शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

हनुमान जन्मस्थळाचा वाद मुद्द्यावरून गुद्द्यावर; दोन महंत आपसात भिडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 19:53 IST

Hanuman birthplace dispute : धर्मसभेत चर्चा सुरू असताना चर्चा भरकटली महंत सुधीर पुजारी यांनी द्वारकापीठाधिश्वर शंकाराचार्य कॉंग्रेसधार्जिणे असल्याचे विधान करताच गोविंदानंद संतापले आणि त्यांनी पुजारी यांना माफी मागावी, अशी आक्रमक भूमिका घेतली.

नाशिक : रामभक्त हनुमान यांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण झाल्याने बोलविण्यात आलेल्या धर्मसभेत चर्चा भरकटली आणि शंकराचार्यांच्या मुद्द्यावरून प्रकरण गुद्द्यापर्यंत पोहोचले. महंत सुधीरदास पुजारी यांनी माईक उगारला, तर स्वामी गोविंदानंद सरस्वतीही धाऊन गेल्याने प्रचंड गदारोळ झाला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणली. या गदारोळात मात्र हनुमान यांच्या जन्मस्थळाच्या मुद्द्यावर ठोस निर्णयहोऊ शकला नाही.

कर्नाटकहून रथयात्रा घेऊन त्र्यंबकेश्वर येथे आलेले स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान नाही, तर कर्नाटकातील किष्किंधा असल्याचा दावा करीत जन्मस्थळाचा वाद उकरून काढला होता. यावादावर चर्चा करण्यासाठी आज नाशिकरोडला धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. नाशिकमधील आखाड्यांचे साधू-महंत, पुजारी, वेद अभ्यासक यांनी स्वामी गोविंदानंद सरस्वती यांचे आव्हान स्वीकारत अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा दावा धर्मसभेत केला. तरीही स्वामी गोविंदानंद अडून बसल्याने वाद विकोपाला गेला.

धर्मसभेत चर्चा सुरू असताना चर्चा भरकटली महंत सुधीर पुजारी यांनी द्वारकापीठाधिश्वर शंकाराचार्य कॉंग्रेसधार्जिणे असल्याचे विधान करताच गोविंदानंद संतापले आणि त्यांनी पुजारी यांना माफी मागावी, अशी आक्रमक भूमिका घेतली. या मुद्द्यावरून वाद वाढत गेला आणि सुधीर पुजारी यांनी गोविंदानंद यांच्यावर माईक उगारला. नाशिकच्या इतर साधू-महंतांनीही गोविंदानंद यांना घेरले. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करीत गोविंदानंद यांना एका खोलीत आणून बसविले तर इतर साधुगणांना हॉलच्या खाली जाण्यास सांगितले. महंत सुधीरदास जोपर्यंत माफी मागणार नाही तोपर्यंत नाशिक सोडणार नसल्याची भूमिका गोविंदानंद सरस्वती यांनी घेतली. रात्री उशिरापर्यंत ते आपल्या भूमिकेवर ठाम होते.

टॅग्स :Nashikनाशिक