी अभियंता चौधरी यांनी स्पष्ट केले.शेतकऱ्यांच्या मागणीनुसार हरणबारी धरणातून रब्बीसाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले असून, २५० दशलक्ष घनफूट पाणी देण्यात येणार आहे. उर्वरित पाण्याचे दुसरे आवर्तन २५ फेब्रुवारीला सोडण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला, तर केळझर धरणातून येत्या १० फेब्रुवारीला े आवर्तन सोडण्यात येणार आहे. यासाठी १५४ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे.दरम्यान, आमदार दिलीप बोरसे यांनी रब्बीचे पाणी शेतकºयांच्या शेतापर्यंत कसे पोहोचेल यासाठी आवश्यक ठिकाणी कालव्यांची दुरु स्ती करावी. तसेच रब्बी पिकांसाठी ठरल्याप्रमाणे दिले जाणारे दोन्ही आवर्तने शेवटच्या शेतकºयापर्यंत कसे पोहोचेल यासाठी नियोजन करावे. जेणेकरून पीक हातात येईल, अशा सूचना यावेळी संबधित अधिकाºयांना देण्यात आल्या. बैठकीस केदाबापू काकुळते, बाळासाहेब भदाणे, पांडुरंग सोनवणे, माधवराव सोनवणे, जनार्दन सोनवणे, भास्कर सोनवणे आदी शेतकरी उपस्थित होते...असा आहे रब्बीचा सिंचन आराखडा...हरणबारी धरण पाणीसाठा ११६६ दशलक्ष घनफूट पैकी बाष्पीभवन तूट ११७ दशलक्ष घनफूट, पिण्याच्या पाण्याचे आरक्षण ३९० दशलक्ष घनफूट, रब्बी हंगामासाठी ६५९ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले आहे. केळझर धरणात ५७२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. पैकी बाष्पीभवन तूट ८६ दशलक्ष घनफूट, पिण्यासाठी १०१ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केले आहे. ३८५ दशलक्ष घनफूट पाणी रब्बीसाठी आरक्षित करण्यात आले आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी