शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

हरणबारी, केळझरमधून रब्बीसाठी दोन आवर्तने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:20 IST

सटाणा : बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातून यंदा रब्बीसाठी दोन आवर्तने सोडण्याबाबत तसेच पिण्यासाठी अनुक्र मे ३९० व ...

ठळक मुद्देबागलाण : समितीच्या बैठकीत पाणी आरक्षित करण्याचा निर्णय

सटाणा : बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातून यंदा रब्बीसाठी दोन आवर्तने सोडण्याबाबत तसेच पिण्यासाठी अनुक्र मे ३९० व १०१ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयात बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.२४) कालवा समितीची बैठक पार पडली. बैठकीस मालेगाव येथील जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश चौधरी, उपअभियंता ई.बी. शेवाळे, उपअभियंता अभिजित रौंदळ, शाखा अभियंता आर.बी. सूर्यवंशी, संजय पाटील उपस्थित होते. समितीच्या बैठकीत यंदाच्या रब्बी हंगामाचा प्राथमिक सिंचन आराखडा तयार करण्यात आला. तालुक्यातील हरणबारी मध्यम प्रकल्पातून सुमारे दोन हजार १५ हेक्टर या रब्बी क्षेत्राला पाणी दिले जाते, तर केळझर मध्यम प्रकल्पातून १ हजार १८० हेक्टर रब्बी क्षेत्राला पाणी दिले जाते. यंदा रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी तीन आवर्तनांची मागणी केली होती. मात्र पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणात वाढ झाल्याने रब्बीसाठी दोनच आवर्तनाचे नियोजन करण्यात आल्याचे यावेळी कार्यकारी अभियंता चौधरी यांनी स्पष्ट केले.शेतकऱ्यांच्या मागणीनुसार हरणबारी धरणातून रब्बीसाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले असून, २५० दशलक्ष घनफूट पाणी देण्यात येणार आहे. उर्वरित पाण्याचे दुसरे आवर्तन २५ फेब्रुवारीला सोडण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला, तर केळझर धरणातून येत्या १० फेब्रुवारीला े आवर्तन सोडण्यात येणार आहे. यासाठी १५४ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे.दरम्यान, आमदार दिलीप बोरसे यांनी रब्बीचे पाणी शेतकºयांच्या शेतापर्यंत कसे पोहोचेल यासाठी आवश्यक ठिकाणी कालव्यांची दुरु स्ती करावी. तसेच रब्बी पिकांसाठी ठरल्याप्रमाणे दिले जाणारे दोन्ही आवर्तने शेवटच्या शेतकºयापर्यंत कसे पोहोचेल यासाठी नियोजन करावे. जेणेकरून पीक हातात येईल, अशा सूचना यावेळी संबधित अधिकाºयांना देण्यात आल्या. बैठकीस केदाबापू काकुळते, बाळासाहेब भदाणे, पांडुरंग सोनवणे, माधवराव सोनवणे, जनार्दन सोनवणे, भास्कर सोनवणे आदी शेतकरी उपस्थित होते...असा आहे रब्बीचा सिंचन आराखडा...हरणबारी धरण पाणीसाठा ११६६ दशलक्ष घनफूट पैकी बाष्पीभवन तूट ११७ दशलक्ष घनफूट, पिण्याच्या पाण्याचे आरक्षण ३९० दशलक्ष घनफूट, रब्बी हंगामासाठी ६५९ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले आहे. केळझर धरणात ५७२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. पैकी बाष्पीभवन तूट ८६ दशलक्ष घनफूट, पिण्यासाठी १०१ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केले आहे. ३८५ दशलक्ष घनफूट पाणी रब्बीसाठी आरक्षित करण्यात आले आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी